शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
2
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
5
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
6
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
7
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
8
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
9
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
10
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
11
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
12
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना
13
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
14
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
15
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
16
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
17
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
18
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
19
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
20
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?

टॉवरची होळी टाळण्यासाठी दूरसंचारची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बीएसएनएल टॉवरच्या माध्यमातून योग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार करीत सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बीएसएनएल टॉवरच्या माध्यमातून योग्य सेवा मिळत नसल्याची तक्रार करीत सेवा सुरळीत करण्याची मागणी केली. दरम्यान सेवा सुरळीत न झाल्यास चारही टॉवरची होळी करण्याचा इशाराही देत  ग्राहकांनी दूरसंचारची झोप उडवली. मालमत्तेचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी दूरसंचार धुळे विभाग महाप्रबंधकांनी पत्राद्वारे सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे.दुर्गम भागात ऑनलाईन कामे करण्यासाठी केवळ बीएसएनएल नेटवर्कचाच आधार घ्यावा लागत आहे. परंतु वारंवार खंडीत होणा:या सेवेमुळे नागरिकांची कुठलीही ऑनलाईन कामे पूर्ण होत नाही.           अशा सेवेमुळे नागरिकांमध्ये तब्बल तीन वर्षापासून नागरिकांना समस्यांशी तोंड द्यावे लागत आहे. शिवाय भ्रमध्वनी देखील निकामी ठरत आहे. त्या भागातील बहुतांश भ्रमणध्वनीधारक विविध मुदतीचे महागडे रिचार्ज करीत आहे. रिचार्जचा नियोजित कालावधी संपेर्पयत            सेवा सुरळीत होत नाही, यामुळे महागडय़ा रिचार्जची रक्कम वाया जात आहे. खरे तर ही रक्कम सेवेविना दूरसंचार विभागाला मिळणारे उत्पन्न असून ते अतिरिक्त ठरत आहे. अशा या खंडीत सेवा सुरळीत करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु संबंधितांकडून त्याची दखलच घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी काही दिवसांपूर्वी मोलगी परिसरातील मोलगी, सरी, वेली व जमाना या चारही बीएसएनएलच्या टॉवरला आग लावत त्यांची होळी करण्याचा इशारा दिला. यामुळे दूरसंचार विभागाची यंत्रणा खळबळून जागी झाली             आहे.चारा व लाकडे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे निवेदन देतांनाच ग्राहकांनी जाहिर केले होते. टॉवर जाळण्याचा इशारा दिल्यानंतर  निवेदन देणा:या ग्राहकांच्या सर्व प्रतिनिधींना मोलगी पोलीसांमार्फत नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. त्यात असे गैरकृत्य करता येणार नाही, केल्यास गंभीर गुन्हे दाखल              करण्यात येईल, असे म्हणत विधायक मार्गाने न्याय मिळवावा, असेही नमुद करण्यात आले होते. मोलगी              पोलीस ठाण्यामार्फत दिलेल्या नोटीसीनेही इशारा देणा:या            ग्राहकांवर फारसा परिणाम दिसून आला नाही. उलट त्यांच्या या होळी करण्याच्या आंदोलनाला राष्ट्रीय अनुसूचित दक्षता परिषद व भिलीस्थान टायगर सेना यांनी            समर्थन देत या आंदोलनात आम्हीही उतरणार असल्याचा सांगण्यात आले होते. एक राजकीय पक्ष व एका संघटनेने दिलेल्या पाठींब्यामुळे मोलगी भागातील ग्राहक आंदोलन करण्यासाच्या भूमिकेवर ठाम राहिले आहे. या आंदोलनामुळे दुरसंचार विभागाला कदाचित आपल्या मालकीच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होईल याची जाणीव झाली असावी. मालमत्तेचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी दुरसंचार विभागाच्या धुळे विभागीय कार्यालयाच्या महाप्रबंधकांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे पत्राद्वारे सुरक्षा यंत्रणा पुरविण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे पुन्हा बीएसएनएल यंत्रणा व ग्राहकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत ग्राहक नेमकी कुठली भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.