शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षानंतर रेल्वे बोगद्याच्या कामस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर सोडविण्यास मदत करणारा नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम अखेर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर सोडविण्यास मदत करणारा नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम अखेर तीन वर्षानंतर सुरू झाले आहे. ठेका देण्यात आलेल्या कंपीनीने तीन वर्षांपूर्वीच रेडीमेड बोगदा तयार करून ठेवला असतांना रेल्वे परवाणगी देत नसल्यामुळे तो संबधीत जागेवर बसविला गेला नव्हता. आता या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.शहरातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. पूर्वी रेल्वे गेटमुळे वाहतुकीचा ताण होता. परंतु १२ वर्षांपूर्वी उड्डाणपुल बांधण्यात आल्यानंतर थोडीफार समस्या सुटली आहे. उड्डाणपुलासह नळवा रस्त्यावर बोगद्याच्या खालून देखील वाहतूक केली जाते. परंतु एकच बोगदा असल्यामुळे एकाचवेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय चारचाकी वाहनांना देखील मर्यादा असतात. त्यामुळे या रस्त्यावर दुसरा बोगदा असावा यासाठीची मागणी करण्यात येत होती. सहा वर्षांपूर्वी त्याला मंजुरीही मिळाली, परंतु निधी वर्ग होत नव्हता.माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आघाडी शासन काळात त्यासाठी निधी मंजुर करून घेतला होता. चार वर्षांपूर्वी बोगदा कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार नाशिक येथील एका कंपनीला हे काम मिळाले. कंपनीने सर्व्हे करून कामाला सुरुवात केली व रेडीमेड बोगदा तयार झाला. गेल्या तीन वर्षांपासून हा बोगदा तयार होऊन धुळखात पडला होता. त्याच्या आजूबाजू मोठ्या प्रमाणावर गवत व झाडे उगली होती. हा बोगदा रेल्वे रुळाखाली बसविण्यासाठी मात्र रेल्वे विभागाकडून त्या कामाला मंजुरी दिली जात नव्हती. अखेर गेल्या महिन्यात रेल्वेने परवाणगी दिली आहे. त्यानुसार आता कामाला सुरुवात करण्यात आली आहे.पुढच्या आठवड्यात तयार झालेले दोन्ही बोगदे हे ठरलेल्या जागेत बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी रेल्वेचा ब्लॉक घेणे गरजेचे नसल्याचे संबधितांनी सांगितले. यासाठी सुरुवातीला रेल्वे रुळाखालील भरावातून गेलेले केबल, ड्रेनेज लाईन, पाईप लाईन आदी हलविले जात आहे. या कामाला आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या असलेल्या बोगद्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाण पाणी वाहत आहे. यामुळे रहदारी वारंवार विस्कळीत होत आहे.या ठिकाणी कच्चे व पक्के अतिक्रमण देखील झाले आहे. ते काढणे देखील गरजेचे ठरणार आहे. त्यासाठी संबधितांना सुचना देण्यात आली. लवकरच हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यानंतर हा रस्ता विस्तृत करून पालिकेतर्फे डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.

नवीन बोगदा झाल्यास दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना ते सोयीचे ठरणार आहे. आधीच बोगदा ते थेट नळवा हद्दीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येवून मध्ये दुभाजक व पथदिवे लावण्यात आले आहेत. दुसरा बोगदाही झाल्यास या रस्त्याच्या सौंदर्यकरणात वाढच होणार आहे.या बोगद्यासाठी व कामासाठी काहींनी विरोध केला होता. त्यासाठी रेल्वेकडे तक्रारी देखील करण्यात आल्याचे समजते. परंतु सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामाला लवकरच गती मिळेल अशी अपेक्षा असतांना तब्बल तीन वर्षाचा कालावधी लोटला.या बोगद्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. याशिवाय पावसाळ्यात बोगद्याखाली साचणारे पाणी आता साचणार नाही. शिवाय दोन्ही बाजूंनी येण्याजाण्यासाठी सोय असल्याने वाहतूक सुटसूटीत होणार आहे.