शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

तळोदा तालुका : पंचनामे पूर्ण झाले नसतानाही अनुदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील सहा हजार शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर करण्यात येत आह़े या नुकसान भरपाईसाठी येथील महसूल विभागाने सात कोटी 33 लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाला  केली आह़े परंतु पंचनामे सुरु असताना तालुका प्रशासनाकडून अनुदानाची मागणी करण्यात आली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़ेतळोदा तालुक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या तळोदा तालुक्यातील सहा हजार शेतक:यांच्या नुकसानीचे पंचनामे युध्दपातळीवर करण्यात येत आह़े या नुकसान भरपाईसाठी येथील महसूल विभागाने सात कोटी 33 लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाला  केली आह़े परंतु पंचनामे सुरु असताना तालुका प्रशासनाकडून अनुदानाची मागणी करण्यात आली असल्याने आश्चर्य व्यक्त होत आह़ेतळोदा तालुक्यात सहा हजार 146 शेतक:यांनी यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड केली होती़ साधारण चार हजार 575 हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा करण्यात आला होता़ त्यात तीन हजार 13 हेक्टर जिरायत म्हणजे कोरडवाहू तर एक हजार 562 हेक्टर क्षेत्र बागायती होत़े गेल्या वर्षी कपाशीचे चांगले उत्पादन आले होत़े त्यामुळे यंदा शेतक:यांचा कल या पिकाकडे अधिक वाढला होता़ परिणामी गेल्या वर्षीपेक्षा यंदा कपाशीची लागवड अधिक करण्यात आली होती़ याशिवाय तूट पावसामुळे शेतक:यांच्या रासायनिक खतांच्या नियोजनामुळे कपाशीची प्रचंड वाढ झाली होती़ त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होत़े दरम्यान, बीटीच्या बोगस वाणामुळे बोंडअळीच्या प्रचंड प्रादुर्भाव झाला़ संपूर्ण पीकच नष्ट झाले  आह़े कापसाचे बोंड फुटल्याबरोबर त्या बोंडमधील संपूर्ण रुई ही अळी फस्त करीत असत़े अळीच्या नायनाटासाठी शेतक:यांनी कीटक नाशकांचा वापर केला होता़ परंतु बोंडअळीचा प्रादुर्भाव कायम असल्याने कापूस उत्पादक शेतकरीही पूर्ण हतबल झाला होता़ तरीही शेतक:यांच्या हाती काहीच लागले नव्हत़े बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतक:यांचे संपूर्ण पीकच नष्ट झाल्यामुळे शेतक:यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती़ या पाश्र्वभूमिवर स्थानिक महसूल विभागाने येथील कृषी विभागाला पंचनाम्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार कृषी विभागाने आपल्या यंत्रनेमार्फत पंचनाम्याची कार्यवाही करुन नुकसानीचा अहवाल प्रशासनास सादर केला़ या अहवालानुसार सहा हजार 146 शेतक:याचे चार हजार 575 हेक्टर 54 आर क्षेत्रावर कापसाचे नुकसान झाल्याचा अहवाल नमूद करण्यात आले आह़े नुकसानग्रस्त शेतक:यांना कापसाच्या नुकसान भरपाईपोटी सात कोटी 33 लाख 22 हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून मागविण्यात आले आह़े तसा अहवाल तळोदा येथील महसूल विभागाने जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आह़े आता जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करुन नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देण्याची अपेक्षा आह़े आधीच शेतक:यांनी पिकाच्या लागवडीपासून ते पिक वाढीसाठी लागणारा खर्च यावर प्रचंड पैसा खर्च केला आह़े या आर्थिक फटक्यातून थोडाफार हातभार लागण्यासाठी शासनाने बोंडअळीग्रस्तांना तातडीने मदत करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े