शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

तापी-बुराई प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको

By मनोज शेलार | Updated: September 12, 2023 17:12 IST

त्याच माध्यमातून मंगळवारी ३० गावातील शेतकरी एकत्र येत आंदोलन करण्यात आले.

नंदुरबार : गेल्या २३ वर्षांपासून रखडलेली व दोन जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना उपयोगी पडणारी तापी-बुराई उपसा योजनेचे काम मार्गी लागावे या मागणीसाठी ३० गावांमधील हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत रनाळे, ता.नंदुरबार येथे मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले. दरम्यान, नंदुरबार मध्यम प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता चिनावलकर यांनी सुधारीत प्रस्ताव पाठवून निधीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तापी नदीतून पाणी उचलून शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीत पाणी टाकण्याची ही योजना असून या योजनेत नंदुरबार, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मात्र २३ वर्षांपासून ही योजना रखडली आहे. यंदाची दुष्काळी स्थिती पहाता या योजनेसाठी शेतकरी आग्रही आहेत. त्याच माध्यमातून मंगळवारी ३० गावातील शेतकरी एकत्र येत आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री हेमंत देशमुख, शिवसेनेचे (ठाकरे गट) संपर्क प्रमुख दिपक गवते, बाजार समितीचे माजी सभापती डॉ.सयाजी मोरे, धुळ्याचे शाम सनेर, संघर्ष समितीचे दीपक पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील यांनी शेतक्यांना मार्गदर्शन केले. नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी सहा महिन्याच्या आत सुधारीत प्रस्ताव सादर करून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.