शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

भरघोस उत्पन्न देणारे आजवान उत्पादक शेतकरी उपेक्षीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दैनंदिन आहारात आणि आयुर्वेदात महत्त्व असलेल्या ओवा अर्थात आजवान पीक शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न देवून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दैनंदिन आहारात आणि आयुर्वेदात महत्त्व असलेल्या ओवा अर्थात आजवान पीक शेतकऱ्यांना मोठे उत्पन्न देवून जाते. उत्तर महाराष्टÑात केवळ नंदुरबार तालुक्यातच या पिकाचे उत्पादन घेतले जाते. नंदुरबारात स्थानिक ठिकाणी ओवा अर्थात आजवान खरेदी करणारे व्यापारी नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात विक्री करावी लागत असल्याचे चित्र आहे. नंदुरबार बाजार समितीत सध्या ४०० क्विंटल आवक सुरू असून केवळ दोन व्यापारी खरेदीदार आहेत.खाद्य पदार्थ रुचकर बनविण्यासाठी आजवानचा मोठा वापर केला जातो. पाचक आणि आयुर्वेदात महत्वाचे स्थान असलेल्या आजवानचे पीक हे ठराविक ठिकाणीच घेतले जाते. त्यासाठी मध्यम आणि हलकी जमीन लागते. पाण्याचे प्रमाण देखील मध्यम स्वरूपाचे लागते. रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पिकासोबत आजवानचेही उत्पादन घेण्याची प्रथा नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागात व नवापूर तालुक्यात आहे. अर्थात धानोरा, खांडबारा या भागात आजवानचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.अत्यल्प खर्च, भाव चांगलाआजवानला हेक्टरी २५ ते ४० हजार रुपये खर्च येतो. उत्पादन हेक्टरी ८ ते ९ क्विंटल होत असते. रब्बी हंगामात गहू व हरभरा पिकाच्या सोबत याचे उत्पादन घेतले जाते. साधारणत: साडेतीन ते साडेचार महिन्याचे हे पीक आहे. आजवानला सरासरी ८ ते १८ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळतो. सध्या नंदुरबारच्या बाजारात १४ हजार रुपये क्विंटल असा भाव मिळत आहे. सरासरी दिवसाची आवक ही ४०० क्विंटलपर्यंत जात आहे. येत्या काळात ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.यंदा वारंवार बदलणारे तापमान, अवकाळी पाऊस यामुळे उत्पादनावर परिणाम झाला. तरीही गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी उत्पादकता आल्याची माहिती हे पीक घेणाºया काही शेतकºयांनी दिली.खरेदीदार कमीआजवान अर्थात ओवा पिकांचे खरेदीदार व्यापारी फारच कमी आहेत. नंदुरबार बाजार समितीत दोनच व्यापारी ओवा खरेदी करीत असतात. खरेदीदारांमधील स्पर्धा नसल्यामुळे ओवा उत्पादक शेतकºयांना मिळेल त्या भावात त्या विक्री कराव्या लागतात. मध्यंतरी १५ दिवस खरेदीदारच नसल्याने ओवा विकणाºया शेतकºयांची फारच परवड झाली होती.विदर्भात सद्य स्थितीत १२ ते १८ हजार रुपये क्विंटल भाव सुरू आहेत. नंदुरबारात मात्र कमीत कमी १२ व जास्तीत जास्त १४ हजार रुपये क्विंटल भाव मिळत असल्याचे चित्र आहे. एकुणच कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाºया या पिकाकडे अद्यापही शेतकरी वळले नाहीत, त्यांना कृषी विभागाकडून अपेक्षीत मार्गदर्शन देखील मिळत नसल्याची स्थिती आहे.४आजवानचे पीक राज्यात मोजक्याच ठिकाणी घेतले जाते. त्यात नंदुरबार तालुक्याचा समावेश आहे. राज्यात अकोला, बुलढाणा, अमरावती व वाशिम जिल्ह्यातील मोजक्याच भागात हे पीक घेतले जाते. राजस्थान आणि हरियाणा राज्यात या पिकाचे क्षेत्र अधीक आहे. परिणामी खरेदीदार मिळत नाहीत आणि अपेक्षीत भावही मिळत नसल्याची स्थिती आहे. नंदुरबार भागातील शेतकºयांना याबाबत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.