शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

तळोदा तालुका : 13 ग्रामपंचायतींची ‘जनसुनावणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांबरोबर व इतर योजनेतून केलेल्या कामांचे सामाजिक ऑडीट झाल्यानंतर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींनी त्यांचे रेकॉर्ड उपलब्ध न करून दिल्याने त्यांची जनसुनावणी घेण्यात आली. त्या वेळी या ग्रामपंचायतींना कागद पत्रांची पूर्तता करण्याचे आदेश उपस्थित प्रमुख अधिका:यांनी दिले.शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या कामांबरोबर व इतर योजनेतून केलेल्या कामांचे सामाजिक ऑडीट झाल्यानंतर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींनी त्यांचे रेकॉर्ड उपलब्ध न करून दिल्याने त्यांची जनसुनावणी घेण्यात आली. त्या वेळी या ग्रामपंचायतींना कागद पत्रांची पूर्तता करण्याचे आदेश उपस्थित प्रमुख अधिका:यांनी दिले.शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतींनी केलेल्या कामांबरोबरच इतर योजनेतून ही केलेल्या कामांचे सोशन ऑडीट करण्यासाठी शासनाच्या सामाजिक अंकेक्षन संचालनालयतर्फे करण्यात आले. यासाठी साधारण 60 अंकेक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना चार दिवसाचे प्रशिक्षणही देण्यात आले होते. हे अंकेक्षण गेल्या महिन्यात प्रत्यक्ष जागेवर जावून ग्रामस्थांचे व मजुरांचे जबाब नोंदवून करण्यात आले होते. साहजिकच यामुळे कामांमधील पारदर्शकता आढळून आली आहे. तळोदा तालुक्यात 40 ग्रामपंचायतींचे ऑडीट 14 जानेवारी ते 22 जानेवारी व 23 जानेवारी ते 30 अशा दोन टप्प्यात करण्यात आले होते. यातील रेवानगर, रापापूर, त:हावद, धनपूर, माळदा, नवागाव, कढेल, धानोरा, मोड, नर्मदानगर, सरदार नगर, बुधावल अशा 13 ग्रामपंचायतींनी सामाजिक ऑडीट दरम्यान, या ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड परिपूर्ण नव्हते. शिवाय बिलांची तारीख, बिल क्रमांक अशा उणिवा आढळून आल्यानंतर या कागद पत्रांची पूर्तता करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींची जनसुनवाई शुक्रवारी प्रशासकीय इमारतीत घेण्यात आली होती. सुनवाईत या विभागाचे तालुका समन्वयक नीलेश इंगोले यांनी प्रत्येक ग्रामपंचायत नुसार कागद पत्रांची अपूर्तताविषयी अधिका:यांसमोर वाचन केले. त्यानंतर संबंधित अधिका:यांनी सांमाजिक अंकेक्षण विभागाला जी कागदपत्रे हवी आहेत ती तातडीने देण्यासाठी पंचायत समितीकडे पाविण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर सर्व ग्रामपंचायतींचा अहवाल अंकेक्षण संचालनालयास पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता पुढील कार्यावाही विषयी ग्रामपंचायतीचे लक्ष लागले आहे.या जनसुनवाईत तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी शरद मगरे, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर, सहाय्यक गटविकास अधिकारी व्ही.डी. सोनवणे, जनसुनावणी अधिकारी अजरुन गुडदे, वनक्षेत्रपाल सी.डी. कासार, कल्याणी बालिका आश्रमाच्या अध्यक्षा वंदना तोरवणे, विस्तार अधिकारी संजय पाटील, सामाजिक संचलनालयाचे जिल्हा समन्वयक नितीन शेजूळकर, एल.एन.चक्रनारायण, शुभांगी खरताडे, प्रकाश भोई, सखाराम वळवी, प्रमोद वाणी, अव्वल कारकून पी.एस. पेंढारकर आदींसह संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सोशल ऑडीट करणारे अंकेक्षक उपस्थित होते. दरम्यान या सामाजिक अंकेक्षणा दरम्यान, नागरिकांनीही मोठय़ा उत्साहात सोशल ऑडीटची माहिती जाणून घेतली होती. त्यामुळे या विभागाच्या अहवालाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.