शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

नंदुरबार जिल्ह्यातील रक्तसाठय़ात ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 13:19 IST

उन्हाळ्याचा परिणाम : ‘ओ पॉङिाटिव्ह’ वगळता सर्वच रक्तगटांचा तुटवडा

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : जिल्ह्यातील रक्तसाठय़ात मोठा तुटवडा निर्माण झाला आह़े ‘ओ पॉङिाटिव्ह’ रक्तगट वगळता इतर सर्व गटातील रक्तसाठय़ात ठणठणाट असल्याची स्थिती आह़े त्यामुळे रक्तदान शिबीरांची संख्या वाढविण्यात यावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध रक्तगटांचा 24 बॅग इतका रक्तसाठा शिल्लक आहे तर, 29 बॅग रक्तसाठा हा ‘रिझर्व’ ठेवण्यात आला आह़े जिल्ह्यातील अपघातांची स्थिती, गरोदर मातांच्या प्रसुतीची संख्या बघता इतका अत्यंल्प रक्तसाठा असणे चिंताजनक आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तसाठा शिल्लक नसल्याने अनेक वेळा रुग्णांच्या नातेवाईकांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत असत़े उन्हाळ्याचा परिणामउन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ उन्हाळ्यात रक्तदान करण्यासाठी रक्तदाते तयार होत नसल्याचे सांगण्यात येत आह़े उन्हाळ्यात साधारण काळापेक्षा जास्तीची उर्जा खर्ची पडत असत़े तसेच उकाडय़ात घाम निघत असल्याने यातूनही ब:यावेळी थकवा, अशक्तपणा जाणवत असतो़ जीवाची लाही लाही होत असते व त्यातच रक्तदानामुळे अधिकच थकवा येत असल्याचेही अनेक रक्तदात्यांकडून सांगण्यात येत असत़े परिणामी रक्तदान शिबीरेही अत्यंत कमी होत असतात़ त्यामुळे साहजिकच रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़इतर जिल्ह्यातून होतेय आयातउन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो़ त्यामुळे आपात्कालिन परिस्थितीमध्ये रक्ताची गरज लागलीच तर, जळगाव, नाशिक तसेच औरंगाबाद येथून रक्तासाठा आयात करण्यात येत असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील सूत्रांनी सांगितल़े परंतु अचानक एखादा अपघात झाला आणि रक्ताची मोठी मागणी असली तर लगेच रक्तसाठय़ाची व्यवस्था कशी होणार हासुध्दा प्रश्न यातून निर्माण होत आह़े जिल्ह्यातील बहुतेक परिसर हा दुर्गम भागात मोडला जात असल्याने या ठिकाणी रक्तदान शिबीर घेणे म्हणजे शिवधनुष पेलण्यासारखे आह़े येथील गरीब आदिवासी बांधवांना प्राथमिक सोयी सुविधाच व्यवस्थित उपलब्ध होत नसतात व त्यात, रक्तदान करणे हे त्यांना जगावेगळे वाटत असत़े त्यामुळे दुर्गम भागातही एखादी रक्तदान शिबीर घेतल्यास या शिबीराला प्रतिसाद मिळेलच असे नसत़े जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढी विभागाकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठय़ा संख्येने रक्तदान शिबीर, तसेच रक्तदान करण्याबाबतचे जनजागृती कॅम्प घेण्यात येत असतात़ परंतु यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात येत़े अनेक वेळा, मोलगी, धडगाव आदी दुर्गम भागातही शिबीरांचे आयोजन करण्यात येत असत़े परंतु रक्तदान करण्यामागचे गांभीर्य अद्यापही अनेकांना पटलेले नसल्याने रक्तदान करणा:यांच्या संख्येतही मोठी घट होत असल्याचे दिसून येत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयासोबतच इतर रक्तपेढय़ामध्येही रक्तसाठय़ाचा तुटवडा असल्याचे दिसून आल़े