शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

नंदुरबारातील 30 हजार शेतकरी पंचनाम्याच्या प्रतिक्षेत

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Updated: December 27, 2017 13:23 IST

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अद्यापही जिल्ह्यातील 30 हजार बोंडअळीग्रस्त शेतकरी कृषी विभागाच्या पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रापैकी केवळ 12 हजार हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे करण्यात आले आह़े त्यामुळे येत्या 10 ते 12 दिवसात उर्वरीत बोंडअळीग्रस्त शेतक:यांच्या क्षेत्राचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़ेजिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ...

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अद्यापही जिल्ह्यातील 30 हजार बोंडअळीग्रस्त शेतकरी कृषी विभागाच्या पंचनाम्याच्या प्रतिक्षेत आह़े जिल्ह्यात बोंडअळीग्रस्त क्षेत्रापैकी केवळ 12 हजार हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे करण्यात आले आह़े त्यामुळे येत्या 10 ते 12 दिवसात उर्वरीत बोंडअळीग्रस्त शेतक:यांच्या क्षेत्राचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़ेजिल्ह्यासह संपूर्ण राज्यात यंदा बोंडअळीने थैमान घातले आह़े यात काळ्यामातीत पांढरे सोनं पिकवणारा शेतकरी पूरता भरडला जात आह़े परंतु प्रशासनाच्या चालढकलपणामुळे त्याला पहिले आसमानी व आता सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत असल्याचे वृत्त आह़े अद्यापर्पयत जिल्ह्यातील एकूण बोंडअळीग्रस्त क्षेत्रापैकी केवळ 25 ते 30 टक्केच पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आह़े जिल्ह्यातील एकूण 1 लाख 2 हजार हेक्टर कापसाच्या क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्र म्हणजे सुमारे 50 हजार हेक्टर क्षेत्र हे बोंडअळीग्रस्त असल्याची राज्य कृषी विभागाची माहिती आह़े त्यापैकी 26 डिसेंबर्पयत मिळालेल्या माहितीनुसार केवळ 12 हजार हेक्टर क्षेत्राचेच पंचनामे झाले आह़े जिल्ह्यातील एकूण 11 हजार 462 शेतक:यांच्या बोंडअळीग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले असल्याची माहीती देण्यात आली़ त्यामुळे अद्यापही साधारणत 30 हजार शेतकरी अद्याप पंचनाम्यापासून वंचित आहेत़ दरम्यान, जिल्ह्यात एकूण 1 लाख 47 हजार खातेदार शेतकरी आह़े बोगस प्रस्तावांची संख्या अधिक.जिल्ह्यात एकूण 50 हजार हेक्टर क्षेत्र बोंडअळीग्रस्त आह़े त्यात सुमारे 40 ते 42 हजार शेतक:यांचा समावेश होतो़ परंतु प्रत्यक्षात कृषी विभागाकडून 45 ते 50 हजार शेतक:यांचे प्रस्ताव दाखल झाले आहेत़ त्यातील काहींनी तर कृषी विभागाचे कर्मचारी पंचनामे करीत असतांनाच आपला अजर्ही लगोलग सादर केला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली़ त्यामुळे यातील काही अर्ज बोगस असल्याचाही अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आह़े दरम्यान एकटय़ा शहादा तालुक्यातूनच 12 हजार अर्ज आले आहेत़ त्यामुळे शेतक:यांनी केलेल्या अर्जाबाबत कृषी विभागाकडून शंका व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान असे असले तरी, ज्या शेतक:यांच्या पांढ:या सोन्याला खरोखर बोंडअळीने खाल्ले आहे               अशा ख:या लाभाथ्र्याची मात्र यात हेडसांड होत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी शेतक:यांकडून करण्यात येत आह़े