शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

तळोदा तालुका : पंचनामे पूर्ण झाले नसतानाही अनुदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील सहा हजार शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर करण्यात येत आह़े या नुकसान भरपाईसाठी येथील महसूल विभागाने सात कोटी 33 लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाला  केली आह़े परंतु पंचनामे सुरु असताना तालुका प्रशासनाकडून अनुदानाची मागणी करण्यात आली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़ेतळोदा तालुक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील सहा हजार शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर करण्यात येत आह़े या नुकसान भरपाईसाठी येथील महसूल विभागाने सात कोटी 33 लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाला  केली आह़े परंतु पंचनामे सुरु असताना तालुका प्रशासनाकडून अनुदानाची मागणी करण्यात आली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़ेतळोदा तालुक्यात सहा हजार 146 शेतक:यांनी यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड केली होती़ साधारण चार हजार 575 हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा करण्यात आला होता़ त्यात तीन हजार 13 हेक्टर जिरायत म्हणजे कोरडवाहू तर एक हजार 562 हेक्टर क्षेत्र बागायती होत़े गेल्या वर्षी कपाशीचे चांगले उत्पादन आले होत़े त्यामुळे यंदा शेतक:यांचा कल या पिकाकडे अधिक वाढला होता़ परिणामी गेल्या वर्षीपेक्षा यंदा कपाशीची लागवड अधिक करण्यात आली होती़ याशिवाय तूट पावसामुळे शेतक:यांच्या रासायनिक खतांच्या नियोजनामुळे कपाशीची प्रचंड वाढ झाली होती़ त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होत़े दरम्यान, बीटीच्या बोगस वाणामुळे बोंडअळीच्या प्रचंड प्रादुर्भाव झाला़ संपूर्ण पीकच नष्ट झाले  आह़े कापसाचे बोंड फुटल्याबरोबर त्या बोंडमधील संपूर्ण रुई ही अळी फस्त करीत असत़े अळीच्या नायनाटासाठी शेतक:यांनी कीटक नाशकांचा वापर केला होता़ परंतु बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असल्याने कापूस उत्पादक शेतकरीही पूर्ण हतबल झाला होता़ तरीही शेतक:यांच्या हाती काहीच लागले नव्हत़े बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतक:यांचे संपूर्ण पीकच नष्ट झाल्यामुळे शेतक:यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती़ या पाश्र्वभूमिवर स्थानिक महसूल विभागाने येथील कृषी विभागाला पंचनाम्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार कृषी विभागाने आपल्या यंत्रनेमार्फत पंचनाम्याची कार्यवाही करुन नुकसानीचा अहवाल प्रशासनास सादर केला़ या अहवालानुसार सहा हजार 146 शेतक:याचे चार हजार 575 हेक्टर 54 आर क्षेत्रावर कापसाचे नुकसान झाल्याचा अहवाल नमूद करण्यात आले आह़े नुकसानग्रस्त शेतक:यांना कापसाच्या नुकसान भरपाईपोटी सात कोटी 33 लाख 22 हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून मागविण्यात आले आह़े तसा अहवाल तळोदा येथील महसूल विभागाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आह़े आता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याची अपेक्षा आह़े आधीच शेतक:यांनी पिकाच्या लागवडीपासून ते पिक वाढीसाठी लागणारा खर्च यावर प्रचंड पैसा खर्च केला आह़े या आर्थिक फटक्यातून थोडाफार हातभार लागण्यासाठी शासनाने बोंडअळीग्रस्तांना तातडीने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े