शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

मलगाव ते सटीपाणी रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ आदिवासी भागातील गाव व पाड्यांना जोडणारा मलगाव ...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ आदिवासी भागातील गाव व पाड्यांना जोडणारा मलगाव ते सटीपाणी हा सात किलोमीटरचा रस्ता आहे. शिरपूर तालुक्याकडून वाडी-चिकसे ते सटीपाणी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काही वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, सटीपाणी ते मलगाव हा नंदुरबार जिल्हा व शहादा तालुक्याला जोडणारा रस्ता नदी-नाल्यातून व डोंगराळ, तसेच जंगलातून जात असल्याने सटीपाणी हे गाव तालुका व जिल्ह्याच्या संपर्कात येत नसल्याने येथील आदिवासी बांधवांची वर्षानुवर्षे पायपीट सुरू होती. सटीपाणी येथील विद्युतीकरणाच्या उद्घाटनासाठी तत्कालीन आमदार व आताचे पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी हे मलगाव येथून मोटारसायकलीने सटीपाणी याठिकाणी पोहोचले होते. तेव्हा तेथील समस्यांचे दर्शन आमदारांना घडले होते. अखेर सटीपाणी ते मलगाव या सात किलोमीटर रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चार कोटी २२ लाख रुपये खर्चाच्या कामास मंजुरी मिळाली व फेब्रुवारी २०१७ पासून कामास प्रारंभही झाला. मात्र, हा रस्ता वनक्षेत्रातून जात असल्याने काम सुरू होण्यास अडचणी आल्या होत्या. वनविभागाच्या सर्व प्रकारच्या मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र, ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याने रस्त्याचे बारा वाजले आहेत. तांत्रिकदृष्ट्या सदोष पद्धतीने काम झाल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

मोऱ्यांची कामे अपूर्ण

या रस्त्यावरील अनेक नदी-नाल्यांवर पूल व पाइप मोऱ्यांची कामे अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. अनेक ठिकाणी मोऱ्यांसाठी रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून चाऱ्या खोदण्यात आल्या आहेत. मात्र, तेथे पाइप टाकले जात नसल्याने चाऱ्यांमुळे वाहन रस्त्यावरून जाऊ शकत नाही. सध्या पावसाळा सुरू असल्याने व खोदलेल्या चाऱ्यामुळे पर्यायी मार्गाने चिखलातून लोकांना आपल्या वाहनाने यावे-जावे लागत आहे. त्यामुळे अनेकदा वाहने चिखलात फसतात, घसरतात व लहान-मोठे अपघात होतात. लाखो रुपये खर्च करूनही आदिवासी बांधवांना या रस्त्यावरून जाणे कसरतीचे ठरत असल्याने ठेकेदाराच्या व संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी पुलाचे काम झाले; परंतु पुलावर दोन्ही बाजूला कठडे बांधले नसल्याने वाहनधारक रात्री-बेरात्री पुलावरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अपघात होऊन जीवितहानी झाल्यास यास जबाबदार कोण राहील, ठेकेदार की बांधकाम विभाग, असा प्रश्न उपस्थित होत आहे.