शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील व्यवहाराचा गाडा आला रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 12:18 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनलॉकडाऊन एक सुरू झाल्यापासून अर्थात १ जून पासून जिल्ह्यातील अर्थव्यवस्था आणि ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनलॉकडाऊन एक सुरू झाल्यापासून अर्थात १ जून पासून जिल्ह्यातील अर्थव्यवस्था आणि एकुणच बाजारपेठेतील उलाढाल सुरळीत होण्यास सुरुवात झाली. सद्य स्थितीत व्यवहाराची गाडी रुळावर आली आहे. जिल्ह्यात औद्योगिकरण नसल्यामुळे परत आलेल्या मजुरांना स्थानिक ठिकाणीच रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याने मोठी मदत झाली.नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच आटोक्यात होता. त्यामुळे जिल्हा कधीही रेडझोनमध्ये गेला नाही. असे असले तरी कोरोना आटोक्यात राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. परिणामी जिल्हा आॅरेंज झोनमध्येच राहिला. त्याचा फायदा १ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉकडाऊन १ मध्ये जिल्ह्याला चांगला फायदा झाला. अनेक बाबींना सवलती मिळाल्या. त्याचा परिणाम बाजारपेठेतील उलाढाल सुरळीत होण्यास, बेरोजगारांना काम मिळण्यात झाले. महिनाभरात वेळोवेळी अनेक बाबींना सवलती मिळत गेल्याने आता जिल्ह्यातील व्यवहार ८० टक्के सर्वसामान्य झाले आहेत.परराज्यात रोजागारासाठी गेलेले जवळपास ४८ हजार पेक्षा अधीक मजूर लॉकडाऊनच्या काळात परत आले. या मजुरांना परत आल्यावर स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नियोजन करून ठेवले. रोहयोवरील मजुरांची संख्या तब्बल ६२ हजारापर्यंत गेली होती. नाशिक विभागात हा उच्चांक होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीमुळे मजुरांचे फारशी अडचण आली नाही.सद्य स्थितीत बाजारपेठेची वेळ ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेची आहे. जिल्हाअंतर्गत एस.टी.वाहतूक सेवा मर्यादीत स्वरूपात सुरू झाली आहे. ग्रामिण भागात अद्यापही एस.टी.सेवा सुरू झाली नाही. ती सुरू झाल्यास आणखी फरक पडणार आहे. लहान, मोठे उद्योग देखील जिल्ह्यात सुरू आहेत. त्यात नंदुरबारातील मिरची प्रक्रिया उद्योग, नवापुरातील दाळ प्रक्रिया उद्योग, एमआयडीसीतील उद्योग सुरू आहेत. जिल्ह्यातील सहाही बाजार समितींमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री सुरू आहे. शहादा व नंदुरबारातील कापूस खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांचा उर्वरित सर्व कापूस खरेदी केला जात आहे. शाळा, महाविद्यालये, आंतरजिल्हा एस.टी.वाहतूक तसेच सिनेमागृहे आणि उद्याने सुरू झाल्यास आणखी फरक पडणार आहे. परंतु ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊनच्या कालावधी वाढविण्यात आल्याने या सेवा महिनाभर बंदच राहतील.एकुणच जिल्ह्यातील व्यवहार ७५ ते ८० टक्के व्यवहार सुरळीत झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मर्यादीत राहिला तर येत्या काळात जिल्ह्यातील संपुर्ण व्यवहाराचा गाडा रुळावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.