शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सलग 50 दिवसांच्या संचारबंदीने व्यापारी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी झाला आहे. राज्यात जिल्ह्याचा कोरोना पॅाझिटिव्हिटी रेट सर्वात कमी झाला आहे. लोकांमध्ये जागरूकतादेखील ...

नंदुरबार : कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात कमी झाला आहे. राज्यात जिल्ह्याचा कोरोना पॅाझिटिव्हिटी रेट सर्वात कमी झाला आहे. लोकांमध्ये जागरूकतादेखील आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीत शिथिलता द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. जिल्ह्यात आधीच राज्याने लागू केलेल्या संचारबंदीच्या आधी अर्थात १ एप्रिलपासून संचारबंदी लागू आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे तसेच मजुरांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. वाढती रुग्णसंख्या आणि लोकांमधील बेफिकीरपणा यामुळे साथ नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांनी १ एप्रिलपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची लागलीच अंमलबजावणी सुरू झाली. शिवाय शनिवार व रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन कडकडीत पाळण्यात येऊ लागला. त्यानंतर १५ एप्रिलपासून राज्य शासनाने संपूर्ण संचारबंदी लागू केली. आता राज्य शासनाच्या संचारबंदीला ३५ दिवस तर जिल्हा प्रशासनाच्या संचारबंदीला ५० दिवस झाले आहेत. सलग ५० दिवसांच्या संचारबंदीमुळे मात्र जनता कंटाळली असून व्यापारी, मजूर, छोटे व्यावसायिक यांनी संचारबंदी शिथिल करण्याची मागणी सुरू केली आहे.

छोटे व्यापारी हवालदिल

छोटे व्यावसायिक व व्यापारी सलग ५० दिवसांच्या संचारबंदीमुळे हवालदिल झाले आहेत. त्यांचा रोजगार पूर्णत: बुडाला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत व्यावसायाची परवानगी होती; परंतु त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. नंतर अर्थात तीन दिवसांपासून दुपारी एक वाजेपर्यंतची वेळमर्यादा वाढविली आहे. त्यातही केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचाच समावेश आहे.

सरसकट सर्वांना परवानगी हवी

दुपारी एक वाजेची वेळमर्यादा असली तरी त्यात सरसकट सर्वच वस्तू विक्रीच्या दुकानांना परवानगी हवी, अशी मागणी होत आहे. सराफा व्यावसायिक, कापड दुकानदार, भांडी विक्रेते, इलेट्रॅानिक वस्तूंची दुकाने, मोबाइल दुरुस्ती, स्टेशनरी यासह इतर वस्तू विक्रीच्या दुकानांना परवानगी मिळावी, अशी मागणी होत आहे. शासनाच्या संचारबंदीचे सर्व नियम पाळूनच व्यवसाय करण्याची हमीदेखील या व्यावसायिकांकडून देण्याची तयारी आहे.

अनेकांच्या रोजगारावर गदा

एवढ्या मोठ्या संख्येने दुकाने बंद राहत असल्यामुळे त्यात काम करणाऱ्या मजुरांना देखील फटका बसला आहे. अनेकांना बेरोजगार व्हावे लागल्याने त्यांना भाजीपाला किंवा फळ विक्रीचा व्यवसाय करावा लागत आहे.