शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पपईने भरलेला ट्रक उलटल्याने जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर अक्कलकुवा ते खापरच्या दरम्यान पपईने भरलेला ट्रक उलटल्यामुळे पूर्णपणे जळाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यात ट्रकमध्ये भरलेली पपई पूर्णपणे जळाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहादा येथून पपई भरून गुजरात राज्यात जाणारा ट्रक (क्रमांक आर.जे.19 जी.ए. 7619)  बुधवारी रात्री बारा ते एक वाजेच्या  सुमारास ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्यमार्गावर अक्कलकुवा ते खापरच्या दरम्यान पपईने भरलेला ट्रक उलटल्यामुळे पूर्णपणे जळाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यात ट्रकमध्ये भरलेली पपई पूर्णपणे जळाली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहादा येथून पपई भरून गुजरात राज्यात जाणारा ट्रक (क्रमांक आर.जे.19 जी.ए. 7619)  बुधवारी रात्री बारा ते एक वाजेच्या  सुमारास अक्कलकुवा ते खापर दरम्यानच्या जामली फाटय़ाजवळील वळणावर आला असता भरधाव वेग व वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण  सुटून ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्डय़ात जाऊन आदळला. भरधाव वेगात असलेला ट्रक उलटल्याने डिङोलची टाकी फुटून ट्रकने पेट घेतला. या ट्रकमध्ये चालकासह सहचालक असे दोन जण असल्याची माहिती पोलीस  सूत्रांकडून देण्यात आली. यात चालकाला गंभीर दुखापत झाली तर सहचालकही जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक व अन्य वाहन चालकांनी ट्रकमधून बाहेर काढून रुग्णालयात उपचारासाठी हलविले.या ट्रकमध्ये पपई भरलेली होती. शहाद्याहून व्यापा:यांनी खरेदी केलेली ही पपई गुजरात राज्यात घेऊन जात असताना ही घटना घडली. या अपघातात ट्रकने पेट घेतल्याने ट्रकमधील  निम्म्याहून जास्त पपई पूर्णपणे जाळून खाक झाली तर उर्वरित पपई भाजली गेल्याने तीदेखील निरुपयोगी ठरणार आहे. यामुळे व्यापा:यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ट्रकदेखील पूर्णपणे जळाला आहे. अवघ्या अर्धा ते पाऊण तासात ट्रकची कॅबीन पूर्णपणे जळून खाक झाली.   सकाळी 11 वाजेपर्यत ट्रकचे काही अवशेष जळत होते. रात्रीच्या         सुमारास आगीचे व धुराचे लोळ उठल्याने परिसरातील नागरीकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. बुधवारी रात्री झालेल्या या अपघाताची नोंद गुरुवारी सायंकाळर्पयत पोलिसांत करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जखमींची नावे समजू शकली नाहीत.अक्कलकुवा ते खापर दरम्यान रस्त्याचा भाग अपघात प्रवणक्षेत्र बनला आहे. वर्षभर या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असते. त्यात अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. सुमारे 15 दिवसांपूर्वी अक्कलकुवा ते खापर दरम्यान कौली फाटय़ाच्या पुढील पेट्रोलपंपच्या परिसरात एकाच दिवसात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागला होता. तर  याच जामली फाटय़ाच्या वळणावर भरधाव ट्रक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणा:या त्याच खड्डय़ात जाऊन उलटला होता. राज्यमार्गावर सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सातत्याने होणा:या अपघातांना आळा घालण्यासाठी भरधाव व अनियंत्रित वाहतुकीला चाप तसेच बेशिस्त वाहन चालकांवर संबंधित प्रशासनाकडून कारवाई होणे गरजेचे आहे. परंतु अशी कोणतीही कारवाई किंवा उपाययोजना प्रशासनाकडून होताना दिसून येत नाही.