शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

लाॅकडाऊनमुळे टळतोय रेल्वे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात लाॅकडाऊन सुरू असल्याने प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : राज्यात लाॅकडाऊन सुरू असल्याने प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक सुरू असली तरी प्रवासी नकार देत असल्याने ऐनवेळी तिकिटे रद्द होणे सुरूच आहे. यातून रेल्वेस्थानकातही शुकशुकाट आहे.

नंदुरबार रेल्वेस्थानकातून सप्ताहात साधारण ३९ प्रवासी गाड्या सध्या मार्गस्थ होत आहेत. यातील सहा गाड्या या दैनंदिन आहेत. या व्यतिरिक्त साप्ताहिक गाड्या धावत असल्याने जळगाव-उधना मार्गावरील नंदुरबार रेल्वेस्थानकात नियमित वर्दळ असते. परंतु लाॅकडाऊनमुळे ही वर्दळ कमी झाली असून नागरिक प्रवास करणे थांबवत असल्याने दर दिवशी तिकिटे रद्द करण्यात येत आहेत. दक्षिण भारतासह नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे रद्द करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुजरात राज्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या मात्र कायम असून गुजरातमधून येणाऱ्यांची गर्दी मात्र कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने मेमो व पॅसेंजर रेल्वेगाड्याही बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याने केवळ एक्स्प्रेस व सुपरफास्ट गाड्या सध्या उधना-जळगाव मार्गावर धावत आहेत. या गाड्यांमधून थेट मोठ्या शहरांमधून प्रवास करणे शक्य होत असल्याने छोट्या स्थानकांवरील प्रवाशांचा रेल्वे प्रवासही थांबला असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

रोज रेल्वेतून प्रवाशांची संख्या

दररोज जाणाऱ्या रेल्वे

आरक्षण रद्द करणाऱ्यांची रोजची संख्या

लांब पल्ल्याचा प्रवास थांबा

नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. उधना-जळगाव मार्गावरचे प्रमुखस्थानक असल्याने गुजरात राज्यातून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. परंतु गेल्या एक महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने देवदर्शनासह पर्यटनासाठी जाणाऱ्यांचा प्रवास थांबला आहे.

यामुळे हावडा-अहमदाबाद, नवजीवन, ताप्तीगंगा यासह इतर गाड्यांना सहज आरक्षण मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोरोनापूर्वी लग्नसराईत तोबा गर्दी उसळणाऱ्या नंदुरबार रेल्वेस्थानकात सध्या शुकशुकाट आहे. रेल्वे आरक्षणाच्या चार्टमध्येही वाढ नसल्याचे सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक म्हणून प्रवास करणारे १०० च्या जवळपास प्रवासी बुकिंग करत असल्याचे सांगण्यात आले.

रद्द करणे वाढले

तिकीट रद्द करण्यात स्थानिक प्रवाशांची मोठी संख्या आहे. कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील काही मजूर गावाकडे गेले होते. या मजुरांकडून गेल्या आठवडाभरापर्यंत बुकिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, इतर कामानिमित्त गेलेल्या १५० पेक्षा अधिक जणांनी गेल्या आठवड्यापासून बुकिंग रद्द केल्याची माहिती दिली गेली.

तिकीट विक्री झाली कमी

n दरम्यान, एकीकडे बुकिंग रद्द होत असताना तिकीट पॅसेंजर आणि मेमो गाड्या बंद असल्याने दैनंदिन तिकीट विक्रीवर परिणाम झाला आहे. दिवसभरात केवळ १० टक्केच जनरल सीटसाठीच्या तिकिटांची विक्री होत असल्याचा दावा नंदुरबार येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी करण्यात आला आहे.