शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

तापी-बुराई प्रकल्पासाठी हजारो शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको

By मनोज शेलार | Updated: September 12, 2023 17:12 IST

त्याच माध्यमातून मंगळवारी ३० गावातील शेतकरी एकत्र येत आंदोलन करण्यात आले.

नंदुरबार : गेल्या २३ वर्षांपासून रखडलेली व दोन जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना उपयोगी पडणारी तापी-बुराई उपसा योजनेचे काम मार्गी लागावे या मागणीसाठी ३० गावांमधील हजारो शेतकऱ्यांनी एकत्र येत रनाळे, ता.नंदुरबार येथे मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले. दरम्यान, नंदुरबार मध्यम प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता चिनावलकर यांनी सुधारीत प्रस्ताव पाठवून निधीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तापी नदीतून पाणी उचलून शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीत पाणी टाकण्याची ही योजना असून या योजनेत नंदुरबार, साक्री व शिंदखेडा तालुक्यातील जवळपास सात हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. मात्र २३ वर्षांपासून ही योजना रखडली आहे. यंदाची दुष्काळी स्थिती पहाता या योजनेसाठी शेतकरी आग्रही आहेत. त्याच माध्यमातून मंगळवारी ३० गावातील शेतकरी एकत्र येत आंदोलन करण्यात आले.

यावेळी माजी राज्यमंत्री हेमंत देशमुख, शिवसेनेचे (ठाकरे गट) संपर्क प्रमुख दिपक गवते, बाजार समितीचे माजी सभापती डॉ.सयाजी मोरे, धुळ्याचे शाम सनेर, संघर्ष समितीचे दीपक पाटील, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील यांनी शेतक्यांना मार्गदर्शन केले. नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार चिनावलकर यांनी सहा महिन्याच्या आत सुधारीत प्रस्ताव सादर करून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले.