शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

२७ हजार शेतकऱ्यांना ३८ गावांच्या आचारसंहितेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे़ याचा परिणाम म्हणजे जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे़ याचा परिणाम म्हणजे जिल्ह्यातील २७ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत़ येत्या २९ मार्च रोजी आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या शेतकऱ्यांसाठीचे पोर्टल सुरु होण्याची शक्यता आहे़महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया महिन्याभरापासून वेगात सुरु आहे़ २९ फेब्रुवारी रोजी यांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या याद्या असलेले पोेर्टल सुरु होणार असल्याने प्रशासकीय विभाग, बँका यांनी शाखांमध्ये तयारी पूर्ण केली होती़ परंतू नंदुरबार राज्यातील सात जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने हे जिल्हे वगळून शासनाने इतर जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित केल्या आहेत़ लगतच्या धुळे जिल्ह्यातही शेतकरी कर्जमुक्त योजनेंतर्गत पात्र ठरत असल्याचे कामकाज वेगात सुरु झाले आहे़ जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ही आचारसंहिता असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शेतकºयांना वेठीस धरण्याचे कारण, काय, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे़दरम्यान जिल्हा बँकेने नंदुरबार जिल्ह्यातून पाठवलेल्या १३ हजार शेतकºयांच्या याद्या पूर्णपणे मंजूर करण्यात आल्याची माहिती असून शेतकºयांचे ९० कोटी रुपये माफ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू पोर्टलच सुरु झालेले नसल्याने ग्रामपंचायत आचारसंहिता पूर्ण झाल्यावर नंदुरबार जिल्ह्याचे कामकाज सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत असे आदेश देण्यात आलेले नाहीत़ केवळ पोर्टल सुरु झालेले नसल्याने संबधित विभागाचे म्हणणे आहे़ जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनीही याद्यांची कामे पूर्ण केल्याची माहिती असून शेतकºयांचे आधार अपडेशनही पूर्ण करण्यात आले आहे़जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ३० हजार २९१ शेतकºयांच्या आधार अपडेशनचे काम पूर्ण करण्यात आले होते़ यातील २६ हजार शेतकºयांची नावे शासनाने कर्जमाफीसाठी अंतिम करत कामकाज सुरु केले होते़ २९ रोजी ही नावे याद्यांद्वारे पोर्टलवरुन प्रकाशित होणार होती़ परंतू ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता त्याच्या आड आली आहे़ यात जिल्हा बँकेचे एकूण १३ हजार ८९३ तर ११ राष्ट्रीयकृत बँकांचे १२ हजार १०७ शेतकरी आहेत़ धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ८९ कोटी रुपये कर्ज माफ होणार असल्याने बँकेने सर्व कामकाज पूर्ण करुन ठेवले होते़ तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची कर्जमाफीची प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने असल्याने त्यांच्याकडून जिल्ह्यातील रकमेचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही़४कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या याद्या पोर्टलवरुन प्रकाशित होणार असल्याने जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बॅकांची तयारी पूर्ण झाली होती़ नंदुरबार तालुक्यातील नांदरखेडा आणि खोंडामळी येथील शेतकºयांसाठी करण्यात आलेल्या कामकाजाची येथे पुनरावृत्ती होणार होती़ यासाठी शेतकºयांचे अंगठ्याचे ठसे घेण्यात येणार होते़ यासाठी बहुतांश शाखांमध्ये थंब मशिन आणून तयारी झाली होती़ परंतू आचारसंहितेमुळे खोडा लागल्याने हे कामकाज लांबणीवर पडले असल्याची माहिती आहे़४येत्या २९ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आचारंसहिता आटोपणार असली तरी महिनाभर कर्जमाफीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे़ प्रत्यक्षात एप्रिलमध्ये कर्जमाफी होणार असल्याचे सांगण्यात येऊन खरीपासाठी पीक कर्ज घेऊ इच्छिणाºया शेतकºयांना याचा कोणताही फटका बसणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ हा निवडणूक कार्यक्रम आटोपल्यानंतर पुढील कोणताही कार्यक्रम नसल्याने कर्जमाफी प्रक्रियेला वेग देण्याचे संकेत आहेत़