शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यातील अधिका:यांवर येणार ‘गाढवं’ शोधण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:47 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गाढव नेहमीच दुर्लक्षीत प्राणी राहिला आहे. केवळ काम करवून घेणे आणि ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गाढव नेहमीच दुर्लक्षीत प्राणी राहिला आहे. केवळ काम करवून घेणे आणि उघडय़ावर सोडून देण्याचे प्रकार गाढवांकडून करून घेतले जातात. आता मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात तरी गाढवांना बरे दिवस येणार आहेत. ज्या वाडय़ा, पाडय़ांना रस्ते नाहीत अशा ठिकाणी गाढवांवरून पाणी पुरवठा करण्याचा विचार नंदुरबार जिल्हा प्रशासन करीत आहे. जिल्ह्यात सद्य स्थितीत अडीच हजार गाढवे असल्याची नोंद पशुसंवर्धन विभागाकडे आहे. ‘गाढव’ नाव ऐकताच एक दुर्लक्षीत आणि मालकासाठी नेहमीच काम करून देणारा प्राणी म्हणून त्यांचे वर्णन समोर येते. कुणाला मुर्खात काढायचे झाल्यास त्याला त्या नावाने देखील उपरोधीकपणे बोलले जाते. परंतु हेच गाढवं अनेकदा कामाला येतात. आता देखील नंदुरबार जिल्हा प्रशासनासाठी ही गाढवं कामाला येणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा, धडगाव तालुक्यात पूर्वी गाढवांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जात होता. विशेषत: निवडणुकीच्या काळात निवडणूक साहित्य मतदान केंद्रांर्पयत वाहून नेण्यासाठी प्रशासनाला गाढवांची शोधाशोध करावी लागत असे. गेल्या काही वर्षात दळणवळणाची सुविधा वाढल्याने निवडणुकीच्या कामातून गाढवं हद्दपार झाली होती. परंतु आता पुन्हा प्रशासनासाठी गाढवं शोधण्याची वेळ येणार आहे. सातपुडय़ातील दुर्गम भागातील गाव, पाडय़ांवर यंदा भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. अशा ठिकाणी पाणी पुरवठा योजना घेता येत नाही, टँकर, बैलगाडीनेही पाणी पुरवठा होऊ शकत नाही. अशा ठिकाणी आता गाढवांवरून पाणी पुरवठा करण्याची मागणी लोकसंघर्ष मोर्चाने केली आहे. त्याला जिल्हा प्रशासनाने तत्वत: मान्यता देखील दिली आहे. त्यामुळे सातपुडय़ात आता गाढवं शोधण्याची वेळ प्रशासनाच्या अधिकारी आणि कर्मचा:यांवर येवून ठेपली आहे. जिल्ह्यात पशु गणनेच्या नोंदीनुसार जवळपास अडीच हजार गाढवं असल्याची नोंद आहे. तर 2011 च्या गणनेनुसार 2,138 गाढवं आहेत. त्यात अक्कलकुवा तालुक्यात 244,तळोदा 6, धडगाव, 10, शहादा 1,749, नंदुरबार 58 तर नवापूर तालुक्यात 81 गाढवांची नोंद पशुगणनेत झालेली आहे.