शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासींना धरले गेले वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त राजशिष्टाचार व प्रोटोकॉल पाळण्याच्या नावाखाली प्रशासनाने शहरवासीयांना वेठीस धरल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यपालांच्या दौऱ्यानिमित्त राजशिष्टाचार व प्रोटोकॉल पाळण्याच्या नावाखाली प्रशासनाने शहरवासीयांना वेठीस धरल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी दिसून आला. राज्यपालांचा वाहनांचा ताफा ज्या मार्गाने जाणार त्या मार्गावर अर्धा तास वाहतूक रोखून धरण्यात आली. यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, दवाखान्यात जाणारे रुग्ण, गावी जाणारे प्रवासी यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शिवाय त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाकडे जाणाºया रस्त्यावरही नागरिकांना अडविण्यात आले.प्रशासनाने राजशिष्टाचाराचा अतिरेक करून शुक्रवारी शहरवासीयांना अक्षरश: छळले. चटका देणारे ऊन, वाहनांमधून निघणारा धूर यामुळे अर्धा तास नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले.राज्यपाल सकाळी साडेनऊ वाजता हेलिकॉप्टरने नंदुरबारातील पोलीस कवायत मैदानावरील हेलिपॅडवर दाखल झाले. तेथून ते थेट शासकीय विश्रामगृहात आले. तेथे भेटीगाठी झाल्यानंतर ते जीटीपी महाविद्यालयाच्या मैदानावर कार्यक्रमासाठी दाखल झाले. तेथून टोकरतलाव रस्त्यावरील एकलव्य निवासी शाळेत व सेंट्रल किचनमध्ये गेले. सकाळी पावणेदहा ते १२ वाजेपर्यंतच्या या वेळेत त्यांचा वाहनांचा ताफा ज्या भागातून जाणार त्या भागातील रस्ते १५ ते २० मिनिटे आधी रहदारीसाठी बंद केले जात होते. विशेषत: धुळे रस्त्यावरील वाघेश्वरी चौफुलीवरूनच वाहनांचा ताफा तीन वेळा आला व गेल्याने या मार्गावरील चारही रस्त्यांवरील वाहतूक वारंवार थांबविली जात होती.हेलिपॅड ते विश्रामगृह या प्रवासवेळी १५ ते २० मिनिटे, विश्रामगृह ते जीटीपी कॉलेज या दरम्यान २५ मिनिटे आणि जीटीपी कॉलेज ते एकलव्य या दरम्यान प्रवासासाठी पुन्हा १५ मिनिटे अशा पद्धतीने तीन वेळा चौफुलीवरील वाहतूक थांबविण्यात येत होती. वास्तविक चौफुली ते विश्रामगृह हा रस्ता दुपदरी आहे. त्यामुळे येणाºया किंवा जाणाºया एका मार्गावरील वाहतूक सुरू ठेवणे व दुचाकी आणि तीनचाकीसह शालेय विद्यार्थी वाहतूक करणाºया वाहनांना ये-जा करण्यास परवाणगी देणे आवश्यक असतांना पोलिसांनी सरसकट सर्वच वाहनांना बंदी केली. परिणामी वेळोवेळी दोन ते तीन किलोमिटर वाहनांच्या रांगा लागत होत्या.शिवाय जे वाहनचालक अतातायीपणा करणार त्यांच्या वाहनांची नंबरप्लेटचा फोटो काढण्यात येत होता. जेणेकरून त्यांना वाहतूक नियमांचा भंग केल्याचा आॅनलाईन दंड दिला जावा. या प्रकारामुळे दोन तास शहरवासी पुरते हैराण झाले होते. गावी जाण्यासाठी बससस्थानकावर बस मिळावी यासाठी अनेक महिला, वृद्ध प्रवाशांनी पायीच जाणे पसंत केले. सार्वजनिक सुटी असतांना अनेक शाळांनी सुट्टी रद्द केल्याने शाळा देखील नेहमीप्रमाणे सुरू होत्या. परिणामी शाळेत जाणाºया विद्यार्थ्यांनाही उशीरा पोहचावे लागले. रुग्णांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला.मोलगी येथेही विद्यार्थ्यांना झाला त्रासगुरुवारी मोलगी येथे देखील राजशिष्टाचाराचा बाऊ करण्यात आला. मुख्य रस्ते अर्धा ते पाऊण तास बंद ठेवण्यात आले. यामुळे बारावीच्या परीक्षेसाठी खेड्यापाड्यातून मोलगी येथील केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. वाहने थांबून ठेवल्याने विद्यार्थ्यांना एक ते दीड किलोमिटर पायपीट करून परीक्षा केंद्रांवर पोहचावे लागले. वास्तविक मोलगी येथे मुख्य एकच रस्ता आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता प्रशासनाने उपलब्ध करून देत त्या मार्गाने वाहतूक सुरू ठेवणे आवश्यक होते. परंतु सुरक्षा आणि प्रोटोकॉलच्या नावाखाली नाहक त्रास दिल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.पर्यायी रस्त्यांचाही झाला असता वापर...शासकीय विश्रामगृह ते जीटीपी महाविद्यालयात जाण्यासाठी प्रशासनाने दिनदयाल चौक ते महाविद्यालय असा किंवा विश्रामगृह ते नेहरूनगर मार्गे महाविद्यालय असा रस्ता शॉर्टकट होता. असे असतांना मुख्य मार्गाने अर्थात धुळेनाका, वाघेश्वरी चौफुली, वळण रस्ता, जानता राजा चौक मार्गे जीटीपी महाविद्यालय हा फेरा असलेला रस्ता का निवडला गेला हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. यापैकी एक रस्ता निवडला असता तरी शहरवासीयांना त्रासाला सामोरे जावे लागले नसते. वाहतूकही खोळंबली नसती. पर्यायी रस्त्यांकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? याबाबत शहरवासी प्रश्न उपस्थित करीत आहेत.