शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

२७ हजार शेतकऱ्यांना ३८ गावांच्या आचारसंहितेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे़ याचा परिणाम म्हणजे जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे़ याचा परिणाम म्हणजे जिल्ह्यातील २७ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत़ येत्या २९ मार्च रोजी आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या शेतकऱ्यांसाठीचे पोर्टल सुरु होण्याची शक्यता आहे़महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया महिन्याभरापासून वेगात सुरु आहे़ २९ फेब्रुवारी रोजी यांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या याद्या असलेले पोेर्टल सुरु होणार असल्याने प्रशासकीय विभाग, बँका यांनी शाखांमध्ये तयारी पूर्ण केली होती़ परंतू नंदुरबार राज्यातील सात जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने हे जिल्हे वगळून शासनाने इतर जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित केल्या आहेत़ लगतच्या धुळे जिल्ह्यातही शेतकरी कर्जमुक्त योजनेंतर्गत पात्र ठरत असल्याचे कामकाज वेगात सुरु झाले आहे़ जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ही आचारसंहिता असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शेतकºयांना वेठीस धरण्याचे कारण, काय, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे़दरम्यान जिल्हा बँकेने नंदुरबार जिल्ह्यातून पाठवलेल्या १३ हजार शेतकºयांच्या याद्या पूर्णपणे मंजूर करण्यात आल्याची माहिती असून शेतकºयांचे ९० कोटी रुपये माफ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू पोर्टलच सुरु झालेले नसल्याने ग्रामपंचायत आचारसंहिता पूर्ण झाल्यावर नंदुरबार जिल्ह्याचे कामकाज सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत असे आदेश देण्यात आलेले नाहीत़ केवळ पोर्टल सुरु झालेले नसल्याने संबधित विभागाचे म्हणणे आहे़ जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनीही याद्यांची कामे पूर्ण केल्याची माहिती असून शेतकºयांचे आधार अपडेशनही पूर्ण करण्यात आले आहे़जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ३० हजार २९१ शेतकºयांच्या आधार अपडेशनचे काम पूर्ण करण्यात आले होते़ यातील २६ हजार शेतकºयांची नावे शासनाने कर्जमाफीसाठी अंतिम करत कामकाज सुरु केले होते़ २९ रोजी ही नावे याद्यांद्वारे पोर्टलवरुन प्रकाशित होणार होती़ परंतू ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता त्याच्या आड आली आहे़ यात जिल्हा बँकेचे एकूण १३ हजार ८९३ तर ११ राष्ट्रीयकृत बँकांचे १२ हजार १०७ शेतकरी आहेत़ धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ८९ कोटी रुपये कर्ज माफ होणार असल्याने बँकेने सर्व कामकाज पूर्ण करुन ठेवले होते़ तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची कर्जमाफीची प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने असल्याने त्यांच्याकडून जिल्ह्यातील रकमेचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही़४कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या याद्या पोर्टलवरुन प्रकाशित होणार असल्याने जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बॅकांची तयारी पूर्ण झाली होती़ नंदुरबार तालुक्यातील नांदरखेडा आणि खोंडामळी येथील शेतकºयांसाठी करण्यात आलेल्या कामकाजाची येथे पुनरावृत्ती होणार होती़ यासाठी शेतकºयांचे अंगठ्याचे ठसे घेण्यात येणार होते़ यासाठी बहुतांश शाखांमध्ये थंब मशिन आणून तयारी झाली होती़ परंतू आचारसंहितेमुळे खोडा लागल्याने हे कामकाज लांबणीवर पडले असल्याची माहिती आहे़४येत्या २९ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आचारंसहिता आटोपणार असली तरी महिनाभर कर्जमाफीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे़ प्रत्यक्षात एप्रिलमध्ये कर्जमाफी होणार असल्याचे सांगण्यात येऊन खरीपासाठी पीक कर्ज घेऊ इच्छिणाºया शेतकºयांना याचा कोणताही फटका बसणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ हा निवडणूक कार्यक्रम आटोपल्यानंतर पुढील कोणताही कार्यक्रम नसल्याने कर्जमाफी प्रक्रियेला वेग देण्याचे संकेत आहेत़