शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

रस्त्यावरील चिखलामुळे वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:20 IST

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील प्रकाशा ते शहादा रस्त्याचे काम सुरू आहे. प्रकाशा ते डामरखेडादरम्यान अनेक दिवसांपासून काम अपूर्ण आहे. हे काम ...

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावरील प्रकाशा ते शहादा रस्त्याचे काम सुरू आहे. प्रकाशा ते डामरखेडादरम्यान अनेक दिवसांपासून काम अपूर्ण आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे हे काम रखडले आणि त्याचा परिणाम आता पावसाळ्यात दिसून येत आहे. या रस्त्यावर माती व मुरुम टाकण्यात आला आहे. थोडाही पाऊस झाला की चिखल होऊन वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. एखादे अवजड वाहन चिखलात रुतले तर वाहतूक ठप्प होते. ही बाब दररोजची झाली आहे. दोन दिवसांपूर्वी एसटी बसही रस्त्याच्या खाली घसरली होती. त्यातील प्रवाशांना पायपीट करीत जावे लागते होते. दुचाकीधारकांना तर कसरत करीत वाहने चालवावी लागतात. शनिवारी सायंकाळीही एक ट्रक चिखलात रुतल्याने वाहतूक ठप्प होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. जेसीबीच्या साहाय्याने हा ट्रक बाजूला करण्यात आला. तोपर्यंत मात्र वाहतूक ठप्प झाल्याने इतर वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदाराने वाहतूक ठप्प होणार नाही यासाठी उपाययोजना करून रस्त्याचे काम जलदगतीने करण्याची मागणी होत आहे.