शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
3
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
4
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
5
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
6
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
7
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
8
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
9
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
10
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
11
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
12
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
13
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
14
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
15
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
16
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
17
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
18
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
19
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
20
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...

तळोदा तालुक्यात पाचशे फुट खोदूनही पाण्याचा सुगावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 20:22 IST

सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावलसह लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने अनेक जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे परिसरातील व्यापारी पिकांचा ...

सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावलसह लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने अनेक जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे परिसरातील व्यापारी पिकांचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडून आपआपल्या शेतात ‘रिबोरींग’ करण्यात येत आहे़ तरीदेखील पाणी लागत नसल्याची स्थिती आहे़अनेक ठिकाणी ५०० ते ७०० फुटांपर्यंत कुपनलिका खोदूनह पाणी लागत नसल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ रिबोरींगचा खर्च तर होतोच परंतु पाणी लागत नसल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसत आहे़ पाण्याअभावी परिणामी बहुतेक शेतकºयांची पीक वाया जाण्याच्या स्थिती आहेत़ पाणी लागेल या अपेक्षेने अनेक शेतकरी आर्थिक फटका सहन करीत शेतात ठिकठिकाणी नवीन बोर टाकून पाण्याचा शोध घेत आहेत.मात्र तरीही पुरेसा जलसाठा उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.शेतीसाठी तळोदा तालुक्यातील भौगोलिक अनुकूलता संपूर्ण जिल्हयात प्रसिद्ध आहे़ मात्र यंदा मुख्य मान्सून व परतीचा पाऊस या दोघांनीही तालुक्याकडे पाठ फिरवली आहे़ त्यामुळे साहजिकच भर पावसाळ्यातदेखील येथील शेतकºयांना पाण्याची विवंचना सहन करावी लागली होती़ आता उन्हाळ्यात तर दिवसेंदिवस पाण्याचा स्तर खालावत आहे़ भूजल पातळी एक ते दीड मीटरने खोल गेली आहे़ त्यामुळे परिणामी परिरातील विहिरी व कुपनलिका निरुपयोगी ठरत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़पाण्याअभावी दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट रूप धारण करीत आहे. येथे सुपीक जमिनीचा पट्टा व बारमाही पाण्याची मुबलक उपलब्धता असते. परंतु यंदा पावसाअभावी शेतीसाठी मोठे संकट निर्माण झालेले आहे़पाण्याअभावी पिक करपत आहेत़ त्यामुळे येथील शेती उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. परिसरातील व्यापारी पिकांचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहेत.त्यामुळे पुढील मान्सून वेळेवर दाखल न झाल्यास दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार असल्याची परिस्थिती आहे. येथील परिसरात दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात असल्याने पाण्याचे अधिक दुर्भिक्ष जाणवत आहे.पाण्यासोबत पशुपालकांना चाºयाची समस्याही भेडसावत आहे़ परिसरात पाणीटंचाईमुळे हिरव्या चाºयाची कमतरता निर्माण झालेली आहे़ यामुळे चाºयासाठी अनेक पशुपालकांनी तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे़ मे-जूनपर्यंत ही समस्या अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे़