शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

नंदुरबार जिल्ह्यातील रक्तसाठय़ात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 13:19 IST

उन्हाळ्याचा परिणाम : ‘ओ पॉङिाटिव्ह’ वगळता सर्वच रक्तगटांचा तुटवडा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : जिल्ह्यातील रक्तसाठय़ात मोठा तुटवडा निर्माण झाला आह़े ‘ओ पॉङिाटिव्ह’ रक्तगट वगळता इतर सर्व गटातील रक्तसाठय़ात ठणठणाट असल्याची स्थिती आह़े त्यामुळे रक्तदान शिबीरांची संख्या वाढविण्यात यावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध रक्तगटांचा 24 बॅग इतका रक्तसाठा शिल्लक आहे तर, 29 बॅग रक्तसाठा हा ‘रिझर्व’ ठेवण्यात आला आह़े जिल्ह्यातील अपघातांची स्थिती, गरोदर मातांच्या प्रसुतीची संख्या बघता इतका अत्यंल्प रक्तसाठा असणे चिंताजनक आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तसाठा शिल्लक नसल्याने अनेक वेळा रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत असत़े उन्हाळ्याचा परिणामउन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ उन्हाळ्यात रक्तदान करण्यासाठी रक्तदाते तयार होत नसल्याचे सांगण्यात येत आह़े उन्हाळ्यात साधारण काळापेक्षा जास्तीची उर्जा खर्ची पडत असत़े तसेच उकाडय़ात घाम निघत असल्याने यातूनही ब:यावेळी थकवा, अशक्तपणा जाणवत असतो़ जीवाची लाही लाही होत असते व त्यातच रक्तदानामुळे अधिकच थकवा येत असल्याचेही अनेक रक्तदात्यांकडून सांगण्यात येत असत़े परिणामी रक्तदान शिबीरेही अत्यंत कमी होत असतात़ त्यामुळे साहजिकच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़इतर जिल्ह्यातून होतेय आयातउन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ त्यामुळे आपात्कालिन परिस्थितीमध्ये रक्ताची गरज लागलीच तर, जळगाव, नाशिक तसेच औरंगाबाद येथून रक्तासाठा आयात करण्यात येत असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील सूत्रांनी सांगितल़े परंतु अचानक एखादा अपघात झाला आणि रक्ताची मोठी मागणी असली तर लगेच रक्तसाठय़ाची व्यवस्था कशी होणार हासुध्दा प्रश्न यातून निर्माण होत आह़े जिल्ह्यातील बहुतेक परिसर हा दुर्गम भागात मोडला जात असल्याने या ठिकाणी रक्तदान शिबीर घेणे म्हणजे शिवधनुष पेलण्यासारखे आह़े येथील गरीब आदिवासी बांधवांना प्राथमिक सोयी सुविधाच व्यवस्थित उपलब्ध होत नसतात व त्यात, रक्तदान करणे हे त्यांना जगावेगळे वाटत असत़े त्यामुळे दुर्गम भागातही एखादी रक्तदान शिबीर घेतल्यास या शिबीराला प्रतिसाद मिळेलच असे नसत़े जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठय़ा संख्येने रक्तदान शिबीर, तसेच रक्तदान करण्याबाबतचे जनजागृती कॅम्प घेण्यात येत असतात़ परंतु यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत़े अनेक वेळा, मोलगी, धडगाव आदी दुर्गम भागातही शिबीरांचे आयोजन करण्यात येत असत़े परंतु रक्तदान करण्यामागचे गांभीर्य अद्यापही अनेकांना पटलेले नसल्याने रक्तदान करणा:यांच्या संख्येतही मोठी घट होत असल्याचे दिसून येत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयासोबतच इतर रक्तपेढय़ामध्येही रक्तसाठय़ाचा तुटवडा असल्याचे दिसून आल़े