शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील रक्तसाठय़ात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 13:19 IST

उन्हाळ्याचा परिणाम : ‘ओ पॉङिाटिव्ह’ वगळता सर्वच रक्तगटांचा तुटवडा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : जिल्ह्यातील रक्तसाठय़ात मोठा तुटवडा निर्माण झाला आह़े ‘ओ पॉङिाटिव्ह’ रक्तगट वगळता इतर सर्व गटातील रक्तसाठय़ात ठणठणाट असल्याची स्थिती आह़े त्यामुळे रक्तदान शिबीरांची संख्या वाढविण्यात यावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध रक्तगटांचा 24 बॅग इतका रक्तसाठा शिल्लक आहे तर, 29 बॅग रक्तसाठा हा ‘रिझर्व’ ठेवण्यात आला आह़े जिल्ह्यातील अपघातांची स्थिती, गरोदर मातांच्या प्रसुतीची संख्या बघता इतका अत्यंल्प रक्तसाठा असणे चिंताजनक आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तसाठा शिल्लक नसल्याने अनेक वेळा रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत असत़े उन्हाळ्याचा परिणामउन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ उन्हाळ्यात रक्तदान करण्यासाठी रक्तदाते तयार होत नसल्याचे सांगण्यात येत आह़े उन्हाळ्यात साधारण काळापेक्षा जास्तीची उर्जा खर्ची पडत असत़े तसेच उकाडय़ात घाम निघत असल्याने यातूनही ब:यावेळी थकवा, अशक्तपणा जाणवत असतो़ जीवाची लाही लाही होत असते व त्यातच रक्तदानामुळे अधिकच थकवा येत असल्याचेही अनेक रक्तदात्यांकडून सांगण्यात येत असत़े परिणामी रक्तदान शिबीरेही अत्यंत कमी होत असतात़ त्यामुळे साहजिकच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़इतर जिल्ह्यातून होतेय आयातउन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ त्यामुळे आपात्कालिन परिस्थितीमध्ये रक्ताची गरज लागलीच तर, जळगाव, नाशिक तसेच औरंगाबाद येथून रक्तासाठा आयात करण्यात येत असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील सूत्रांनी सांगितल़े परंतु अचानक एखादा अपघात झाला आणि रक्ताची मोठी मागणी असली तर लगेच रक्तसाठय़ाची व्यवस्था कशी होणार हासुध्दा प्रश्न यातून निर्माण होत आह़े जिल्ह्यातील बहुतेक परिसर हा दुर्गम भागात मोडला जात असल्याने या ठिकाणी रक्तदान शिबीर घेणे म्हणजे शिवधनुष पेलण्यासारखे आह़े येथील गरीब आदिवासी बांधवांना प्राथमिक सोयी सुविधाच व्यवस्थित उपलब्ध होत नसतात व त्यात, रक्तदान करणे हे त्यांना जगावेगळे वाटत असत़े त्यामुळे दुर्गम भागातही एखादी रक्तदान शिबीर घेतल्यास या शिबीराला प्रतिसाद मिळेलच असे नसत़े जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठय़ा संख्येने रक्तदान शिबीर, तसेच रक्तदान करण्याबाबतचे जनजागृती कॅम्प घेण्यात येत असतात़ परंतु यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत़े अनेक वेळा, मोलगी, धडगाव आदी दुर्गम भागातही शिबीरांचे आयोजन करण्यात येत असत़े परंतु रक्तदान करण्यामागचे गांभीर्य अद्यापही अनेकांना पटलेले नसल्याने रक्तदान करणा:यांच्या संख्येतही मोठी घट होत असल्याचे दिसून येत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयासोबतच इतर रक्तपेढय़ामध्येही रक्तसाठय़ाचा तुटवडा असल्याचे दिसून आल़े