शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

कोरोनाबाधित व्यक्तीवर अलगीकरण कक्षातच उपचार करा - राधाकृष्ण गमे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:30 IST

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित नंदुरबार जिल्हा कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जि.प.चे मुख्य कार्यकारी ...

दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित नंदुरबार जिल्हा कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके आदी उपस्थित होते.

गमे म्हणाले, नंदुरबार जिल्ह्याने गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली. या वेळी ग्रामीण भागात रुग्णांची संख्या अधिक येत असल्याने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील कोरोनाबाधित आढळलेल्या ३५५ गावांत प्रतिबंधित क्षेत्र बारकाईने राबविल्यास इतर गावांना संसर्गमुक्त ठेवता येईल. संसर्ग झालेला व्यक्ती शोधणे, त्याची चाचणी करणे आणि उपचार वेळेवर करण्याची गरज आहे. रुग्णालयात येण्यापूर्वी ऑक्सिजन पातळी खालावलेला रुग्ण आल्यास उपचार करण्यास मर्यादा येतात. जिल्ह्यात दुर्गम भाग असूनही चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत, पण गंभीर परिस्थितीत रुग्ण आल्याने उपचार योग्यरीतीने करणे शक्य होत नसल्याने वेळेवर लक्ष देणे आवश्यक आहे. ऑक्सिजन पातळी खालावल्यावर रुग्ण रुग्णालयात का पोहोचतात याचे विश्लेषण करावे व या शृंखलेतील त्रुटी दूर कराव्यात. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी २४ तासांत मृत्यू झालेल्यांची यादी रुग्णालयातून घ्यावी व सर्वेक्षण पथकाकडून या व्यक्तींची माहिती घ्यावी. रुग्णालयात उशिरा पोहोचण्याच्या कारणांचे विश्लेषण करण्यासोबत सर्वेक्षणातील अतिजोखमीच्या व्यक्तींवर लक्ष केंद्रित करावे. कोरोनाबाधित व्यक्तींना विलगीकरण कक्षात प्राधान्याने आणावे. गृह विलगीकरणात त्याच्या प्रकृतीकडे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे कुटुंबबाधित होत आहे आणि परिसरातील इतरांनाही संसर्ग होत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन बेड वाढविण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे. रेमडेसिविर औषध वितरण शासनाच्या निर्देशानुसार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णाच्या गरजेनुसार रुग्णालयाला औषधे देण्यात येत आहे. शासनातर्फेदेखील जिल्ह्याला विविध सुविधांसाठी सहकार्य करण्यात येत आहे. यासोबत संपर्क साखळी योग्यरीतीने शोधल्यास संसर्गावर नियंत्रण आणणे शक्य आहे. त्यासाठी कोरोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गावातील कर्मचाऱ्यांनी ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर द्यावा. शाळा, आश्रमशाळा, सभागृह आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू करावे. या ठिकाणी स्वच्छतेची व्यवस्था करावी. कुटुंबीयांचा बाधित व्यक्तीशी संपर्क येऊ देऊ नये. झोकून देऊन काम केल्यास बाधित व्यक्तीचे मृत्यू रोखण्यास यश येईल. कोरोनाला जिल्ह्यातून घालविण्यासाठी सर्वांनी योद्ध्याप्रमाणे काम करावे. प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याने आपली भूमिका योग्यप्रमाणे बजावल्यास संसर्गवाढीचा दर कमी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लसीकरणाचा वेग वाढवा

लसीकरणामुळे संसर्ग झाल्यानंतरचे गंभीर परिणाम टाळता येतात. लसीकरण झालेल्या व्यक्तीमध्ये परिणाम कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उर्वरित कोरोना योद्धे आणि ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना लसीकरणासाठी प्रोत्साहित करावे. लसीकरणामुळे काहीच त्रास होत नाही हे नागरिकांना समजावून सांगावे. नागरिकांना लसीकरणाबाबत माहिती देण्यासाठी गावातील लहान डॉक्टर, स्थानिक लोकप्रतिनिधी, पाड्यातील प्रभावी व्यक्ती यांचे सहकार्य घेण्यात यावे. ४५ वर्षांवरील नागरिकांच्या याद्या तयार करून लसीकरणासाठी पाठपुरावा करावा. सूक्ष्म दैनंदिन नियोजन तयार करून त्यानुसार प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करून घ्यावे.