लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : यावर्षी उसाला दोन हजार 301 रुपये एकरकमी प्रती मेट्रिक टन दर देण्याचा निर्णय डोकारेस्थित आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून जाहीर करण्यात आला. कारखान्याच्या 17 व्या गळीत हंगाम शुभारंभ व गव्हाण पूजनप्रसंगी हा निर्णय जाहीर झाला.कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री सुरुपसिंग नाईक व सयाबाई नाईक, जि.प.च्या माजी अध्यक्षा रजनी नाईक, संचालक छगन वसावे व वसाबाई वसावे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर नाईक व जयश्री नाईक यांच्या हस्ते गव्हाण पूजन करुन गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन सखाराम गावीत, संचालक मगन वळवी, नथ्थू गावीत, प्रकाश पाटील, मगन वळवी, भामटू भिल, विनाबाई वसावे, आरीफ बलेसरीया, अजित नाईक, फत्तेसिंग नाईक, विनोद नाईक, लक्ष्मण कोकणी, बाळू नाईक, माजी जि.प. सदस्य रतनजी गावीत, पं.स. सदस्य जालमसिंग गावीत, अशोक गावीत, कार्यकारी संचालक विजयानंद कुशारे, ऊस उत्पादक सभासद शेतकरी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.गळीत हंगामाचा शुभारंभ विधीवत पूजन करुन व वजनकाटय़ाचे पूजन करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सुरुपसिंग नाईक म्हणाले की, आदिवासी सहकारी साखर कारखाना हा शेतक:यांचा असल्याने शेतक:यांनी आपल्या कारखान्याला ऊस दिला पाहिजे. यावर्षी ऊसाला दोन हजार 301 रुपये एकरकमी दर दिला जाईल, असे जाहीर करुन इतर कारखान्यांच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले. कार्यकारी संचालक विजयानंद कुशारे यांनी यावर्षी अतिवृष्टीमुळे काही भागात ऊस पिकाचे नुकसान झाल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता वर्तवली. सूत्रसंचालन दिलीप पवार यांनी तर आभार भूपेंद्र वसावे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुभाष माळी, ईश्वर जोशी, शेतकी अधिकारी शिवाजी देसाई यांच्यासह कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.
आदिवासी कारखान्यातर्फे उसाला 2301 रुपयांचा भाव जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 13:15 IST