शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

पाण्याचा बहाणा आणि वाळू उपसा होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव होऊनही त्यातून वाळू उपसा करण्यास परवानगी देत नाही, आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर परराज्यातील ...

नंदुरबार : जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव होऊनही त्यातून वाळू उपसा करण्यास परवानगी देत नाही, आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर परराज्यातील वाळूची बिनधिक्कत वाहतूक होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. अशा वाहतुकीवर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याची स्थिती आहे.

जिल्ह्यातील तीन वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया दोन महिन्यांपूर्वी पार पडली. त्यात तापीवरील तिन्ही वाळू घाटांचा समावेश आहे. त्यात टेंभा, ता.शहादा, कौठळ, ता.शहादा व कुऱ्हावदतर्फे सारंगखेडा, ता. शहादा या वाळू घाटांचा समावेश आहे. त्यापैकी टेंभा येथील वाळू घाटाचा लिलाव पहिल्या फेरीत झाला. त्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कोट्यवधी रुपयांचा घेतलेल्या या घाटातून मात्र प्रशासन वाळू उपसा करण्यास परवानगीच देत नसल्याची स्थिती आहे. त्या ठिकाणी पाणी असल्यामुळे वाळू उपसा करता येणार नसल्याचे प्रशासनाचे म्हणने आहे. या ठिकाणी जर पाणी राहत होते व राहणार होते तर या वाळू घाटाचा लिलावच का करण्यात आला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता गेल्या महिन्यात दुसऱ्या वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला. त्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. गेल्या आठवड्यात तिसऱ्या वाळू घाटासाठी पुन्हा निविदा काढण्यात आली आहे.

जिल्ह्यात आहे त्या वाळू घाटातून उपशाला परवानगी दिली जात नसताना दुसरीकडे गुजरातमधील वाळू जिल्ह्यातून सर्रास जात आहे. शिवाय त्याचा साठाही होत आहे. त्याकडे प्रशासनाने मात्र कानाडोळा केला आहे. यामुळे अवैध वाळू वाहतूकदारांचे फावले आहे.

टेंभा, ता.शहादा येथील वाळू घाटात पाणी असल्यामुळे या ठिकाणातून वाळू उपसा करता येत नाही. हा घाट कोरडा झाल्यावर लागलीच त्यातून वाळू उपशाला परवानगी दिली जाईल. दुसऱ्या घाटाची ठेकेदाराला हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तिसऱ्या घाटाची लवकरच लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

-रोहिणी चव्हाण,

उपजिल्हाधिकारी,

गौण खनिज विभाग, नंदुरबार.