शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

२७ हजार शेतकऱ्यांना ३८ गावांच्या आचारसंहितेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे़ याचा परिणाम म्हणजे जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे़ याचा परिणाम म्हणजे जिल्ह्यातील २७ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत़ येत्या २९ मार्च रोजी आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या शेतकऱ्यांसाठीचे पोर्टल सुरु होण्याची शक्यता आहे़महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया महिन्याभरापासून वेगात सुरु आहे़ २९ फेब्रुवारी रोजी यांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या याद्या असलेले पोेर्टल सुरु होणार असल्याने प्रशासकीय विभाग, बँका यांनी शाखांमध्ये तयारी पूर्ण केली होती़ परंतू नंदुरबार राज्यातील सात जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने हे जिल्हे वगळून शासनाने इतर जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित केल्या आहेत़ लगतच्या धुळे जिल्ह्यातही शेतकरी कर्जमुक्त योजनेंतर्गत पात्र ठरत असल्याचे कामकाज वेगात सुरु झाले आहे़ जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ही आचारसंहिता असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शेतकºयांना वेठीस धरण्याचे कारण, काय, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे़दरम्यान जिल्हा बँकेने नंदुरबार जिल्ह्यातून पाठवलेल्या १३ हजार शेतकºयांच्या याद्या पूर्णपणे मंजूर करण्यात आल्याची माहिती असून शेतकºयांचे ९० कोटी रुपये माफ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू पोर्टलच सुरु झालेले नसल्याने ग्रामपंचायत आचारसंहिता पूर्ण झाल्यावर नंदुरबार जिल्ह्याचे कामकाज सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत असे आदेश देण्यात आलेले नाहीत़ केवळ पोर्टल सुरु झालेले नसल्याने संबधित विभागाचे म्हणणे आहे़ जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनीही याद्यांची कामे पूर्ण केल्याची माहिती असून शेतकºयांचे आधार अपडेशनही पूर्ण करण्यात आले आहे़जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ३० हजार २९१ शेतकºयांच्या आधार अपडेशनचे काम पूर्ण करण्यात आले होते़ यातील २६ हजार शेतकºयांची नावे शासनाने कर्जमाफीसाठी अंतिम करत कामकाज सुरु केले होते़ २९ रोजी ही नावे याद्यांद्वारे पोर्टलवरुन प्रकाशित होणार होती़ परंतू ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता त्याच्या आड आली आहे़ यात जिल्हा बँकेचे एकूण १३ हजार ८९३ तर ११ राष्ट्रीयकृत बँकांचे १२ हजार १०७ शेतकरी आहेत़ धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ८९ कोटी रुपये कर्ज माफ होणार असल्याने बँकेने सर्व कामकाज पूर्ण करुन ठेवले होते़ तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची कर्जमाफीची प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने असल्याने त्यांच्याकडून जिल्ह्यातील रकमेचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही़४कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या याद्या पोर्टलवरुन प्रकाशित होणार असल्याने जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बॅकांची तयारी पूर्ण झाली होती़ नंदुरबार तालुक्यातील नांदरखेडा आणि खोंडामळी येथील शेतकºयांसाठी करण्यात आलेल्या कामकाजाची येथे पुनरावृत्ती होणार होती़ यासाठी शेतकºयांचे अंगठ्याचे ठसे घेण्यात येणार होते़ यासाठी बहुतांश शाखांमध्ये थंब मशिन आणून तयारी झाली होती़ परंतू आचारसंहितेमुळे खोडा लागल्याने हे कामकाज लांबणीवर पडले असल्याची माहिती आहे़४येत्या २९ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आचारंसहिता आटोपणार असली तरी महिनाभर कर्जमाफीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे़ प्रत्यक्षात एप्रिलमध्ये कर्जमाफी होणार असल्याचे सांगण्यात येऊन खरीपासाठी पीक कर्ज घेऊ इच्छिणाºया शेतकºयांना याचा कोणताही फटका बसणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ हा निवडणूक कार्यक्रम आटोपल्यानंतर पुढील कोणताही कार्यक्रम नसल्याने कर्जमाफी प्रक्रियेला वेग देण्याचे संकेत आहेत़