शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

उत्तर महाराष्ट्रातील अत्याधुनिक लॅब नंदुरबारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:05 IST

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून अजून विविध उपाययोजनांचे नियोजन केले असून ते प्रमाण शुन्यावर आणण्याचे नियोजन आहे. - डॉ.राजेंद्र भारूड

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमध्यप्रदेश आणि गुजरातच्या सिमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सुरुवातीपासूनच जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे नियोजन केले होते. त्याचा निश्चित परिणाम दिसत असला तरी अजूनही वाढते रुग्ण चिंताजनक असून ते प्रमाण कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. खास करून जिल्ह्यात आतापर्यंत तपासणी प्रयोगशाळा नव्हती, सध्या सुरू झाली असली तरी त्याची क्षमता कमी असून अजूनही धुळे व इतर तपासणी लॅबवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे नवीन आधुनिक तपासणी प्रयोगशाळा जिल्ह्यात लवकरच सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.सध्या कोरोना रुग्ण व मृत्यूचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढत असल्याने त्यावर काय उपायोजना होत आहे.?नंदुरबार जिल्ह्यात इतर भागाच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असली तरी हे प्रमाण अजून कमी करून ते शुन्यावर आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकारचे सुक्ष्म नियोजन केले आहे. त्यासाठी खाजगी डॉक्टरांचे स्वतंत्र पथक तयार केले आहे. जिल्ह्याकडे केवळ ३० आॅक्सीजन बेड आहेत. त्याची संख्या वाढवून ती ७५ पर्यंत होणार आहे. याशिवाय साखळी तोडण्यासाठी सर्व पातळीवर प्रयोग सुरू असून नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे यासह सर्व नियम पाळून खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.जिल्ह्यात नंदुरबार पाठोपाठ शहाद्यात रुग्ण वाढत आहेत, तेथे काय नियोजन?नंदुरबारनंतर शहाद्यात रुग्ण अधीक आहेत. त्यामुळे शहादा येथे देखील स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न असून लवकरच ते सुरू होईल. कमी लक्षणे असलेल्या रुग्णांवर तेथे उपचार होतील. याशिवाय शहाद्यात क्वॉरंटाईन सेंटरही वाढविले असून रुग्णांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.

नंदुरबार येथे अत्याधुनिक प्रयोगशाळेला मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी एक कोटी ६५ लाख रुपये खर्चालाही मंजुरी मिळाली असून मशिनरीची आॅडर्र नोंदविली आहे. सिंगापूरहून ही मशिनरी येत आहे. ही लॅब साधारणत: १२०० स्वॅब तपासणी क्षमतेची असून उत्तर महाराष्टÑातील सर्वात मोठी व आधुनिक लॅब ठरणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत सुविधा पोहचविण्याचा प्रशासनाने प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यामुळे रेशनचे वितरण चांगले झाले. नवीन किमान ३६ हजार लोकांना रेशन मिळाले व त्यासाठी १२ हजार नवीन रेशनकार्डही दिले. रोहयोच्या कामांवर जास्ततीत जास्त मजुरांना काम देण्याचा प्रयत्न झाला. ६५ हजारापेक्षा अधीक मजूर या योजनेच्या प्रवाहात आले. दुर्गम, अतिदुर्गम भागातील जनतेच्या प्रश्नांची दखल घेऊन उपाययोजना केल्याने त्याची चांगले परिणाम दिसून आले आहेत.