शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाची कसरत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यात कोरोना विषाणू बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाने शहादा शहर ८ जुलैपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यात कोरोना विषाणू बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाने शहादा शहर ८ जुलैपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याचे आदेश दिले होते. बुधवारी हा कालावधी संपला असून गेल्या चार दिवसाच्या कालावधीत प्रशासनाच्या आदेशाचे नागरिकांनी समर्थन केले असले तरी गुरुवारपासून लॉकडाऊन हटविल्यानंतर बाजारात होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी मोठी कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.प्रशासनाने रुग्णालय, औषध विक्रेते, शासकीय कार्यालय व दूध विक्रेते वगळता किराणा दुकाने, भाजीपाला यासह सर्व प्रतिष्ठान बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परिणामी गेल्या चार दिवसात याचे चांगले परिणाम दिसून आले असले तरी ९ जुलैपासून लॉकडाऊन हटविले जाणार असल्याने किराणा व भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात होणारी नागरिकांची गर्दी थोपविण्यासह नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मार्च महिन्यापासून ४ जुलैपर्यंतचा कालावधीत पहिल्यांदाच किराणा दुकाने व भाजीपाला लॉकडाऊन दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. याचे नागरिकांनी तंतोतंत पालन केल्याने नव्याने शहरात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आलेला नाही. ही सकारात्मक बाब असली तरी गेल्या १० दिवसांपासून बाधीत रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याने शहरात कोरोना विषाणूची साखळी ब्रेक झाली किंवा नाही याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.मागील नऊ दिवसांपासून अहवाल प्रलंबित आहेत. त्यामुळे पुढील हालचालीस मर्यादा येत आहेत. एकदम सर्व अहवाल आल्यास दुर्दैवाने कोरोना विषाणू बाधीत अहवाल आल्यास त्या रुग्णाच्या अतिसंपर्कातील नागरिकांचा शोध घेऊन बाधीत रुग्णाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यासह कंटेन्टमेंट झोन बनविणे, बाधीत रुग्णाची प्रवास व इतर माहिती जाणून घेणे या सर्व बाबतीत अडचण निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे प्रशासनावर अतिरिक्त ताण पडणार आहे. स्वॅबचे नमुने घेतल्यानंतर त्याची तपासणी होऊन लवकर अहवाल मिळावा यासाठी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेची गरज आहे.-डॉ.चेतन गिरासे, प्रांताधिकारी, शहादा.