शहरं
Join us  
Trending Stories
1
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
2
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
3
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
4
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
5
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
6
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
7
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
8
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
9
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
10
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
11
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
12
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
13
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
14
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
15
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
16
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
17
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
18
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
19
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
20
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश

नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षात केवळ एकच गावतंटामुक्त

By admin | Updated: April 9, 2017 13:02 IST

तीन वर्षात केवळ एकच गाव तंटामुक्त घोषीत करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात तर एकही गाव तंटामुक्त करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे या अभियानाचा जिल्ह्यात तरी फज्जाच उडाला आहे.

 ऑनलाई लोकमत/मनोज शेलार  

नंदुरबार, दि.9- तंटामुक्तीत जिल्ह्याचा आलेख गेल्या तीन वर्षापासून खाली आला आहे. तीन वर्षात केवळ एकच गाव तंटामुक्त घोषीत करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात तर एकही गाव तंटामुक्त करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे या अभियानाचा जिल्ह्यात तरी फज्जाच उडाला आहे. 
शासनाने गावांची सुधारणा आणि विकासासाठी  विविध योजनांची घोषणा दहा वर्षापूर्वी केली होती. त्यातीलच एक तंटामुक्ती गाव योजना. गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटावे, गावातील एकोपा कायम राहावा, सामाजिक सलोखा टिकावा यासह इतर उद्देशाने 14 ऑगस्ट 2007 रोजी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. योजनेचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे तंटे गावातच सामोपचाराने मिटले. परिणामी न्यायालय आणि पोलिसांवरील ताण ब:याच प्रमाणात मिटला होता. पहिल्याच वर्षी राज्यात लाखोंच्या संख्येने तर जिल्ह्यात काही हजार तंटे निकाली निघाले होते. त्यामुळे दरवर्षी ही योजना अधिक प्रभावीपणे राबविली जाईल अशी अपेक्षा असतांना मात्र, त्या योजनेकडे दुर्लक्षच झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. 2007-08 नंतर उतरत्या क्रमाने गावे तंटामुक्त होत गेली. गेल्या तीन ते चार वर्षात प्रतिसाद अतिशय थंड आहे. पोलीस विभागाने देखील आपल्यावरील इतर ताण लक्षात घेता या योजनेच्या अंमलबजावणीकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. दोन वर्षापासून तर एकही  गाव तंटामुक्त झालेले नाही. यंदा एकही प्रस्ताव जिल्ह्यातून नसल्याचे समोर आले आहे. असे असले तरी समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील एकुण ग्रामपंचायतींच्या तुलनेत तंटामुक्त गावांची टक्केवारी 60 टक्केपेक्षा अधीक आहे हे विशेष.
स्पर्धा आणि चढाओढ
आठ वर्षापूर्वी या योजनेत सहभागी होण्यासाठी गावागावांमध्ये स्पर्धा आणि चढाओढ निर्माण झाली होती. शासनाने ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या निकषानुसार बक्षीसांची रक्कम ठरविली आहे. त्यामुळे अनेक गावांना लाखांची बक्षीसे मिळाली आहेत. या बक्षीस रक्कमेतून गावांनी विविध उपक्रम देखील राबविले. त्याचा फायदा गाव विकासाला झाला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. परंतू नंतर या योजनेची व्याप्ती आणि निकाल घोषीत करण्यासाठीची गुंतागुंत पहाता पोलीस दलाने देखील नंतर काही प्रमाणात दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.
उत्सवांना मर्यादा
याअंतर्गत सण, उत्सव साजरे करण्यावर देखील मर्यादा आल्या आहेत. ब:याच गावांमध्ये या मोहिमेअंतर्गत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली गेली. या संकल्पेनेला देखील योजनेअंतर्गत गुण होते. त्यामुळे अनेक गावांमधील सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या एकवर आली ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब ठरली. ती प्रथा आजही अनेक गावांनी कायम ठेवली आहे. त्याचा फायदा पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी होण्यात तर झालाच शिवाय गावागावातील याअंतर्गत स्पर्धा आणि चढाओढ देखील कमी झाली आहे. परिणामी गावाअंतर्गत भांडणे आणि वाद कमी झाले आहेत.
तंटामुक्तीसारखी योजना दुरगामी परिणाम करणारी ठरली. परंतू काही वर्षातच आलेली उदासिनता तिचे महत्त्व कमी करून जात आहे.