शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

भरघोस उत्पन्न देणारे आजवान उत्पादक शेतकरी उपेक्षीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दैनंदिन आहारात आणि आयुर्वेदात महत्त्व असलेल्या ओवा अर्थात आजवान पीक शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न देवून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दैनंदिन आहारात आणि आयुर्वेदात महत्त्व असलेल्या ओवा अर्थात आजवान पीक शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न देवून जाते. उत्तर महाराष्टÑात केवळ नंदुरबार तालुक्यातच या पिकाचे उत्पादन घेतले जाते. नंदुरबारात स्थानिक ठिकाणी ओवा अर्थात आजवान खरेदी करणारे व्यापारी नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात विक्री करावी लागत असल्याचे चित्र आहे. नंदुरबार बाजार समितीत सध्या ४०० क्विंटल आवक सुरू असून केवळ दोन व्यापारी खरेदीदार आहेत.खाद्य पदार्थ रुचकर बनविण्यासाठी आजवानचा मोठा वापर केला जातो. पाचक आणि आयुर्वेदात महत्वाचे स्थान असलेल्या आजवानचे पीक हे ठराविक ठिकाणीच घेतले जाते. त्यासाठी मध्यम आणि हलकी जमीन लागते. पाण्याचे प्रमाण देखील मध्यम स्वरूपाचे लागते. रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पिकासोबत आजवानचेही उत्पादन घेण्याची प्रथा नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागात व नवापूर तालुक्यात आहे. अर्थात धानोरा, खांडबारा या भागात आजवानचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.अत्यल्प खर्च, भाव चांगलाआजवानला हेक्टरी २५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. उत्पादन हेक्टरी ८ ते ९ क्विंटल होत असते. रब्बी हंगामात गहू व हरभरा पिकाच्या सोबत याचे उत्पादन घेतले जाते. साधारणत: साडेतीन ते साडेचार महिन्याचे हे पीक आहे. आजवानला सरासरी ८ ते १८ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळतो. सध्या नंदुरबारच्या बाजारात १४ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे. सरासरी दिवसाची आवक ही ४०० क्विंटलपर्यंत जात आहे. येत्या काळात ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.यंदा वारंवार बदलणारे तापमान, अवकाळी पाऊस यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तरीही गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी उत्पादकता आल्याची माहिती हे पीक घेणाºया काही शेतकºयांनी दिली.खरेदीदार कमीआजवान अर्थात ओवा पिकांचे खरेदीदार व्यापारी फारच कमी आहेत. नंदुरबार बाजार समितीत दोनच व्यापारी ओवा खरेदी करीत असतात. खरेदीदारांमधील स्पर्धा नसल्यामुळे ओवा उत्पादक शेतकºयांना मिळेल त्या भावात त्या विक्री कराव्या लागतात. मध्यंतरी १५ दिवस खरेदीदारच नसल्याने ओवा विकणाºया शेतकºयांची फारच परवड झाली होती.विदर्भात सद्य स्थितीत १२ ते १८ हजार रुपये क्विंटल भाव सुरू आहेत. नंदुरबारात मात्र कमीत कमी १२ व जास्तीत जास्त १४ हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याचे चित्र आहे. एकुणच कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाºया या पिकाकडे अद्यापही शेतकरी वळले नाहीत, त्यांना कृषी विभागाकडून अपेक्षीत मार्गदर्शन देखील मिळत नसल्याची स्थिती आहे.४आजवानचे पीक राज्यात मोजक्याच ठिकाणी घेतले जाते. त्यात नंदुरबार तालुक्याचा समावेश आहे. राज्यात अकोला, बुलढाणा, अमरावती व वाशिम जिल्ह्यातील मोजक्याच भागात हे पीक घेतले जाते. राजस्थान आणि हरियाणा राज्यात या पिकाचे क्षेत्र अधीक आहे. परिणामी खरेदीदार मिळत नाहीत आणि अपेक्षीत भावही मिळत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबार भागातील शेतकºयांना याबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.