शहरं
Join us  
Trending Stories
1
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
2
भविष्यवाणी खरी ठरणार? जगन्नाथ मंदिराच्या कळसावर पक्ष्यांचे थवे, 'भविष्य मालिका' ग्रंथात उल्लेख...
3
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
4
"१०० वेळा विचार करेल, आत्मा थरथरेल..."; पहलगाम हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची मागणी
5
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
6
ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती
7
२०२६ मध्ये भारतीय बाजारात 'धमाका' करण्याच्या तयारीत किआ! घेऊन येतेय ३ ढासू मॉडेल, EV चाही समावेश
8
'धुरंधर'मधला 'तो' सीन अन् सौम्या टंडनने अक्षय खन्नाच्या तब्बल ७ वेळा कानाखाली मारली, म्हणाली- "खूप वाईट..."
9
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
10
१० वर्षांची प्रतीक्षा संपली, नेपाळला जाणाऱ्यांसाठी खूशखबर; आता बिनधास्त घेऊन जा २००, ५०० ची नोट
11
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
12
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
13
Leopard Pune: 'बिबट्या दिसला तर पळू नका', पुण्यातील आयटी पार्कही दहशतीत! cognizant कंपनीने कर्मचाऱ्यांना काय सांगितलं?
14
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
15
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
16
Latur Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
17
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
18
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
19
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
20
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

33 गावातील अनेक कुटूंबे बुडीताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाची पाणी पातळी 138.68 मिटरवर झाल्याने महाराष्ट्रातील डूब क्षेत्रातील 33 गावांमधील बाधीतांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पाची पाणी पातळी 138.68 मिटरवर झाल्याने महाराष्ट्रातील डूब क्षेत्रातील 33 गावांमधील बाधीतांचे घर, शेती बुडीतात जात आहे. अनेकांना विस्थापीत होण्याची वेळ आली असतांना प्रशासन ढिम्म आहे. बुडीतांचे पंचनामे करून तातडीने जे बाधीत घोषीत व्हावयचे असतील त्यांना तातडीने घोषीत करावे या मागणीसाठी नर्मदा आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिका:यांशी चर्चेनंतर निवेदन देण्यात आले.सरदार सरोवर प्रकल्प यंदा पुर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे राज्यातील धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील 33 गावांमधील स्थिती विदारक झाली आहे. जे कुटूंब अद्यापही बुडीत क्षेत्रात आहेत त्यांची स्थिती विदारक आहे. त्याकडे शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नर्मदा बचाओ आंदोलनातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. जिल्हाधिका:यांशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरदार सरोवर पुर्ण क्षमतेने भरण्यास मंजुरी देणे हा विरोधाभास व राजकीय कारस्थानाचा भाग दिसून येतो. यापूर्वी झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 15 ऑक्टोबर र्पयत धरण पुर्ण संचय पातळीर्पयत म्हणजेच 138.68 मिटर एवढे भरणे अपेक्षीत होते. यापूर्वी दिलेल्या निवेदनातही याबाबत सुचित करण्यात आले होते. परंतु तसे झाले नाही. पाणी पातळी 122 मिटर र्पयत ठेवण्यासाठी संबधीत विभागाला अवगत करावे असे ठरलेले असतांना त्याकडे दुर्लक्ष झाले. बुडीतात आलेली घरे, शेती याबाबत उपाययोजना कराव्या व बुडीतांचे पंचनामे करावे. प्रकल्पबाधीतांसाठी जमीन खरदेची प्रक्रिया राबवावी. वेळापत्रक लावून सिमांकन व भू-अभिलेख तयार करण्याची कामगिरी पुढे न्यावी. ज्या प्रकल्पबाधीतांची घरे, जमिनी 138.68 च्या खाली आजही आहेत व जे घोषीत नाहीत त्यांना तात्काळ घोषीत करून त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न सोडवावा. भूसंपादन, सिंचनसुविधा, घरप्लॉट देणे, सिमांकन, सातबारा  आदी पुनर्वसनाची कामे गतीने पुढे जाणे अपेक्षीत होते ते मात्र झाले नाही. ज्यांची घरे बुडाली त्यांना तात्काळ तात्पुरते निवारे बांधून देणे नर्मदा विकास विभागाचे काम आहे ते झालेले नाही. मणिबेली येथील नर्मदा जीवन शाळा पाण्याने वेढली गेली आहे. सर्वच 33 गावे पाण्याखाली गेल्याने बाधितांना खाण्यास अन्न नाही, राहण्यास जागा नाही. सरकारी यंत्रणा केवळ दौरे करण्यात व्यस्त असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला.जिल्हाधिका:यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी सर्व प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी ओरसिंग पटले, किरसिंग वसावे किर्ता वसावे, नुरजी वसावे, चेतन साळवे, लतिका राजपूत यांच्यासह आंदोलक सहभागी झाले होते. नर्मदा जीवन शाळेला देखील पाण्याचा वेढा पडला आहे. विषारी सर्प, मगरी आणि इतर सरपटणारे प्राणी यांचा धोका विद्याथ्र्याना आहे. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याना आता या आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. शिक्षणावरही त्यांचा परिणाम होत आहे. यावेळी जीवन शाळेतील विद्यार्थी देखील मोठय़ा संख्येने उपस्थित होते. त्यांनी आदिवासी भाषेत गाणी गात लक्ष वेधले.