शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे टारगट युवकांचे फावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विविध शाळा, महाविद्यालयांचा परिसर आणि चौकातील टारगट युवकांचा उच्छाद पुन्हा वाढला आहे. शहर आणि ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विविध शाळा, महाविद्यालयांचा परिसर आणि चौकातील टारगट युवकांचा उच्छाद पुन्हा वाढला आहे. शहर आणि उपनगर पोलिसांच्या निष्क्रियता त्याला कारणीभूत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, चौकाचौकातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करून आवश्यक त्या ठिकाणी पुन्हा लावण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. नंदुरबारातील रोडरोमियो युवकांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. यामुळे महिला, तरुणी आणि विद्यार्थीनी हैराण झाल्या आहेत. ठिकठिकाणी अशा युवकांचे टोळके शहरात दिसून येते. विशेषत: शाळांच्या आवारात आणि खाजगी क्लासच्या आवारातील हे टोळके पोलिसांच्या नाकावर टिच्चून टारगटपणा करीत आहेत.चौकाचौकात वावर..शहरातील  डी. आर.विद्यालयासमोरील चौक आणि दिनदयाल चौक, श्रॉफ विद्यालयासमोरील चौक, मोठा मारुती मंदीर परिसर, कमला नेहरू कन्या विद्यालय आणि एकलव्य विद्यालय परिसर, मिशन विद्यालय परिसर, जीटीपी कॉलेज परिसर आदी भागात या युवकांचा नेहमीच वावर असतो. अशा भागातून जाणा:या महिला, तरुणी, विद्यार्थीनी यांना त्रास देण्याचा प्रकार या युवकांकडून केला जातो. यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी पोलिसांचे दामीनी पथक आणि साध्या वेशातील पोलिसांची गस्त शाळा परिसरात आणि चौकांमध्ये राहत होती. त्यामुळे टारगट युवकांना आळा बसला होता. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांची गस्तच बंद झाली आहे. नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक यांची निष्क्रीय भुमिका त्याला कारणीभूत ठरली आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनीच संबधीत अधिका:यांचे कान टोचावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.सीसीटीव्ही कॅमेरे वाढवावेशहरातील काही भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. परंतु अनेक मुख्य चौक व धार्मिक  स्थळ आणि शाळा परिसर त्यापासून सुटले आहेत. त्यामुळे नव्याने सव्र्हे करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी होत आहे. सध्या सर्वात रहदारीचा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून मोठा मारुती मंदीर परिसर ओळखला जातो. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा आवश्यक आहे. या शिवाय दिनदयाल चौकात देखील कॅमेरे वाढविण्याची आवश्यकता आहे. याबाबत पोलीस दलाने गांभिर्याने घेणे आवश्यक   आहे.