शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

सुप्रीम कोर्टाचा निर्णय ओबीसींवर अन्यायकारकच- राम रघुवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आरक्षणानुसार सर्व समाज घटकांना नेतृत्वाची, जनतेच्या सेवेची संधी मिळावी यात कुणाचे दुमत नाही. जिल्हा परिषद, पंचायत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

आरक्षणानुसार सर्व समाज घटकांना नेतृत्वाची, जनतेच्या सेवेची संधी मिळावी यात कुणाचे दुमत नाही. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठीच्या ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा नंदुरबार जिल्ह्यापुरता तरी ओबीसींवर अन्यायकारक आहे. याबाबत न्यायालयातच दाद मागावी लागणार आहे. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते राम चंद्रकांत रघुवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा परिणाम जिल्ह्यात काय होईल?

घटनेने दिलेल्या आरक्षणाप्रमाणे सर्व समाजांना राजकारणात नेतृत्वाची संधी आहे. त्या प्रमाणे नंदुरबार जिल्ह्यात देखील २७ टक्के आरक्षणानुसार जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी ११ जागा राखीव होत्या. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला तर सहाही जिल्हा परिषदांना लागू होणार आहे. वास्तविक इतर पाच जिल्ह्याची समाज, जातनिहाय परिस्थिती वेगळी आहे व नंदुरबारची वेगळी आहे. त्यामुळे नंदुरबारचा वेगळा विचार होणे गरजेचे होते. त्यावरच ओबीसींचा आक्षेप राहणार आहे.

या सर्व जागा आता ओपन होतील तेव्हा ओबीसींवर अन्याय होणार नाही का?

तोच आमचा आक्षेपाचा मूळ मुद्दा आहे. इतर जिल्ह्यात ओबीसींसाठी काही जागा राखीव राहणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात मात्र सर्वच ११ जागा या ओपन होणार आहेत. त्यातही सहा जागा या महिलांसाठी राखीव होतील. ओपन जागेवर ओपनचा उमेदवारासह ओबीसी व इतर कुठलाही प्रवर्गाचा उमेदवार उभा राहणार आहे. त्यामुळे तो देखील अन्यायच म्हणावा लागेल. अर्थात घटनेच्या अनुषंगाने ते ठीक आहे. परंतु जिल्ह्यातील ओबीसींनी कुठे जावे हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे न्यायालयाने फेरविचार करणे आवश्यक ठरणार आहे.

न्यायालयात जाणार...

या निकालाच्या अनुषंगाने न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. ५० टक्केपेक्षा अधिक आरक्षण नको असे न्यायालयाचे म्हणने असले तरी जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे. सर्व समाज घटकांना कायद्याच्या तरतुदीनुसारच न्याय मिळावा. यासाठी विधीतज्ज्ञांचे मत घेऊन याचिका दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

राजकीय स्थितीवर काय परिणाम...

या निर्णयाचा जिल्ह्यातील राजकीय स्थितीवर परिणाम होईलच. त्यासाठीच या निकालाला स्टे मिळावा यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच नेते एकत्र येतील, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने ज्येष्ठ नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे प्रयत्नशील आहेत.

जि.प.चे कामकाज...

न्यायालयाने निकाल दिला त्याच दिवसापासून अर्थात ४ मार्चपासून संबंधित सर्व ११ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे जि.प.च्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहेच.