शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

औषधी वनस्पतींच्या किमतीत झाली मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रतिकुल भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम भागात फारशी शेती करता येत नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना औषधी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रतिकुल भौगोलिक परिस्थितीमुळे दुर्गम भागात फारशी शेती करता येत नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना औषधी वनस्पतींवर उदरनिर्वाह करावा लागतो. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५० टक्केपेक्षा अधिक किमती घटल्यामुळे नागरिकांचा उदरनिर्वाह संकटात सापडला आहे.धडगाव व मोलगी भागात बागायती शेतींचा अभाव आहे, त्यातच सिंचनायोग्य पाऱ्याची कुठलीही सुविधा नसल्यामुळे या भागातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ही केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. डोंगर-उतार, दगड-गोट्यांच्या शेतजमिनी असल्यामुळे शेतातील उत्पादन अत्यल्प असते. त्या उत्पन्नावर कुठल्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. वर्षभराच्या पोटापाण्यासाठी प्रत्येक कुटुंबांकडून किरकोळ पिके, स्थलांतरीत मजूरी व राना-वनातील औषधी वनस्पतींवर अवलंबून राहावे लागत आहे.यंदा खरीप हंगामातील किरकोळ शेतीची कामे आटोपून काही नागरिक रोजगारासाठी परजिल्हा व परराज्यात स्थलातरीत झाले आहेत. तर मुळगावी थांबलेल्या नागरिकांकडून पावसाळ्याच्या कालावधीत रानावनात उगलेल्या औषधी वनस्पती, त्यांच्या बिया, पाला, मुळे, साली, फुले गोळा करण्यात येत आहे. हे सर्व घटक औषधे निर्मितीसाठी वापरले जात असल्याचे धडगाव व मोलगी बाजारपेठेतील व्यापाºयांमार्फत सांगण्यात येते. आयुर्वेद तथा आरोग्याच्या दृष्टीने हे सर्वच घटक मोलाचे ठरतात. परंतु यंदाच्या हंगामात त्यांना दोन्ही बाजारपेठेत समाधानकारक भाव मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.दुर्गम भागात गोळा केले जाणाºया कुठल्याच औषधी वनस्पतींना बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्यामुळे या वनस्पींवर उदरनिर्वाह करणाºया कुटुंबांचे आर्थिक गणित चुकत आहे. वर्षभरासाठी याच कालावधीत नियोजन केल्यास वर्षभर पोटापाण्याचा फारसा प्रश्न उद्भवत नाही. परंतु या वनस्पींपासून मिळणाºया उत्पदनालाच योग्य भाव मिळत नसल्याने कुटुंबच संकटात सापडले असल्याचे म्हटले जात आहे.४दुर्गम भागात कडू जिरा याची वनस्पती देखील आढळून येत आहे. ही वनस्पती राना-वनाचत नव्हे तर काही शेतकºयांकडून त्यांची शेतातही लागवड करण्यात येत आहे. या नवस्पतीपासून मिळणाºया मालाला मागील वर्षी २५० रुपये प्रतीकिलो भाव दिला जात होता. याच उत्पादनाला यंदा केवळ ६० रुपये प्रतीकिलोला भाव दिला जात आहे. त्यामुळे यात ७४ टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादकाच्या नाकी नऊ येत आहे.४धडगाव व मोलगी येथील व्यापाºयांमार्फत खरेदी करण्यात येणारी औषधी वनस्पती ही प्रामुख्याने इंदैरच्या बाजारपेठेत पाठवली जात आहे. तेथून भारतभरातील औषधी कंपन्यांमार्फत खरेदी केली जात आहे.