लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. त्यातच या मार्गावर अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असल्याने रोजच वाहतूक ठप्प होत असून इतर वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी संबंधित ठेकेदाराने व्यवस्थित नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान प्रकाशा गावानजीक एक वर्षापासून बंद पडलेल्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने योग्य नियोजन न केल्याने दररोज वाहतूक ठप्प होत आहे. ही परिस्थिती गेल्या पाच दिवसांपासून होत असल्याने नियमित ये-जा करणारे विद्यार्थी, नोकरदार व प्रवासी अक्षरश: कंटाळले आहेत.गुरुवारी एक दुचाकीधारक लहान पुलावरून येताना खराब रस्त्याच्या खाली उतरला आणि रस्त्याच्या खाली जाऊन पडला. त्याला किरकोळ दुखापत झाली. होणारे अपघात लक्षात घेता या मार्गादरम्यान सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सुरळीत वाहतुकीसाठी योग्य नियोजन होणे आवश्यक आहे, अशी मागणी त्रस्त वाहनधारक व प्रवाशांनी केली आहे.
रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:20 IST