शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन पाड्यांवर टँकर, तर ९२ टंचाईग्रस्तांवर गावामध्ये उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी पावसामुळे भूजल पातळी स्थिर असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य टळले आहे. यातून जिल्ह्यात यंदा ...

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या विक्रमी पावसामुळे भूजल पातळी स्थिर असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य टळले आहे. यातून जिल्ह्यात यंदा केवळ ९२ गावे आणि १८८ पाडे टंचाईग्रस्त असून, या गाव-पाड्यांसाठी टंचाई निवारण आराखड्यांतर्गत उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव आणि अक्कलकुवा या दोन तालुक्यांतील सर्वाधिक गाव आणि पाड्यांचा या टंचाई आराखड्यात समावेश असून, तेथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार टंचाई आराखड्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्ह्याची भूजल पातळी यंदा दीड मीटरपेक्षा अधिक असली तरीही सातपुड्याच्या दुर्गम भागात धडगाव तालुक्यातील कुंडलचा गुगलमालपाडा आणि गाैऱ्याचा बोदलापाडा या दोन पाड्यांना यंदाही टँकर सुरू करण्यात आले आहेत. या पाड्यांवर १० वर्षांपासून टँकरने पाणीपुरवठा होत आहे. टंचाई निवारण आराखड्यानुसार यंदाच्या वर्षात २८८ विंधनविहिरींचे खोदकाम करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे. ग्रामपंचायतींकडून देण्यात आलेल्या प्रस्तावांनुसार हे २८८ हातपंप मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील विविध भागात टंचाईग्रस्त गावांमध्ये यंदा पर्यायी व्यवस्था म्हणून ३८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे प्रस्ताव देण्यात आले होते. यातील १० पेक्षा अधिक प्रस्ताव हे नंदुरबार तर उर्वरित प्रस्ताव हे शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील असून, त्यावर कामकाज सुरू करण्यात आले आहे. सोबत ४८ पाणी योजनांच्या प्रस्तावांवर कामकाज सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.