शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

आॅफलाईन बदल्यांना शिक्षक परिषदेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 13:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या या आॅनलाइन प्रकियेद्वारे करुन बदल्यांमागे होणारी आर्थिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या या आॅनलाइन प्रकियेद्वारे करुन बदल्यांमागे होणारी आर्थिक देवाण-घेवाण रोखली होती. परंतु सद्यस्थितीत जिल्हाअंतर्गत बदल्या या आॅफलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्टÑ शिक्षक परिषदेतर्फे करण्यात आली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेलद्वारे तर माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांना प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले आहे. राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सहकार्यवाह पुरूषोत्तम वसंत काळे, राज्यकार्यकारिणी सदस्य रामकृष्ण बागल, जिल्हा संघटनमंत्री राकेश आव्हाड यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या ग्रामविकास विभागाने १५ जुलै रोजी आदेश काढून राज्यातील जिल्हापरिषद शाळेतील कार्यरत शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै पूर्वी आॅफलाईन पद्धतीने कराव्यात, असे निर्देश दिले आहेत.परंतु आॅफलाईन पद्धतीने बदल्या केल्यास त्यात मानवी हस्तक्षेप होऊन गैरप्रकार होऊ शकतात. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या या आॅनलाईन पद्धतीनेच होणे गरजेचे असल्याबाबत लेखी निवेदनाद्वारे शासनास अवगत करण्यात आल्याची माहिती आमदार रावल यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाला दिली. आॅनलाईन जिल्हांतर्गत बदल्या करत असताना २०१८-१९ व सन २०१९-२० च्या बदल्यांमध्ये रॅण्डम राऊंडमध्ये व विस्थापित बदल्यांमध्ये गैरसोय झालेल्या शिक्षकांना आॅनलाईन बदल्यात विना अट प्राधान्याने बदलीची तरतूद असावी.तसेच महिला शिक्षकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. राज्य शासनाने फेब्रुवारी २०२० मध्ये राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणावर पुनर्विचार करुन निर्णय घेण्यासाठी पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती.समितीच्या अहवालानुसार नवीन बदली धोरण जाहीर करुन बदल्या करणे अपेक्षित असताना सध्या कोविड-१९ चा संसर्ग वाढलेला असताना आॅफलाईन बदल्या करण्याचा घाट घालणे चुकीचे आहे. २७ फेब्रुवारी २०१७ च्या बदली धोरणातील त्रुटी दूर करुन आॅनलाइन पद्धतीनेच बदल्या करण्यात याव्यात.देशातील व राज्यातील कोविड-१९ व लॉकडाऊनचा काळ विचारात घेऊन शिक्षकांच्या बदल्या विशेषत: नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागातील संदर्भासाठी आॅनलाइन पद्धतीने करण्याबाबतचा आग्रह लेखी निवेदनात आ.जयकुमार रावल यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.