शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

नंदुरबार जिल्ह्याला तलाठींच्या रिक्तपदांची ’सजा’

By admin | Updated: May 11, 2017 14:04 IST

952 खेडय़ांच्या कामकाजात अडथळे

 नंदुरबार,दि.11 - जिल्हा निर्मितीला 20 वर्षाचा कालावधी होऊनही शासकीय कार्यालय आणि ग्रामीण भागात अनेक पदे आजही निम्म्यापेक्षा रिक्त आहेत़ शासनाकडून पदांची भरती होऊनही नंदुरबार जिल्ह्यात मात्र पदांची पूर्तता होत नसल्याने शहरी आणि ग्रामीणस्तरावर नागरिकांना ‘सजा’ सहन करावी लागत आह़े  

जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा विस्तार आणि सिमावर्ती भाग यामुळे तलाठी पदांची भरती करण्याची अपेक्षा होती़ गेल्या दोन वर्षात पदभरती होऊनही तलाठींवर कामाचा बोजा कायम आह़े वसूली, दाखले वाटप आणि ऑनलाईन यात गुरफटलेल्या एकेका तलाठीवर 10 गावांची जबाबदारी आह़े त्यातही पाच वर्षात एकाही तलाठीची पदोन्नती न झाल्याने मंडळाधिका:यांच्या जागाही रिक्त आहेत़ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पदभरतीबाबत कारवाई केल्यास तलाठींवरचा बोजा कमी होऊन नागरिकांची कामे होणार आहेत़ 
डिजीटल साताबारा प्रणालीत नंदुरबार जिल्हा अव्वल आला आह़े जिल्ह्यातील सातरबारे संगणकीकृत झाल्याने शेतक:यांची एक समस्या निकाली निघाली आह़े मात्र या सातबा:यांच्या प्रिंट काढणे आणि त्यांच्यावर सही शिक्के देणा:या तलाठींकडे संगणक आणि प्रिंटर ठेवण्याची जागाच नसल्याने अडचणी येत आहेत़  
 नंदुरबार तालुक्यात 137, शहादा 150, तळोदा 67, नवापूर 114, अक्कलकुवा 66 आणि धडगाव तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात तलाठी केवळ वसुली आणि शेतसारा वसुलीसाठी येताना दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े शेती खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी मूहूर्त काढण्यापूर्वी तलाठींची तारीख घ्यावी लागत असल्याचे किस्से ग्रामीण भागात सर्वश्रृत होत आहेत़ जिल्ह्यातील तब्बल 586 ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात 200 पेक्षाही कमी तलाठी नियुक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आह़े यातच ऑनलाईन आणि पेपरलेस वर्कचा गाजावाजा होत असला तरी, नोंदणी  आणि दाखल्यांसाठी तलाठींकडेच नागरिकांना जावे लागत आह़े 
नंदुरबार तालुक्यात 154, शहादा 185, तळोदा 94, नवापूर 163, अक्कलकुवा 193 आणि धडगाव तालुक्यातील 163 अशा एकूण 952 गावांसाठी सध्या जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागात 209 तलाठींची नियुक्ती करण्यात आली आह़े या तलाठींकडून आठवडय़ातील चार दिवस ग्रामीण भागात आणि तीन दिवस त्या-त्या तालुका मुख्यालयात कामकाज करण्यात येत आह़े ‘आधीच कमी त्यात काम न होण्याची हमी’ अशी स्थिती सध्या ग्रामीण भागात आह़े 
महसूल विभागात तलाठींची सरळसेवेतून 234 पदे मंजूर आहेत़ यापैकी 209 पदे भरण्यात आली असून 25 पदे रिक्त आहेत़ या रिक्त पदांचे कामकाजही 209 तलाठींनाच करावे लागत असल्याने समस्या वाढत आहेत़