शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

तोरखेडा व अभनपूर शिवारात वृक्षांची तोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:40 IST

कोळसा माफियांचे प्रताप परिसरातील अडगळीचे व काटेरी वृक्ष तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याची भन्नाट कल्पना बाहेरगावाहून आलेल्या काहींच्या डोक्यात ...

कोळसा माफियांचे प्रताप

परिसरातील अडगळीचे व काटेरी वृक्ष तोडून त्यापासून कोळसा तयार करण्याची भन्नाट कल्पना बाहेरगावाहून आलेल्या काहींच्या डोक्यात आली. त्यातूनच सुरुवातीला तोरखेडा गावाच्या दक्षिणेकडील तापी नदी व स्मशानभूमी परिसरातील काटेरी बाभूळ उपटून कोळसा तयार करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी ग्रामपंचायत, वन व महसूल विभाग यापैकी कोणाचीही परवानगी घेण्यात आली नाही. अडचणीचे ठरणारे काटेरी झाडे कमी होत असल्याने एक चांगले काम म्हणून कोणाचीही त्याबद्दल तक्रार नव्हती. मात्र, ही झाडे संपल्याने तसेच कमी श्रमात पैसा उपलब्ध होऊ लागल्याने या कोळसा माफियांनी हळूहळू तोरखेडापासून उत्तरेकडील अभनपूर गाव शिवारातील शेतीचे बांध व नदी-नाला परिसराकडे आपला मोर्चा वळविला. त्यात त्यांनी अनेक मोठे वृक्ष, वेली आणि कंदमुळे यांचा मुळासकट नायनाट करायला सुरुवात केली. एका वृक्षाभोवती दोन ते तीन वेली व कंदमुळे असतात. पळस, कंसार, व्हेंकळ, तेल्या बाभूळ, एलातूर, खैर, सलई, बेल, कोकरून, पिप्रीन, जंगली मिरची व यासारखे अनेक आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असलेले वृक्ष, यासोबतच या वृक्षांच्या सान्निध्यातील गुळवेल, शतावरी, वासनवेल, देव्या वेल, फागवेल, गुंजावेल यासारख्या अनेक वेली तसेच मिरची कंदसारखे अनेक वृक्ष, वेली व कंदमुळे कोळसा तयार करण्यासाठी समूळ नष्ट केले जात आहे.

कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन देणारे चांगले मोठे वृक्षदेखील नष्ट केले जात आहेत. परिणामी या परिसरातील तापमानात दोन अंशाने वाढ तर वृक्षांअभावी पर्जन्यमान कमी होत आहे. वृक्षतोडीमुळे परिसरातील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यात पशुपक्षी, जीवजंतू व मानव यांना व येणाऱ्या पिढ्यांना खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. परिसरात असलेल्या सर्व पशुपक्ष्यांचा निवारा नष्ट होत आहे. देशाचा राष्ट्रीय पक्षी मोर यांची संख्या येथे लक्षणीय आहे. सध्या हे मोर संध्याकाळच्या वेळेस गावाकडे येऊ लागले आहेत. तसेच त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मोरांना निवारा नसल्याने ते तोरखेडा येथील अमरधामवर बसून पशुपक्ष्यांवर येणाऱ्या संकटाची हाक देत आहेत.

माफियांना पकडण्याचे आवाहन

नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत ओल्या लाकडांच्या भट्ट्या गावालगत कोळसा तयार करण्यासाठी लावल्या जात होत्या. त्यातून मोठ्या प्रमाणात विषारी वायू निघत असल्यामुळे गावातील लहान मुले व वृद्धांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. तरीही भीतीपोटी नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हे कोळसा माफिया गाव सोडून पळून जाण्याच्या आधीच त्यांच्यावर संबंधित विभागाने मुळासकट उपटलेल्या वृक्षांचा पंचनामा करून गुन्हे दाखल करणे अत्यावश्यक ठरले आहे. तसेच वृक्ष समूळ काढण्यासाठी वापरलेले जेसीबी मशीन ताब्यात घेऊन संबंधितांवर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोळसा माफियांनी परिसरात मुळासकट उपटलेल्या वृक्षांच्या जागी १० बाय १० फूट अंतरावर कडूनिंब, चिंच, आवळा, जांभूळ, पिंपळ, उंबर व यासारखे ऑक्सिजन देणारे वृक्ष लावावे व त्या वृक्षांचे पाच वर्षांपर्यंत योग्य संगोपन करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याकरिता पर्यावरण व जैवविविधता क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी दखल घेत तोरखेडा व अभनपूरची जैववैविधता पुनर्स्थापित करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.