शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
4
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
5
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
6
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
7
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
8
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
9
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
10
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
11
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
12
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
13
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
14
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
15
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
16
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
17
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
18
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
19
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
20
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."

तळोदा तालुक्यात पाचशे फुट खोदूनही पाण्याचा सुगावा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 20:22 IST

सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावलसह लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने अनेक जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे परिसरातील व्यापारी पिकांचा ...

सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावलसह लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने अनेक जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे परिसरातील व्यापारी पिकांचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडून आपआपल्या शेतात ‘रिबोरींग’ करण्यात येत आहे़ तरीदेखील पाणी लागत नसल्याची स्थिती आहे़अनेक ठिकाणी ५०० ते ७०० फुटांपर्यंत कुपनलिका खोदूनह पाणी लागत नसल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ रिबोरींगचा खर्च तर होतोच परंतु पाणी लागत नसल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसत आहे़ पाण्याअभावी परिणामी बहुतेक शेतकºयांची पीक वाया जाण्याच्या स्थिती आहेत़ पाणी लागेल या अपेक्षेने अनेक शेतकरी आर्थिक फटका सहन करीत शेतात ठिकठिकाणी नवीन बोर टाकून पाण्याचा शोध घेत आहेत.मात्र तरीही पुरेसा जलसाठा उपलब्ध होत नसल्याने शेतकºयांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.शेतीसाठी तळोदा तालुक्यातील भौगोलिक अनुकूलता संपूर्ण जिल्हयात प्रसिद्ध आहे़ मात्र यंदा मुख्य मान्सून व परतीचा पाऊस या दोघांनीही तालुक्याकडे पाठ फिरवली आहे़ त्यामुळे साहजिकच भर पावसाळ्यातदेखील येथील शेतकºयांना पाण्याची विवंचना सहन करावी लागली होती़ आता उन्हाळ्यात तर दिवसेंदिवस पाण्याचा स्तर खालावत आहे़ भूजल पातळी एक ते दीड मीटरने खोल गेली आहे़ त्यामुळे परिणामी परिरातील विहिरी व कुपनलिका निरुपयोगी ठरत असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येत आहे़पाण्याअभावी दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट रूप धारण करीत आहे. येथे सुपीक जमिनीचा पट्टा व बारमाही पाण्याची मुबलक उपलब्धता असते. परंतु यंदा पावसाअभावी शेतीसाठी मोठे संकट निर्माण झालेले आहे़पाण्याअभावी पिक करपत आहेत़ त्यामुळे येथील शेती उत्पादनावर गंभीर परिणाम झाला आहे. परिसरातील व्यापारी पिकांचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहेत.त्यामुळे पुढील मान्सून वेळेवर दाखल न झाल्यास दुष्काळाची तीव्रता आणखी वाढणार असल्याची परिस्थिती आहे. येथील परिसरात दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल जात असल्याने पाण्याचे अधिक दुर्भिक्ष जाणवत आहे.पाण्यासोबत पशुपालकांना चाºयाची समस्याही भेडसावत आहे़ परिसरात पाणीटंचाईमुळे हिरव्या चाºयाची कमतरता निर्माण झालेली आहे़ यामुळे चाºयासाठी अनेक पशुपालकांनी तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे़ मे-जूनपर्यंत ही समस्या अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे़