शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तहसीलदार मंदार कुळकर्णी यांनी केली रस्त्यांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

नवापूर : शहरातील प्रभाग क्रमांक सात व सहामधील डांबरीकरणाचे निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेधार्थ नवापूर भाजप व संतप्त नागरिकांनी नवापूर ...

नवापूर : शहरातील प्रभाग क्रमांक सात व सहामधील डांबरीकरणाचे निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेधार्थ नवापूर भाजप व संतप्त नागरिकांनी नवापूर नगरपालिकेच्या कार्यालयीन अधीक्षक अनिल सोनार व बांधकाम विभागाचे अभियंते संदानशिव यांना निवेदनासोबत बांगड्यांचा आहेर दिला.

पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी जोरदार घोषणीबाजी करत मुख्याधिकारी यांच्या दालनात विरोधक व नागरिकांनी गदारोळ केला. पालिकेचे अधिकरी व बांधकाम विभागाचे अधिकारी विकास कामांवर लक्ष देत नसल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले धारेवर धरले व अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर दिला.

नवापूर शहरातील गुज्जर गल्ली ते कुंभारवाडा येथील डांबरीकरणाचे काम तत्काळ थांबविण्याबाबतचे निवेदन तहसीलदार मंदार कुलकर्णी, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर, नगराध्यक्षा हेमलता पाटील यांना प्रभाग सहा कुंभारवाडा येथील नागरिकांनी दिले. या वेळी भारतीय जनता पाटीचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख, प्रदेश आदिवासी उपाध्यक्ष अनिल वसावे, जयंती अग्रवाल, हेमंत जाधव, नगरसेवक महेंद्र दुसाने, नीलेश प्रजापत, जितू अहिरे, स्वप्नील मिस्त्री, घनश्याम परमार, कमलेश छत्रीवाला, कुणाल दुसाने, अनिल सोनारसह नागरिक उपस्थित होते. या वेळी तीन वेगवेगळे निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कुंभारवाडा ते नवनीत लोहार यांच्या घरापर्यंत डांबरीकरणाचे काम चांगल्या दर्जाचे करावे, २० वर्षांपूर्वीची असलेली गटार लाईन नवीन करून देणे, रस्त्याची उंची वाढल्याने नागरिकांच्या घराच्या पायऱ्या रस्त्यात दाबल्या गेलेल्या आहेत, पावसाळ्यात घरात पाणी शिरते, डांबरीकरणाचे काम रस्त्यावर न करता रस्त्याचे अर्धा फूट खोदकाम करून करावे, यावर योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपसह नागरिकांनी दिला. यामुळे कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी नगरपालिकेची राहील, असे निवेदन देण्यात आले.

यानंतर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी गुज्जर गल्ली ते कुंभारवाडा रस्त्यांची पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. संबंधित प्रशासनाला यासंदर्भात उपाययोजना करण्याचा सूचना केल्या. नवापूर शहरातील डांबरीकरण कामामुळे नवापूर शहरातील राजकीय वातावरण चांगले तापले आहे. पालिकेतील विरोधकांचे मौनदेखील शहरात चर्चेचा विषय बनला आहे. नागरिकांच्या आग्रहाखातील दर्जेदार रस्ता तयार करून पालिकेने चांगल्या सुविधा पुरविणे गरजेचे आहे.