शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

२४ तासात झाल्या कोरोनाच्या हजार चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 12:36 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :   एक हजारातून केवळ ३० व्यक्ती कोरोना पॅाझिटिव्ह आले आहेत. येथील आरटीपीसीआर लॅबमधून ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :   एक हजारातून केवळ ३० व्यक्ती कोरोना पॅाझिटिव्ह आले आहेत. येथील आरटीपीसीआर लॅबमधून २४ तासात तब्बल एक हजार स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी अवघी तीन टक्के इतकी आहे. त्यात सर्वाधिक शिक्षकांचा समावेश आहे. नववी ते बारावीपर्यंत शिकविणा-या  सर्वच शिक्षकांची  कोरोना तपासणी पुर्ण झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. नववी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या वर्गांना शिकविणा-या सर्वच शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या शिक्षकांची संख्या तब्बल चार हजार १४१ इतकी होती. याशिवाय शिक्षकेतर कर्मचारींची संख्या एक हजार १५८ इतकी आहे. त्या सर्वांची कोरोना चाचणी शुक्रवारी पुर्ण करण्यात आली. एक हजार अहवालजिल्ह्यातील एक हजार जणांची स्वॅब तपासणी दोन दिवसात करण्यात आली. त्याचा एकत्रीत अहवाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ९७७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल जाहीर करण्यात आले. त्यात २९ जण पॅाझिटिव्ह आले. त्यातील नंदुरबार तालुक्यात पाच, नवापूर तालुक्यात दोन, अक्कलकुवा तालुक्यात आठ, तळोदा तालुक्यात दोन, शहादा तालुक्यात ११ जिल्हाबाहेरील एक अशा २९ जणांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील १८ जणांचे अहवाल जाहीर करण्यात आले. त्यातील एकाचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. शिक्षक व्यतिरिक्त इतरांची स्वॅब तपासणी मंदावलीगेल्या आठ दिवसांपासून शिक्षकांची स्वॅब तपासणी करण्यात येत असल्यामुळे अनेक स्वॅब संकलन केंद्रात त्यांच्याच रांगा दिसून येत होत्या. त्यामुळे इतर सामान्य लोकांची स्वॅब तपासणीच जिल्ह्यात मंदावली आहे. परिणामी कोरोना पॅाझिटिव्हचा आकडा देखील कमी येत होता. वास्तविक दिवाळीच्या काळात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडले. प्रवास मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु स्वॅब संकलन आणि तपासणीच झाली नसल्याने कोरोना पॅाझिटव्ह पुढे आले नाहीत.संक्रमण वाढण्याचा धोकागुजरातमधील वाढता प्रादुर्भाव, सिमेवर न होणारी तपासणी, नागरिकांची सर्रास ये-जा यामुळे जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यातच सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. परिणामी विविध आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यातच कोरोनाचे रुग्ण देखील निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता स्वॅब संकलन मोठ्या संख्येने होणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा धोका यापूर्वीच वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.