शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

जिल्ह्यातील व्यवहाराचा गाडा आला रुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 12:18 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनलॉकडाऊन एक सुरू झाल्यापासून अर्थात १ जून पासून जिल्ह्यातील अर्थव्यवस्था आणि ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनलॉकडाऊन एक सुरू झाल्यापासून अर्थात १ जून पासून जिल्ह्यातील अर्थव्यवस्था आणि एकुणच बाजारपेठेतील उलाढाल सुरळीत होण्यास सुरुवात झाली. सद्य स्थितीत व्यवहाराची गाडी रुळावर आली आहे. जिल्ह्यात औद्योगिकरण नसल्यामुळे परत आलेल्या मजुरांना स्थानिक ठिकाणीच रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याने मोठी मदत झाली.नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच आटोक्यात होता. त्यामुळे जिल्हा कधीही रेडझोनमध्ये गेला नाही. असे असले तरी कोरोना आटोक्यात राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. परिणामी जिल्हा आॅरेंज झोनमध्येच राहिला. त्याचा फायदा १ जूनपासून सुरू झालेल्या अनलॉकडाऊन १ मध्ये जिल्ह्याला चांगला फायदा झाला. अनेक बाबींना सवलती मिळाल्या. त्याचा परिणाम बाजारपेठेतील उलाढाल सुरळीत होण्यास, बेरोजगारांना काम मिळण्यात झाले. महिनाभरात वेळोवेळी अनेक बाबींना सवलती मिळत गेल्याने आता जिल्ह्यातील व्यवहार ८० टक्के सर्वसामान्य झाले आहेत.परराज्यात रोजागारासाठी गेलेले जवळपास ४८ हजार पेक्षा अधीक मजूर लॉकडाऊनच्या काळात परत आले. या मजुरांना परत आल्यावर स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा प्रशासनाने रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नियोजन करून ठेवले. रोहयोवरील मजुरांची संख्या तब्बल ६२ हजारापर्यंत गेली होती. नाशिक विभागात हा उच्चांक होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीमुळे मजुरांचे फारशी अडचण आली नाही.सद्य स्थितीत बाजारपेठेची वेळ ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेची आहे. जिल्हाअंतर्गत एस.टी.वाहतूक सेवा मर्यादीत स्वरूपात सुरू झाली आहे. ग्रामिण भागात अद्यापही एस.टी.सेवा सुरू झाली नाही. ती सुरू झाल्यास आणखी फरक पडणार आहे. लहान, मोठे उद्योग देखील जिल्ह्यात सुरू आहेत. त्यात नंदुरबारातील मिरची प्रक्रिया उद्योग, नवापुरातील दाळ प्रक्रिया उद्योग, एमआयडीसीतील उद्योग सुरू आहेत. जिल्ह्यातील सहाही बाजार समितींमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री सुरू आहे. शहादा व नंदुरबारातील कापूस खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांचा उर्वरित सर्व कापूस खरेदी केला जात आहे. शाळा, महाविद्यालये, आंतरजिल्हा एस.टी.वाहतूक तसेच सिनेमागृहे आणि उद्याने सुरू झाल्यास आणखी फरक पडणार आहे. परंतु ३१ जुलै पर्यंत लॉकडाऊनच्या कालावधी वाढविण्यात आल्याने या सेवा महिनाभर बंदच राहतील.एकुणच जिल्ह्यातील व्यवहार ७५ ते ८० टक्के व्यवहार सुरळीत झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव मर्यादीत राहिला तर येत्या काळात जिल्ह्यातील संपुर्ण व्यवहाराचा गाडा रुळावर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.