शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
5
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
6
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
7
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
8
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
9
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
10
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
11
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
12
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
13
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
14
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
16
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
17
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
18
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
19
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
20
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला

वर्षभरानंतर धावणार रुळावर गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 14:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या २२ वर्षाच्या कार्यकाळात पाचवी पंचवार्षीक निवडणूक पार पडून नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्षांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेच्या २२ वर्षाच्या कार्यकाळात पाचवी पंचवार्षीक निवडणूक पार पडून नवनिर्वाचीत अध्यक्ष व उपाध्यक्षांनी पदभार स्विकारला. या काळात सात महिने तत्कालीन पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली तर सहा महिने प्रशासकांनी कारभार सांभाळला. दरम्यान, पाचव्या टर्मच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी पदभार स्विकारला असून २७ जानेवारी रोजी नवीन सभापती निवड होऊन ते देखील पदभार घेणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषदेची गाडी रुळावर धावणार आहे.१ जुलै १९९८ रोजी जिल्हा निर्मिती झाली. त्यानंतर धुळे जिल्ह्यातून नंदुरबार जिल्हा परिषद वेगळी करण्याची प्रक्रिया चार महिने चालली. सर्व कारभार वेगळा झाल्यानंतर नवनियुक्त नंदुरबार जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर लागलीच अर्थात नोव्हेंबर १९९८ मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लागली.

अशा राहिल्या निवडणुकापहिल्या निवडणुकीत काँग्रेसला सक्षम विरोधी पक्ष नसल्यामुळे काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला होता. जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा होण्याचा मान नवापूर तालुक्याच्या माध्यमातून कै.हेमलता वळवी यांना मिळाला. त्यावेळी प्रत्येकी एक वर्षासाठी अध्यक्षपद राहत होते. त्यावेळी चार जणांना संधी मिळाली. पाच वर्षाची पहिली टर्म नंतर नोव्हेंबर २००३ साली दुसरी निवडणूक पार पडली.यावेळी देखील काँग्रेसने एकतर्फी विजय मिळविला. अध्यक्षपदी नवापूर तालुक्याच्या माध्यमातून रेखा शिरिष वसावे या विराजमान झाल्या. त्यावेळी प्रत्येकी अडीच वर्षांचा कार्यकाळ होता. ती पंचवार्षीक पार पडल्यानंतर नोव्हेंबर २००८ साली तिसरी पंचवार्षीक निवडणूक झाली. त्यात मात्र राष्टÑवादी काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवीत सत्ता स्थापन केली आणि पुन्हा नंदुरबार तालुक्याच्या माध्यमातून कुुमुदिनी विजयकुमार गावीत या अध्यक्षपदी विराजमान झाल्या.पुर्ण पाच वर्ष अध्यक्षपद सांभाळले. नोव्हेंबर २०१३ च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसने बहुमत मिळवीत सत्ता स्थापन केली. पहिल्या अडीच वर्षांसाठी भरत माणिकराव गावीत व दुसºया अडीच वर्षांसाठी रजनी शिरिषकुुमार नाईक यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली.

कार्यकाळ संपला,मुदतवाढ मिळाली...२०१३ साली निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०१९ ला संपला, परंतु न्यायालयीन याचिका आणि नागपूर जिल्हा परिषदेला देण्यात आलेली मुदतवाढ ही बाब लक्षात घेता नंदुरबार जिल्हा परिषदेला देखील मुदतवाढ देण्यात आली. तत्कालीन अध्यक्षा रजनी नाईक व पदाधिकारी हे मुदतसमाप्तीनंतर सात महिने अर्थात १८ जुलै २०१९ पर्यंत पदावर राहिले.इतिहासात पहिल्यांदाच प्रशासकजिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासक बसविला गेला. डिसेंबर २०१८ ते जुलै २०१९ या काळात मुदतवाढ मिळालेल्या तत्कालीन बॉडी बरखास्त करण्यात आली. आणि १९ जुलै रोजी प्रशासकांनी पदभार स्विकारला. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे प्रशासकपदाचा कार्यभार होता. प्रशासकांनी सहा महिने पदभार सांभाळ्यानंतर १८ जानेवारी २०२० रोजी नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्षांनी पदभार स्विकारला.पहिल्यांदा युवकांच्या हाती सत्ताजिल्हा परिषदेची सत्ता आता युवकांच्या हाती देण्यात आली आहे. अध्यक्षा व उपाध्यक्ष हे वयाच्या २५ ते ३० च्या घरात आहेत. दोन्हीजण पहिल्यांदाच निवडून आले आहेत.जिल्हा परिषदेचा किंवा पंचायत समिती कामाचा देखील अनुभव नसतांना थेट अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. असे असले तरी दोन्ही पदाधिकारी हे राजकीय घराण्यातील, माजी मंत्री व माजी आमदारांच्या घरातून आलेले असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे प्राथमिक धडे यांना घरातूनच मिळाले असतीलच.आता येत्या काळात मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत त्यांच्या विकासात्मक, गतीमान आणि पारदर्शक कारभाराचा कस लागणार आहे.

४अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापतीपदाच्या निवडीकडे लक्ष लागून आहे. २७ रोजी सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. सकाळी ११ वाजता अर्ज दाखल करण्यात येणार आहे. छाननी, माघारीच्या प्रक्रियेनंतर दुपारी दोन वाजता विशेष सभा होणार आहे. त्यात गरज असल्यास मतदान होईल अन्यथा बिनविरोध प्रक्रिया पुर्ण होणार आहे.४सभापतीपदी कुणाची वर्णी लागते याबाबत लक्ष लागून आहे. प्रत्येक तालुक्याला संधी देण्याचा प्रयत्न राहणार आहे. शिवाय अनुभवी सदस्यांना संधी दिली जाणार असल्याचे समजते. काँग्रेस शिवसेनेला किती सभापतीपद देते याकडे देखील अनेकांचे लक्ष लागून आहे.