शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटांनी तयार केले अडीच लाख मास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 17:12 IST

या काळात सुमारे दोन लाख ३८ हजार मास्क तयार करून ६०२ ग्रामीण महिलांना रोजगाराची निर्मिती झाली असून, मास्कच्या विक्रीतून २२ लाख रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसहाशे महिलांना रोजगार : २२ लाखांची विक्रीसंचारबंदीमुळे उद्योगधंद्यांसह अनेक लघु उद्योगांनाही फटका बसला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना संसगार्मुळे लॉकडाउन व संचारबंदीमुळे उद्योगधंद्यांसह अनेक लघु उद्योगांनाही फटका बसला असून, रोजंदारीने काम करणाऱ्या असंख्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व बचत गटांना मास्कची निर्मिती करण्याच्या केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील २११ बचत गटांनी प्रतिसाद दिला आहे. या काळात सुमारे दोन लाख ३८ हजार मास्क तयार करून ६०२ ग्रामीण महिलांना रोजगाराची निर्मिती झाली असून, मास्कच्या विक्रीतून २२ लाख रुपयांची उलाढाल करण्यात आली आहे.

        कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर गेल्या महिन्यापासून संचारबंदी, लॉकडाउन करण्यात आले असून, त्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. विशेष करून ग्रामीण भागात रोजंदारीवर काम करणा-या कुटुंबांची ससेहोलपट होत आहे. लहान-मोठे उद्योगही बंद पडल्याने गावोगावी कार्यरत असलेल्या महिला बचत गटातील महिलांच्याही हातातील कामे बंद पडल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून महिला बचत गटांना आर्थिक मदत देऊन मास्क तयार करण्याचे काम दिले. त्यासाठी काही बचत गटांना प्रशिक्षणही देण्यात आले. त्यांच्या या आवाहनाला जिल्ह्यातील २११ महिला बचत गटांनी प्रतिसाद दिला. सध्या बाजारपेठेत मास्कची असलेली कमतरता भरून काढण्यासाठी बचत गटांनी गेल्या काही दिवसांतच दोन लाख ३८ हजार मास्क तयार केले. त्याची विक्री स्थानिक पातळीवर आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायतींना करण्यात येऊन महिलांना रोजगार निर्मितीबरोबरच २२ लाख रुपयांची उलाढालही झाली. महिला बचत गटांना मास्क निर्मितीतून रोजगार मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाला मोठा हातभार लागल्याचे बनसोड यांनी सांगितले.चौकट===अंतराचे भानमास्क बनविण्यासाठी लागणारी शिलाई मशीन प्रत्येकीकडे नसल्याने इतरही बचतगटाच्या महिलांना एकत्र केले व प्रत्येकीने स्वत:च्या घरी राहूनच डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून काम पूर्ण केले. ग्रामस्तरावर मास्क बनविण्याच्या कल्पनेमुळे गावागावात कोरोना आजाराविषयीची जनजागृतीही झाली व गावपातळीवर अंगणवाडी सेविका, आशावर्कर यांच्या माध्यमातून मास्कचे महत्त्व कळाले. त्याचबरोबर महिलांच्या घरखर्चाला हातभार लागला.- देवयानी पाटील, अध्यक्ष, बचत गट

टॅग्स :Socialसामाजिकnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद