शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत- कोरोनासाठी आयएमएची स्वतंत्र समिती काम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:40 IST

जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात आयएमए संघटनेचे मोठे योगदान आहे. कोरोनाच्या काळात देखील संघटना योगदान देत आहे. - डॉ.शिरिष शिंदे, नंदुरबार

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरोनाच्या संकटाच्या काळात आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने चांगले काम केले आहे. शासनाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करीत काम सुरू आहे. सामान्य रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी डॉक्टर मंडळी काम करीत आहे. यासाठी चार सदस्यीय समितीही नेमली आहे. येत्या काळात संघटनेने अनेक नवीन उपक्रम हाती घेतले असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा डॉक्टर असोसिएशनचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.शिरिष शिंदे यांनी सांगितले. त्यांच्याशी झालेली बातचित...कोरोनाला कसे हाताळले जात आहे?जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींकडे अपुऱ्या सोयी, सुविधा आहेत. जिल्ह्यात मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटल नाही. अशा तोकड्या साधनांमध्येही जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींनी कोरोनाच्या संवेदनशील काळात सामान्य रुग्णांची गैरसोय होऊ दिली नाही. सुदैवाने जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव कमी आहे. अ‍ॅक्टीव्ह पेशंट १० ते १५ च्या आतच राहत आहेत. ते यापुढे वाढू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.संघटनेने आगामी काळात कोरोनासंदर्भात काय उपक्रम हाती घेतले आहेत.?कोरोना संदर्भात विविध अटी, नियम, कायदे आहेत. दररोज नवनवीन आदेश निघत असतात. त्यामुळे डॉक्टरमंडळी गोंधळून जाते. त्यासाठी आयएमएच्या चार डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींचा समन्वय साधणार आहे. त्यातून आयएमएच्या सदस्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय या समितीच्या माध्यमातूनच जिल्हा आरोग्य यंत्रणेला आवश्यक ते सहाय्य पुरविले जाणार आहे.संघटनेचे इतर काय उपक्रम?राज्यात नंदुरबारच्या संघटनेची वेगळी ओळख आहे ती कायम टिकवून ठेवणार. आरोग्य जागृती, वृक्षारोपण, शिबिरे यासह नवीन तंत्रज्ञानाची माहिती सदस्यांना व्हावी यासाठी वेळोवेळी सेमिनार घेणार आहोत. त्यासाठी तज्ज्ञांना बोलविले जाईल.कोरोनाग्रस्त रुग्णाने ज्या रुग्णालयात उपचार घेतला ते रुग्णालय पूर्वी १४ दिवस बंद ठेवले जात होते. आता नवीन नियमानुसार डॉक्टर व स्टाफचा अहवाल निगेटिव्ह आल्यास दुसºयाच दिवशी सॅनिटाईझ करून रुग्णालय सुरू करता येणार आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.लॉकडाऊन शिथील झाले आहे. व्यवहार सुरळीत होत आहेत. लोकांचे मायग्रेशन आता वाढणार आहे. त्यामुळे येत्या काळात लक्षणे नसलेले अनेक रुग्ण आपल्या आसपास राहणार आहे. अशा रुग्णांपासून दूर राहणे, सर्व आवश्यक त्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे प्रत्येकाला आवश्यक आहे. कुणीही या महामारीला सहज घेवू नका. जिल्हा प्रशासनाच्या चांगल्या कामामुळेच राज्यात सर्वात कमी रुग्ण आपल्या जिल्ह्यात आहेत. हीच स्थिती टिकवून ठेवण्यासाठी आता प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. तरच कोरोनाला आपण नियंत्रणात ठेवू शकणार आहोत.