शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

प्रति चक्रीवादळामुळे तापमान वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 20:54 IST

वेस्टर्न डिस्टर्बन्स् : जळगाव, धुळे व नंदुरबारात फेब्रुवारीतच पस्तिशीपार

ठळक मुद्देकमाल व किमान तापमानात वाढमध्य प्रदेशाच्या हद्दीत प्रतिचक्री वादळाची निर्मितीजळगावचे कमाल तापमान ३८ अंश

नंदुरबार : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे (प्रती चक्रीवादळ) खान्देशसह संपूर्ण राज्यात कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे़ फेब्रुवारीतच जळगावचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले असून १९७४ नंतरचे हे फेब्रुवारी महिन्यातील सर्वाधिक ‘रेकॉर्ड ब्रेक’ कमाल तापमान ठरले आहे़हवामानाच्या दृष्टीने चालू महिन्यात बरेच चढ-उतार दिसत आहे़ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात खान्देशवासीयांना रेकॉर्ड ब्रेक थंडीचा अनुभव घेता आला तर आता महिना मध्यावर आला असताना वाढत्या तापमानाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे़ बुधवारी जळगाव, धुळे व नंदुरबारातील कमाल व किमान तापमानात वेगाने वाढ झालेली दिसून आली़ जळगावात बुधवारी १९७४ सालातील फेब्रुवारीनंतरचे सर्वाधिक उच्चांकी ३८ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदविण्यात आले़ तर, धुळे व नंदुरबारात बुधवारी अनुक्रमे ३७.९ व ३७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, नंदुबारात १२ फेब्रुवारी १९५५ रोजी तब्बल ४०.५ सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली होती़ त्यानंतर १९८४ साली ३९.५ तर १९८९ साली ३८.२ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती़प्रतिचक्री वादळाची निर्मितीभारताच्या उत्तर-पश्चिम भागात वेस्टर्न डिस्टर्बन्स् निर्माण झाला आहे़ त्यामुळे उत्तरेकडून येत असलेल्या शितलहरींचा प्रभाव कमी झाला असून त्यातुलनेत बाष्पयुक्त वाऱ्यांचा (गरम वारे) प्रभाव आता वाढताना दिसून येत आहे़ भारताच्या पुर्वेकडून मोठ्या प्रमाणात उष्ण वारे वाहत आहेत़ मध्य प्रदेशाच्या पट्टयात प्रतिचक्री वादळाची निर्मिती झालेली आहे़ त्यामुळे साहजिकच येथून हा पट्टा उत्तर व मध्य महाराष्ट्र, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या भागात व्यापला गेला आहे़ शास्त्रीयदृष्ट्या फेब्रुवारी हा महिना हिवाळा या ऋृतुतच गणला जात असतो़ परंतु हिवाळ्याकडून उन्हाळ्याकडे स्थित्यंतर होत असताना या महिन्यात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असतात़तापमानात चढ-उतार होणारसाधारणत: मार्च महिन्यापासून उन्हाळ्याची सुरुवात होत असते़ तर फेब्रुवारी महिना हा संक्रमणाचा म्हटला जात असतो़ वेस्टर्न डिस्टर्बन्स्मुळे फेब्रुवारी महिन्यात वेळोवेळी तापमानात मोठे बदल होण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे़ प्रतिचक्रीवादळाची निर्मिती झाल्याने पूर्व राजस्थान व मध्यप्रदेशातूनही मोठ्या प्रमाणात उष्ण लहरींचा प्रभाव वाढला आहे़ पुणे वेधशाळेनुसार पुढील आठवडाभर उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात उष्ण व कोरडे वारे वाहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़ यासोबतच वातावरणात आद्रता ५० ते ६० टक्यांच्या दरम्यान राहणार आहे़दरम्यान, ‘वेलनेस वेदर’चे नीलेश गोरे यांनी २४ फेब्रुवारीपर्यंत जळगावचे कमाल तापमान ३५ ते ३६ अंशावर कायम राहणार असल्याचे ‘लोेकमत’शी बोलताना सांगितले आहे़(बातमीचे स्त्रोत : आयएमडी पुणे, कृषी महाविद्याल धुळे़ )मध्य प्रदेशाच्या हद्दीत प्रतिचक्री वादळाची निर्मिती झाली आहे़ त्यामुळे पुर्वेकडील उष्ण वाºयांचा प्रभाव वाढला आहे़ फेब्रुवारीत तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळण्याची शक्यता आहे़-डॉ़ शुभांगी भुते,शास्त्रज्ञ, आयएमडी पुणे़