शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

कोरोनाबाबत सूचना न पाळणाऱ्यांना वर्षभरात अडीच कोटींचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:31 IST

कोरोनाकाळात पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. या काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत असताना ...

कोरोनाकाळात पोलिसांवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. या काळात नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होत असताना अनेक ठिकाणी पोलिसांमधल्या माणुसकीचेही दर्शन घडले. गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृद्ध आणि निराधारांना सहकार्य, नागरिकांना मार्गदर्शनातही पोलीस कर्मचारी व्यस्त दिसले. या कालावधीत तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आणि इतर काहींना कोरोनाशी झुंज द्यावी लागली. पण, पोलिसांनी आपले कर्तव्य कठोरपणे पार पाडले.

लॉकडाऊन असो वा जनता कर्फ्यू, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पोलीस कर्मचारी व्यस्त दिसले. नियम तोडणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासोबत अनावश्यक रस्त्यावर फिरणारे, मास्क न घालणारे, सामाजिक अंतराचे पालन न करणारे, संचारबंदी मोडणाऱ्यांविरोधात पोलिसांनी दंडात्मक कारवाईदेखील केली. जिल्ह्यातील १२ पोलीस ठाण्यांतर्गत कोविड नियमांच्या उल्लंघनाबाबत सहा हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून सहा हजार ६१७ व्यक्तींकडून ३१ लाख २३ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

मास्क न लावणाऱ्या २६ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना ६० लाख ५६ हजार रुपये दंड आकारण्यात आला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या एक लाख २१ हजार ९५१ प्रकरणांत एक कोटी ५४ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून ३९ लाख ६१ हजार रुपये वसूल करण्यात येणार आहे.

पोलीस हा नागरिकांचा मित्र आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येकाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्व मिळूनच कोरोनावर मात करता येईल. नियमांचे उल्लंघन केल्याने कोरोना संसर्ग वाढत असल्याने यापुढेदेखील नियमभंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी पोलीसमित्र म्हणून प्रशासनाला सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन पंडित यांनी केले आहे.