शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

तळोदा तालुक्यात पाचशे फुट खोदूनही पाण्याचा सुगावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 20:22 IST

सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावलसह लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने अनेक जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे परिसरातील व्यापारी पिकांचा ...

सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावलसह लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने अनेक जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे परिसरातील व्यापारी पिकांचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडून आपआपल्या शेतात ‘रिबोरींग’ करण्यात येत आहे़ तरीदेखील पाणी लागत नसल्याची स्थिती आहे़अनेक ठिकाणी ५०० ते ७०० फुटांपर्यंत कुपनलिका खोदूनह पाणी लागत नसल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ रिबोरींगचा खर्च तर होतोच परंतु पाणी लागत नसल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसत आहे़ पाण्याअभावी परिणामी बहुतेक शेतकºयांची पीक वाया जाण्याच्या स्थिती आहेत़ पाणी लागेल या अपेक्षेने अनेक शेतकरी आर्थिक फटका सहन करीत शेतात ठिकठिकाणी नवीन बोर टाकून पाण्याचा शोध घेत आहेत.मात्र तरीही पुरेसा जलसाठा उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.शेतीसाठी तळोदा तालुक्यातील भौगोलिक अनुकूलता संपूर्ण जिल्हयात प्रसिद्ध आहे़ मात्र यंदा मुख्य मान्सून व परतीचा पाऊस या दोघांनीही तालुक्याकडे पाठ फिरवली आहे़ त्यामुळे साहजिकच भर पावसाळ्यातदेखील येथील शेतकºयांना पाण्याची विवंचना सहन करावी लागली होती़ आता उन्हाळ्यात तर दिवसेंदिवस पाण्याचा स्तर खालावत आहे़ भूजल पातळी एक ते दीड मीटरने खोल गेली आहे़ त्यामुळे परिणामी परिरातील विहिरी व कुपनलिका निरुपयोगी ठरत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़पाण्याअभावी दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट रूप धारण करीत आहे. येथे सुपीक जमिनीचा पट्टा व बारमाही पाण्याची मुबलक उपलब्धता असते. परंतु यंदा पावसाअभावी शेतीसाठी मोठे संकट निर्माण झालेले आहे़पाण्याअभावी पिक करपत आहेत़ त्यामुळे येथील शेती उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. परिसरातील व्यापारी पिकांचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहेत.त्यामुळे पुढील मान्सून वेळेवर दाखल न झाल्यास दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार असल्याची परिस्थिती आहे. येथील परिसरात दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात असल्याने पाण्याचे अधिक दुर्भिक्ष जाणवत आहे.पाण्यासोबत पशुपालकांना चाºयाची समस्याही भेडसावत आहे़ परिसरात पाणीटंचाईमुळे हिरव्या चाºयाची कमतरता निर्माण झालेली आहे़ यामुळे चाºयासाठी अनेक पशुपालकांनी तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे़ मे-जूनपर्यंत ही समस्या अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे़