लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने आकस्मिक निधीतून मंजूर केलेला ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ हा निधी प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर तालुकानिहाय त्याचे वाटप करण्यात आले आहे़ एकूण ७ हजार ७३३ शेतकऱ्यांना हा निधी वितरीत करण्यात आला आहे़आॅक्टोबर महिन्यात महा व क्यार या दोन चक्रीवादळांच्या प्रभावाने जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला होता़ यात सुमारे १० हजार ८१८ शेतकºयांच्या साडेपाच हजार हेक्टर खरीप शेतीपिकांचे नुकसान झाले होते़ या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने साडेतीन कोटी रुपयांची मदत जाहिर केली होती़ यातून जिल्ह्यातील तीन हजार शेतकºयांना पहिल्या टप्प्यात १ कोटी १३ लाख ७६ हजार रुपयांची भरपाई वाटप करण्यात आली होती़ उर्वरित शेतकºयांना दुसºया टप्प्याच्या रकमेची प्रतिक्षा होती़ गेल्या आठवड्यात १४ डिसेंबर रोजी शासनाने जिल्ह्यासाठी २ कोटी ४८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी वर्ग केल्यानंतर सोमवारपासून वाटप सुरु करण्यात आले होते़ यांतर्गत नवापुर तालुक्यात १३ लाख २८ हजार ५००, शहादा ७८ लाख ३८ हजार ८४० तर अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यासाठी प्रत्येकी ७८ लाख ३८ हजार ८३० रुपयांचे वितरण करण्यात आले़ या रकमेतून नवापुर तालुक्यातील ४३, शहादा १ हजार ५५९, अक्कलकुवा ३ हजार २५४ तर धडगाव तालुक्यातील २ हजार ९०० शेतकºयांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली आहे़भरपाईची ही रक्कम खात्यांवर वर्ग झाल्यानंतर आता शेतकºयांचे लक्ष अतीवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईकडे लागले आहे़ जिल्ह्यात तब्बल २० हजार १५५ शेतकºयांच्या १३ हजार हेक्टर जमिनीचे नुकसान झाले होते़ यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ३८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांची भरपाईची मागणी नोंदवली आहे़
जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांना अडीच कोटी वितरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 11:29 IST