शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

घर जाळल्याच्या आरोपाखाली तिघांना सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 21:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महिला बचत गटातर्फे रेशन दुकान चालविणा:या महिलेचे घर पेटवून पाच लाखांचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महिला बचत गटातर्फे रेशन दुकान चालविणा:या महिलेचे घर पेटवून पाच लाखांचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यातील तिघांना शहादा न्यायालयाने पाच वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. उंबराणीपाडा, ता.अक्कलकुवा येथे 8 एप्रिल 2014 रोजी रात्री ही घटना घडली होती.उंबराणीपाडा, ता.अक्कलकुवा येथील दमणीबाई देवला पाडवी ही महिला गावात महिला बचत गटाचे सचिव तसेच महिला बचतगट संचलित स्वस्त धान्य दुकान चालवीत होत्या. गावातीलच शिवाजी धनजी पाडवी, सायसिंग शिवाजी पाडवी, सुभाष धनजी पाडवी यांनी   दमणीबाई व आहटीबाई यांना शिविगाळ करून मारहाण केली होती. त्याबाबत त्यांनी मोलगी पोलिसात फिर्याद दिली. त्याचा राग शिवाजी पाडवी यांना आला होता. त्यातून त्यांनी दमणीबाई यांना ठार मारण्याची व घर पेटवून देण्याची धमकी दिली होती. 8 एप्रिल 2014 रोजी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास दमणीबाई व परिवार झोपले असतांना अचानक त्यांना घर जळत असल्याचे लक्षात आले. त्यांनी जीव जीव वाचविण्यासाठी बाहेर धाव घेतली. त्यावेळी शिवाजी पाडवी व इतर दोनजण पळून जातांना त्यांनी पाहिले. आग विझविण्यासाठी काहीही साधन नसल्याने सर्व घर जळून खाक झाले. घरात 60 हजार रुपये रोख, 14 क्विंटल धान्य, म्हैस, उसनवारीचे 50 हजार रोख, संसारोपयोगी सामान असा एकुण पाच लाखांचे साहित्य जळून खाक झाले होते. याबाबत मोलगी पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरिक्षक गोरक्षनाथ पालवे यांनी तपास करून दोषारोपपत्र शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. न्या. पी.बी.नायकवाड यांच्या कोर्टात हा खटला चालला. साक्षी, पुरावे लक्षात घेता न्या.नायकवाड यांनी शिवाजी धनजी पाडवी, सायसिंग शिवाजी पाडवी, सुभाष धनजी पाडवी सर्व रा.उंबराणीपाडा यांना पाच वर्ष सश्रम कारावास व   दहा हजार रुपये दंड आणि भादंवि कलम 429 मध्ये तीन वर्ष कारावास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.विनोद गोसावी यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून नासिरखान पठाण होते.