शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
3
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
4
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
5
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
6
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
7
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
8
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
9
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
10
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
11
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
12
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
13
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
15
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
16
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
17
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
18
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
19
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
20
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती

एसटीचे ‘सीमोल्लंघन’; प्रवासी मात्र घरातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:20 IST

नंदुरबार : कोरोनामुळे एसटीचे वैभव हरपले आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसचे वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न ...

नंदुरबार : कोरोनामुळे एसटीचे वैभव हरपले आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसचे वैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करत आहे. परंतु या प्रयत्नांना सध्यातरी नुकसानीचा सुरुंग लागला असून प्रवासी संख्या कमी झाल्याने वाढत्या डिझेलच्या दरात एसटीचा तोटा अधिक वाढत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात एकूण चार आगारांतून २८९ बस चालवल्या जातात. २०२० मध्ये कोरोनापूर्वी दिवसभरात चार आगारांतून राज्यासह परराज्याच्या सीमा ओलांडून धावणाऱ्या बस दिवसाला साधारण ३६ लाख रुपयांचे उत्पन्न आणत होत्या. परंतु गत दीड वर्षात कोरोनामुळे चारही आगारांची वाताहत झाली असून सध्या केवळ चार आगारांतून ६०० फेऱ्या होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, परराज्यातील बस सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले नसल्याने जिल्ह्यातील चारही आगारांच्या बस सध्या केवळ महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांतून धावत असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या काळात गुजरात आणि मध्यप्रदेश राज्याकडे धावणाऱ्या बस सुरू झाल्यास एसटीचे नुकसान भरून निघण्यास मदत होणार असल्याचा विश्वास अधिकारी वर्तवत आहेत.

ग्रामीण भागातील बस अद्यापही बंदच

नंदुरबार, शहादा, नवापूर आणि अक्कलकुवा या आगारातून जिल्ह्यातील विविध भागांत बस सोडल्या जातात. यातून ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो. परंतु तीन महिन्यांपासून ग्रामीण भागातील १०० टक्के बस बंद आहेत.

नंदुरबार आगारातून पश्चिम पट्टा व पूर्व पट्ट्यात सर्वाधिक बस सोडल्या जात होत्या. या बस तीन महिन्यांपासून बंद आहेत.

जिल्ह्यातील चारही आगारांची सर्वाधिक कमाई ही शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी वाहतुकीतून होत होती. शाळा बंद असल्याने ही कमाईही बंद आहे.

नाशिक व धुळे मार्गावर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी

सध्या चारही आगारातून सुरू असलेल्या बसमध्ये नाशिक आणि धुळे याच मार्गावरच्या बसमध्ये प्रवासी दिसून येत आहेत.

नंदुरबार येथून नाशिक व धुळेसाठी दिवसाला २० तर शहादा आगारातूनही १५ च्या जवळपास फेऱ्या करण्यात येत आहेत.

शहादा आगारातून शिरपूरसाठी चालवण्यात येणाऱ्या बसमध्ये प्रवासी दिसून येतात.

तोटा वाढला

जिल्ह्याच्या चारही आगारातून दर दिवशी धावणाऱ्या बस साधारण ३५ लाख रुपये २०१९ पर्यंत कमावले जात होते. परंतु यात आतातरी घट आली आहे. सध्या जिल्ह्यातील चारही आगारातून बस साधारण २० लाख प्रवास भाडे कमावत आहेत. नंदुरबार आठ, शहादा ६ तर नवापूर व अक्कलकुवा आगार प्रत्येकी तीन लाख कमाई करते.

दुसऱ्या राज्याच्या बस अद्यापही बंदच

लगतच्या गुजरात आणि मध्यप्रदेश राज्याकडे जाणाऱ्या बस अद्यापतरी बंद आहेत. नंदुरबार आगारातून सुरतसाठी दिवसभरात ३६ पेक्षा अधिक फेऱ्या होत होत्या. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून या फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. इतर तीनही आगारातून गुजरातच्या बस बंद करण्यात आल्या आहेत.