शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षात केवळ एकच गावतंटामुक्त

By admin | Updated: April 9, 2017 13:02 IST

तीन वर्षात केवळ एकच गाव तंटामुक्त घोषीत करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात तर एकही गाव तंटामुक्त करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे या अभियानाचा जिल्ह्यात तरी फज्जाच उडाला आहे.

 ऑनलाई लोकमत/मनोज शेलार  

नंदुरबार, दि.9- तंटामुक्तीत जिल्ह्याचा आलेख गेल्या तीन वर्षापासून खाली आला आहे. तीन वर्षात केवळ एकच गाव तंटामुक्त घोषीत करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षात तर एकही गाव तंटामुक्त करण्यात यश आलेले नाही. त्यामुळे या अभियानाचा जिल्ह्यात तरी फज्जाच उडाला आहे. 
शासनाने गावांची सुधारणा आणि विकासासाठी  विविध योजनांची घोषणा दहा वर्षापूर्वी केली होती. त्यातीलच एक तंटामुक्ती गाव योजना. गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटावे, गावातील एकोपा कायम राहावा, सामाजिक सलोखा टिकावा यासह इतर उद्देशाने 14 ऑगस्ट 2007 रोजी तंटामुक्त गाव मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. योजनेचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता योजनेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे तंटे गावातच सामोपचाराने मिटले. परिणामी न्यायालय आणि पोलिसांवरील ताण ब:याच प्रमाणात मिटला होता. पहिल्याच वर्षी राज्यात लाखोंच्या संख्येने तर जिल्ह्यात काही हजार तंटे निकाली निघाले होते. त्यामुळे दरवर्षी ही योजना अधिक प्रभावीपणे राबविली जाईल अशी अपेक्षा असतांना मात्र, त्या योजनेकडे दुर्लक्षच झाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. 2007-08 नंतर उतरत्या क्रमाने गावे तंटामुक्त होत गेली. गेल्या तीन ते चार वर्षात प्रतिसाद अतिशय थंड आहे. पोलीस विभागाने देखील आपल्यावरील इतर ताण लक्षात घेता या योजनेच्या अंमलबजावणीकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. दोन वर्षापासून तर एकही  गाव तंटामुक्त झालेले नाही. यंदा एकही प्रस्ताव जिल्ह्यातून नसल्याचे समोर आले आहे. असे असले तरी समाधानाची बाब म्हणजे जिल्ह्यातील एकुण ग्रामपंचायतींच्या तुलनेत तंटामुक्त गावांची टक्केवारी 60 टक्केपेक्षा अधीक आहे हे विशेष.
स्पर्धा आणि चढाओढ
आठ वर्षापूर्वी या योजनेत सहभागी होण्यासाठी गावागावांमध्ये स्पर्धा आणि चढाओढ निर्माण झाली होती. शासनाने ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येच्या निकषानुसार बक्षीसांची रक्कम ठरविली आहे. त्यामुळे अनेक गावांना लाखांची बक्षीसे मिळाली आहेत. या बक्षीस रक्कमेतून गावांनी विविध उपक्रम देखील राबविले. त्याचा फायदा गाव विकासाला झाला ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. परंतू नंतर या योजनेची व्याप्ती आणि निकाल घोषीत करण्यासाठीची गुंतागुंत पहाता पोलीस दलाने देखील नंतर काही प्रमाणात दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.
उत्सवांना मर्यादा
याअंतर्गत सण, उत्सव साजरे करण्यावर देखील मर्यादा आल्या आहेत. ब:याच गावांमध्ये या मोहिमेअंतर्गत एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविली गेली. या संकल्पेनेला देखील योजनेअंतर्गत गुण होते. त्यामुळे अनेक गावांमधील सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या एकवर आली ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब ठरली. ती प्रथा आजही अनेक गावांनी कायम ठेवली आहे. त्याचा फायदा पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी होण्यात तर झालाच शिवाय गावागावातील याअंतर्गत स्पर्धा आणि चढाओढ देखील कमी झाली आहे. परिणामी गावाअंतर्गत भांडणे आणि वाद कमी झाले आहेत.
तंटामुक्तीसारखी योजना दुरगामी परिणाम करणारी ठरली. परंतू काही वर्षातच आलेली उदासिनता तिचे महत्त्व कमी करून जात आहे.