शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

तापी नदी दुथडी; पंचक्रोशीत मात्र ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:25 IST

प्रकाशा : येथील तापी नदीला पूर आला असून, प्रकाशा बॅरेजचे १० गेट पूर्णक्षमतेने उघडले असल्याने एक लाख २५ ...

प्रकाशा : येथील तापी नदीला पूर आला असून, प्रकाशा बॅरेजचे १० गेट पूर्णक्षमतेने उघडले असल्याने एक लाख २५ हजार ६६४ क्‍यूसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र; प्रकाशा पंचक्रोशीत पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ६५ मि.मी. पाऊस झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे.

याबाबत असे की, हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने शुक्रवारी सकाळी सहा वाजता हतनूर धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. त्यामुळे प्रकाशा येथील बॅरेजला रात्री सात वाजेपासून पाणी येण्यास सुरुवात झाली. तेव्हा प्रकाशा बॅरेजने सहा गेट उघडले होते. मात्र पाण्याची क्षमता वाढल्याने प्रकाशा बॅरेजचे सकाळी सहा वाजता १० गेट पूर्ण क्षमतेने उघडले आहेत. त्यातून एक लाख २५ हजार ६६४ क्‍यूसेस पाणी विसर्ग करण्यात येत आहे.

प्रकाशा येथील तापी नदीला १०७ मीटर पाणी स्टेबल करण्यात आले आहे. यामुळे तापी नदी दोन्ही काठ दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे महसूल व ग्रामपंचायतीकडून नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तापी नदीमध्ये या वर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने पाणी बघण्यासाठी पंचक्रोशीतील लोक गर्दी करीत आहेत.

पंचक्रोशीत पाऊस नसल्याने ठणठणाट व शेतकरी चिंतातूर

कृषी विभाग म्हणतं १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. त्यामुळे प्रकाशा परिसरात जवळपास अजूनही पेरणी बाकी आहे.

प्रकाशा येथील विविध कार्यकारी सोसायटीमध्ये पर्जन्यमापक आहे. तेथील नोंदणीनुसार ६ जूनपासून आतापर्यंत ६५ मि.मी. पाऊस झालेला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात १३० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. मात्र प्रकाशासह पंचक्रोशीत ६५ मि.मी. पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. अजून जवळपास ९० टक्के पेरणी बाकी आहे. ज्यांनी पेरणी केली आहे. त्यांच्या पिकांनाही पाणी मिळत नसल्याने पीक वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, एवढं करून ही पाऊस येत नाही म्हणून शेतकरी संकटात सापडला आहे.

ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली व ज्यांनी पेरणी केली नाही तेही संकटात सापडल्याचे चित्र प्रकाशा शिवारात दिसून येत आहे. प्रकाशासह इतर गावातही दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, ज्वारी, तूवर, मूग, सोयाबीन, कापसाची ज्यांनी पेरणी केलेले आहे. त्या पिकांना पावसाळ्याचे पाणी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. ज्यांनी पेरणी केली तेदेखील संकटात सापडलेले आहे. अशाप्रसंगी कृषी विभागाने व महसूल विभागाने लक्ष देऊन प्रकाशासह पंचक्रोशीत दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

प्रकाशासह पंचक्रोशीत पाऊस नाही. तसेच जिल्ह्यात १३० मि.मी. पाऊस झाला असला तरी प्रत्यक्षात प्रकाशा परिसरात पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. एकीकडे कृषी विभाग १०० मी.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे सांगत असलल्याने आमच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्यांनी प्रेरणी केली आहे. त्यांनादेखील पाऊस नसल्याने पीक वाचविण्यासाठी शर्थींचे प्रयत्न करावे लागत आहे. तेव्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, दुष्काळ जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे. -हरी दत्तू पाटील, शेतकरी, प्रकाशा

प्रधानमंत्री राष्ट्रीय विमा योजनेची मुदत १५ जुलैपर्यंत होती. मात्र, पुन्हा शासनाने वाढवून ती २३ जुलै केली. परंतु प्रकाशा परिसरात पाऊसच नसल्याने आम्ही पेरणी केलेली नाही. पुढे पाऊस चांगला झाल्यास पीकविमा योजनेची मुदतवाढ करून द्यावी, अशी आमची मागणी आहे - किशोर बुलाखी चौधरी, शेतकरी, प्रकाशा