शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

जिल्ह्यातील चार गावांमध्येही कोरडक्षेत्राचा ‘विकास’ होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 12:07 IST

कृषी विभाग : जनावरांच्या खरेदीसाठी तुटपुंजी रक्कम

नंदुरबार : २० हजारात गाय किंवा म्हैैस आणि २५ हजारात ९ शेळ्या १ बोकड देऊन कोरडवाहू क्षेत्राचा विकास करण्याची शासनाची योजना शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरत आहे़ शासनाने जाहिर केलेल्या दरात पाळीव प्राणीच खरेदी करणे शक्य नसल्याने योजना शेतकऱ्यांना डोईजड ठरत आहे़कृषी विभागाकडून राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन वर्षापासून प्रत्येकी चार गावांमध्ये कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम राबवला जात आहे़ यांतर्गत गायी म्हशी, शेळी, मूरघास तयार करणे, शेडनेट आणि पॅकहाऊस यासाठी शेतकºयांच्या प्रस्ताव मागवून त्यांनी बिले दिल्यानंतर त्यांच्या खात्यावर निधी देण्याचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे़ परंतू शासनाने निर्धारित केलेल्या जनावरांच्या दरांचा फटका शेतकºयांना बसत असून शेतकरी प्रस्ताव देण्यासही धजत नसल्याचे दिसून आले आहे़ उर्वरित मूरघास, शेडनेट आणि पॅकहाऊस यांचीही नगण्य संख्या असून २०१४-१५ पासून वाटप करण्यात येणाºया अनुदानातून संबधित उपक्रम झालेच नसल्याच्या तक्रारी शेतकºयांकडून करण्यात येत आहे़ यामुळे दरवर्षी चार गावे निवडून नावालाच योजना राबवणाºया कृषी विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़तालुकास्तरावर निवड करण्यात येणाºया गावासाठी २२ लाख रुपयांचा निधी वर्षभरात खर्च करण्याच्या या कार्यक्रमात शेतकºयांचा सहभाग हा तोकडा असल्याचे समजून येऊन विभागाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ चार वर्षापासून नावालाच सुरु असलेल्या योजनेत दरवर्षी वाटप करण्यात येणाºया निधीच्या वापराबाबत योग्य पडताळणी होण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे़फळबागा किंवा पिकपद्धतीने केलेल्या प्रकल्पासाठी निधी देण्याची तरतूद असूनही शासनाने जिल्ह्यातील एकाही शेतकºयास तसा निधी वितरीत केलेला नाही़ २०१४-१५ या वर्षात जळके रनाळे ता़ नंदुरबार आणि इच्छागव्हाण ता़ तळोदा ही दोनच गावे योजनेत होती़ २०१५-१६ या वर्षात सातुर्के ता़ नंदुरबार, चितवी ता़ नवापूर, वडगाव ता़ शहादा, भोगवाडे ता़ धडगाव तर २०१६-१७ या वर्षात करंजी खुर्द ता़ नवापूर, चाकळे ता़ नंदुरबार, जुने धडगाव ता़ धडगाव आणि सरी ता़ अक्कलकुवा या गावांचा समावेश करण्यात आला होता़ चार वर्षात झालेल्या कामांचा आढावाही विभागाने घेतलेला नसल्याचे समोर आले असून निधीच्या खर्चाबाबत आलबेल स्थिती असल्याची माहिती आहे़