शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

वर्षभरात बदलले तीन पोलीस निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

कोठार : वर्षभरापासून तळोदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक टिकत नसल्याचे चित्र असून, काही महिन्यांतच अधिकारी दुसऱ्या पोलीस ठाण्यात बदलून ...

कोठार : वर्षभरापासून तळोदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक टिकत नसल्याचे चित्र असून, काही महिन्यांतच अधिकारी दुसऱ्या पोलीस ठाण्यात बदलून जात आहेत. गेल्या वर्षभरात तीन पोलीस निरीक्षक बदलून गेले आहेत.

गेल्या वर्षी १९ मे रोजी तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची बदली झाली होती. त्यानंतर राजेश शिंगटे यांची नियुक्ती तळोदा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी करण्यात आली होती. शिंगटे रुजू झाल्यापासून त्यांच्या बदलीबाबत अंदाज लावण्यात येत होते. अखेर १ नोव्हेंबर रोजी त्यांची अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली झाली. त्यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांच्या राहिला. त्यानंतर त्यांच्या जागी ६ नोव्हेंबर रोजी नंदराज पाटील यांची तळोदा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नेमणूक झाली. परंतु त्यांचा कार्यकाळदेखील खूपच अल्पजीवी ठरला. अवघ्या चार महिन्यात फेब्रुवारी अखेरीस त्यांची बदली झाली व त्यांच्या जागी पंडितराव सोनवणे यांच्यावर मागील मार्च महिन्यापासून तळोदा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. म्हणजे अवघ्या वर्षभरात तळोदा पोलीस ठाण्यात तीन पोलीस निरीक्षक बदलले गेले आहेत. सोनवणे यांची नियुक्तीदेखील फार काळ राहणार नसून, येणाऱ्या काही दिवसात त्यांचीदेखील बदली होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांचा कार्यकाळदेखील किती महिन्यांचा ठरेल हे अद्याप तरी निश्चित नसल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, वर्षभरात तीन पोलीस निरीक्षक बदलले गेल्याने पोलीस प्रशासनाच्या कारभारात मागील वर्षभरापासून सुसूत्रता नसल्याचे चित्र आहे. नवीन अधिकारी रुजू होऊन शहरासह संपूर्ण तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती समजून घेत नाही, तोच त्याची बदली होत आहे. नवीन रुजू होणाऱ्या पोलीस निरीक्षकांना नव्याने सर्व परिस्थिती व कार्यप्रणाली समजून घ्यावी लागते. सातत्याने पोलीस अधिकारी बदलत असल्याने गुन्ह्यांच्या तपासावरदेखील त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

तळोदा शहरात शुक्रवारी १४ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भरदुपारी दोन ठिकाणी घरफोडी करत आठ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेत चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे. तळोदा शहरात एकदा चोरीचे सत्र सुरू झाले की, शहरात विविध भागात चार ते पाच महिने सातत्याने चोऱ्या होतात. हा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. हे रोखण्यासाठी व चोरांना तत्काळ जेरबंद करण्यासाठी तळोदा पोलीस ठाण्याला पूर्णवेळ पोलीस निरीक्षक लाभणे गरजेचे आहे. या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांच्या मनातील ही भीती दूर करून पोलीस प्रशासनाविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.

दरम्यान, सातत्याने चार-सहा महिन्यात पोलीस अधिकारी बदलत असल्याने तळोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांनादेखील ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वी शहादा रोडवर एका हॉटेलमध्ये देहविक्रीचा अवैध धंदा सुरू असल्याच्या संशयाने छापा टाकला होता. पोलिसांना त्या ठिकाणी तसे काही आढळून आले नसले तरी त्या हॉटेलमध्ये अनेकांना संशयास्पदरीत्या महिलांचा वावर वेळोवेळी दिसून आलेला होता. याशिवाय मार्च महिन्याच्या अखेरीस तळोदा शहरात सट्टा आकडे घेणाऱ्या दोन जणांना सट्ट्याच्या चिठ्ठ्या व रोख रकमेसह जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रमाणे तळोदा परिसरात गुटखा व दारूची अवैध विक्री तसेच आंतरराज्य तस्करीदेखील मागील वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले जाते. वर्षभरात काही महिन्यांच्या अवधीनंतर पोलीस अधिकारी बदलत असल्याने अवैध धंदेवाल्याचेदेखील चांगलेच फावते आहे.

ग्रामीण भागातदेखील गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, गेल्या वर्षभरात तळोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास चार ते पाच खुनाच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागांत चोरट्याचा उपद्रवदेखील वाढला आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असणारे अवैध धंदे व चोऱ्या रोखण्यासाठी तळोदा पोलीस ठाण्याला किमान दीड ते दोन वर्षे तरी एकच पोलीस निरीक्षक असणे गरजेचे आहे.

प्रशासनातदेखील अडचणी

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासनाकडून वेळोवेळी लॉकडाऊन लावण्यात येत असते. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची मोठी जबाबदारीही पोलीस प्रशासनावर असते. महसूल, आरोग्य, पोलीस प्रशासनातील समन्वय कोरोना आटोक्यात आणताना खूप मोठी भूमिका निभावत असल्याचा अनुभव आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून चार ते सहा महिन्यांत पोलीस निरीक्षक बदलत असल्याने कोरोनाच्या आपत्कालीन काळात अन्य विभाग व पोलीस प्रशासनात समन्वय साधताना अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीतदेखील तळोदा पोलीस ठाण्यात वर्षभरात सातत्याने पोलीस निरीक्षकांच्या बदल्या का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तळोदा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कारभार व प्रशासनावरदेखील सातत्याने पोलीस अधिकारी बदलत असल्याचा परिणाम होत असल्याचे सांगितले जाते. नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विश्वासू बनण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये छुपी स्पर्धादेखील दिसून आली आहे.