शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नंदुरबार : व्यापाऱ्याला चहापाणी पडली चार लाखात, नवापूर पोलिसात गुन्हा दाखल

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: April 29, 2023 18:09 IST

ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या परभणी येथील व्यापाऱ्याचे चार लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नवापूर नजीक धाब्यावर घडली.

नंदुरबार : ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या परभणी येथील व्यापाऱ्याचे चार लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नवापूर नजीक धाब्यावर घडली. याप्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळचे कवसडी ता. जिंतूर, जि. परभणी येथील व सध्या सुरत येथे व्यावसाय करणारे राजेश बालमुकुंद शर्मा (४२) हे शनिवारी ट्रॅव्हल्स बसने सुरत येथे जाण्यासाठी प्रवास करीत होते. बस नवापूर नजीक हॉटेल साईराम येथे थांबली. त्यावेळी शर्मा यांनी चार लाख रुपये रोख असलेली बॅग त्यांच्या सीटवर ठेवली. धाब्यावर चहापाणी केल्यानंतर ते पुन्हा बसमधील त्यांच्या सीटवर गेले असता त्यांना बॅग जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी सह प्रवाशांना विचारणा केली. चालक व सह चालकास विचारणा केली, परंतु उपयोग झाला नाही.

सर्व प्रवासी खाली उतरल्यावर चोरट्यांनी त्यांची बॅग लंपास केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत राजेश शर्मा यांनी नवापूर पोलिसात याबाबत फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार अशोक मोकळ करीत आहे.