शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

जिल्ह्यात ‘तुटी’चा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा जिल्ह्यात सरासरी इतका पावसाचा अंदाज वर्तविला असतांनाही जुुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ ३० टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा जिल्ह्यात सरासरी इतका पावसाचा अंदाज वर्तविला असतांनाही जुुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत केवळ ३० टक्के पाऊस झाला आहे. सरासरी २६ टक्के पाऊस कमी झाला आहे. आतापर्यंत झालेला पाऊस देखील सर्वत्र सारखाच झालेला नाही. त्यामुळे लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठ्यात देखील अपेक्षीत वाढ झालेली नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, येत्या काळात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तविली जात असल्याने अपेक्षा लागून आहेत.जिल्ह्यात यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाली. परंतु सर्वच भागात पावसाचे प्रमाण सारखे राहिले नाही. त्यामुळे पेरण्या देखील पुर्ण क्षेत्रात झालेल्या नाहीत. लघु व मध्यम प्रकल्पांमध्येही पाणी साठा होऊ शकला नाही. सरासरी केवळ २९.९ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस धडगाव तालुक्यात ४१ तर सर्वात कमी अक्कलकुवा तालुक्यात २० टक्के पाऊस झाला आहे.जुलैपर्यंतचा अंदाज चुकलाजुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात सरासरीचा निम्मे पाऊस होणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आला होता. परंतु तो फोल ठरला. तब्बल २६ टक्के पावसाची तूट राहिली आहे. ही तूट येत्या काळात भरून निघणार किंवा कसे याकडे आता लक्ष लागून आहे. सुदैवाची बाब म्हणजे हवामान खात्याने येत्या काळात समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे ही तूट भरून निघण्याची अपेक्षा लागून आहे.पेरणीही अपुर्णजिल्ह्यातील एकुण व लक्षांक असलेल्या क्षेत्रावर देखील खरीप पेरण्या होऊ शकल्या नसल्याची स्थिती आहे. आतापर्यंत केवळ ७६ टक्के पेरण्या झालेल्या आहेत. येत्या काळात अर्थात जुलै अखेर उर्वरित क्षेत्रात पेरण्या पुर्ण होण्याची शक्यता आहे. अर्थात येत्या काळात पावसाची स्थिती कशी राहील यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. गेल्या वर्षी जुलैच्या मध्यापर्यंत पुर्ण क्षेत्रात पेरण्या झाल्या होत्या.प्रकल्पांमध्ये २५ टक्के साठाजिल्ह्यातील ३६ लघु व सहा मध्यम प्रकल्पांमधील पाणी साठ्यात फारशी वाढ झाली नाही. गेल्या वर्षी झालेल्या सरासरीपेक्षा अधीक पावसामुळे सर्व लघु व मध्यम प्रकल्प तुडूंब भरले होते. उन्हाळ्यात देखील एकही प्रकल्प कोरडा झाला नव्हता. गेल्या वर्षाचा पाणी साठा अद्यापही अनेक प्रकल्पांमध्ये कायम आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात नव्याने पाणीसाठा वाढला नसल्याची स्थिती आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी २५ टक्के पाणीसाठा आहे.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाºया विरचक प्रकल्पात मात्र समाधानकारक अर्थात ४० टक्केपर्यंत पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात या प्रकल्पात नव्याने पाणीसाठा झाला नसल्याचे चित्र आहे. याशिवाय सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या दरा, राणीपूर, धनपूर यासह इतर प्रकल्पांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाला आहे. सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे उघड्यात आल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. आता जुलै अखेर सर्व पाणी सोडून दिले जाणार आहे.यापुढेही पावसाने ताण दिला किंवा सरासरीपेक्षा कमी झाला तर यंदा पावसाची तूट मोठ्या प्रमाणावर राहण्याची शक्यता आहे. परंतु हवामान विभाग आणि खाजगी संस्थाच्या अंदाजानुसार आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा सरासरीइतका अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.