शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

राज्यातील चारही आकांक्षित जिल्ह्यांची प्रगती समाधानकारक - अर्थराज्यमंत्री कराड

By मनोज शेलार | Updated: April 20, 2023 20:38 IST

जिल्ह्यात बँकांच्या नवीन १७ शाखा सुरू करण्यात येणार आहे. त्यातील तीन शाखा लवकरच सुरू होणार आहेत.

नंदुरबार : राज्यातील नंदुरबारसह धाराशिव, गडचिरोली, वाशिम या चारही आकांक्षित जिल्ह्याची प्रगती समाधानकारक आहे. केंद्राच्या विविध योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्यांचा आर्थिक स्तर उंचावत असल्याचे केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी येथे बोलताना सांगितले. मंत्री कराड यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. धाराशिव, गडचिरोली व वाशिम जिल्हाधिकारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. कराड यांनी सांगितले.

देशातील ११२ जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यात राज्यातील चार जिल्हे आहेत. निती आयोगाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. नंदुरबार जिल्ह्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले, जिल्ह्यात इंटरनेट सुविधा, स्थलांतर, कुपोषण हे मोठे प्रश्न आहेत. बँक शाखांचा देखील प्रश्न आहे. जिल्ह्यात बँकांच्या नवीन १७ शाखा सुरू करण्यात येणार आहे. त्यातील तीन शाखा लवकरच सुरू होणार आहेत. मोबाइल टॉवरसाठी वन विभागाची अडचण आहे, ती सोडविण्यात येईल. बचत गटांना प्राधान्य देण्यात येत आहे. दरडोई उत्पन्न कसे वाढेल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक जिल्हा परिषद गट निहाय बचतगट भवन बांधण्यात येणार आहे. स्थलांतर रोखण्यासाठी लघु व मध्यम उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.