शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तीन वर्षानंतर रेल्वे बोगद्याच्या कामस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर सोडविण्यास मदत करणारा नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम अखेर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर सोडविण्यास मदत करणारा नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम अखेर तीन वर्षानंतर सुरू झाले आहे. ठेका देण्यात आलेल्या कंपीनीने तीन वर्षांपूर्वीच रेडीमेड बोगदा तयार करून ठेवला असतांना रेल्वे परवाणगी देत नसल्यामुळे तो संबधीत जागेवर बसविला गेला नव्हता. आता या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.शहरातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. पूर्वी रेल्वे गेटमुळे वाहतुकीचा ताण होता. परंतु १२ वर्षांपूर्वी उड्डाणपुल बांधण्यात आल्यानंतर थोडीफार समस्या सुटली आहे. उड्डाणपुलासह नळवा रस्त्यावर बोगद्याच्या खालून देखील वाहतूक केली जाते. परंतु एकच बोगदा असल्यामुळे एकाचवेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय चारचाकी वाहनांना देखील मर्यादा असतात. त्यामुळे या रस्त्यावर दुसरा बोगदा असावा यासाठीची मागणी करण्यात येत होती. सहा वर्षांपूर्वी त्याला मंजुरीही मिळाली, परंतु निधी वर्ग होत नव्हता.माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आघाडी शासन काळात त्यासाठी निधी मंजुर करून घेतला होता. चार वर्षांपूर्वी बोगदा कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार नाशिक येथील एका कंपनीला हे काम मिळाले. कंपनीने सर्व्हे करून कामाला सुरुवात केली व रेडीमेड बोगदा तयार झाला. गेल्या तीन वर्षांपासून हा बोगदा तयार होऊन धुळखात पडला होता. त्याच्या आजूबाजू मोठ्या प्रमाणावर गवत व झाडे उगली होती. हा बोगदा रेल्वे रुळाखाली बसविण्यासाठी मात्र रेल्वे विभागाकडून त्या कामाला मंजुरी दिली जात नव्हती. अखेर गेल्या महिन्यात रेल्वेने परवाणगी दिली आहे. त्यानुसार आता कामाला सुरुवात करण्यात आली आहे.पुढच्या आठवड्यात तयार झालेले दोन्ही बोगदे हे ठरलेल्या जागेत बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी रेल्वेचा ब्लॉक घेणे गरजेचे नसल्याचे संबधितांनी सांगितले. यासाठी सुरुवातीला रेल्वे रुळाखालील भरावातून गेलेले केबल, ड्रेनेज लाईन, पाईप लाईन आदी हलविले जात आहे. या कामाला आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या असलेल्या बोगद्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाण पाणी वाहत आहे. यामुळे रहदारी वारंवार विस्कळीत होत आहे.या ठिकाणी कच्चे व पक्के अतिक्रमण देखील झाले आहे. ते काढणे देखील गरजेचे ठरणार आहे. त्यासाठी संबधितांना सुचना देण्यात आली. लवकरच हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यानंतर हा रस्ता विस्तृत करून पालिकेतर्फे डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.

नवीन बोगदा झाल्यास दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना ते सोयीचे ठरणार आहे. आधीच बोगदा ते थेट नळवा हद्दीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येवून मध्ये दुभाजक व पथदिवे लावण्यात आले आहेत. दुसरा बोगदाही झाल्यास या रस्त्याच्या सौंदर्यकरणात वाढच होणार आहे.या बोगद्यासाठी व कामासाठी काहींनी विरोध केला होता. त्यासाठी रेल्वेकडे तक्रारी देखील करण्यात आल्याचे समजते. परंतु सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामाला लवकरच गती मिळेल अशी अपेक्षा असतांना तब्बल तीन वर्षाचा कालावधी लोटला.या बोगद्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. याशिवाय पावसाळ्यात बोगद्याखाली साचणारे पाणी आता साचणार नाही. शिवाय दोन्ही बाजूंनी येण्याजाण्यासाठी सोय असल्याने वाहतूक सुटसूटीत होणार आहे.