शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

संडे स्पेशल मुलाखत- कोरोनासाठी आयएमएची स्वतंत्र समिती काम करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:40 IST

जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात आयएमए संघटनेचे मोठे योगदान आहे. कोरोनाच्या काळात देखील संघटना योगदान देत आहे. - डॉ.शिरिष शिंदे, नंदुरबार

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरोनाच्या संकटाच्या काळात आयएमए या डॉक्टरांच्या संघटनेने चांगले काम केले आहे. शासनाच्या प्रत्येक आदेशाचे पालन करीत काम सुरू आहे. सामान्य रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी डॉक्टर मंडळी काम करीत आहे. यासाठी चार सदस्यीय समितीही नेमली आहे. येत्या काळात संघटनेने अनेक नवीन उपक्रम हाती घेतले असल्याची माहिती नंदुरबार जिल्हा डॉक्टर असोसिएशनचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.शिरिष शिंदे यांनी सांगितले. त्यांच्याशी झालेली बातचित...कोरोनाला कसे हाताळले जात आहे?जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींकडे अपुऱ्या सोयी, सुविधा आहेत. जिल्ह्यात मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटल नाही. अशा तोकड्या साधनांमध्येही जिल्ह्यातील डॉक्टर मंडळींनी कोरोनाच्या संवेदनशील काळात सामान्य रुग्णांची गैरसोय होऊ दिली नाही. सुदैवाने जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव कमी आहे. अ‍ॅक्टीव्ह पेशंट १० ते १५ च्या आतच राहत आहेत. ते यापुढे वाढू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे.संघटनेने आगामी काळात कोरोनासंदर्भात काय उपक्रम हाती घेतले आहेत.?कोरोना संदर्भात विविध अटी, नियम, कायदे आहेत. दररोज नवनवीन आदेश निघत असतात. त्यामुळे डॉक्टरमंडळी गोंधळून जाते. त्यासाठी आयएमएच्या चार डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींचा समन्वय साधणार आहे. त्यातून आयएमएच्या सदस्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय या समितीच्या माध्यमातूनच जिल्हा आरोग्य यंत्रणेला आवश्यक ते सहाय्य पुरविले जाणार आहे.संघटनेचे इतर काय उपक्रम?राज्यात नंदुरबारच्या संघटनेची वेगळी ओळख आहे ती कायम टिकवून ठेवणार. आरोग्य जागृती, वृक्षारोपण, शिबिरे यासह नवीन तंत्रज्ञानाची माहिती सदस्यांना व्हावी यासाठी वेळोवेळी सेमिनार घेणार आहोत. त्यासाठी तज्ज्ञांना बोलविले जाईल.कोरोनाग्रस्त रुग्णाने ज्या रुग्णालयात उपचार घेतला ते रुग्णालय पूर्वी १४ दिवस बंद ठेवले जात होते. आता नवीन नियमानुसार डॉक्टर व स्टाफचा अहवाल निगेटिव्ह आल्यास दुसºयाच दिवशी सॅनिटाईझ करून रुग्णालय सुरू करता येणार आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.लॉकडाऊन शिथील झाले आहे. व्यवहार सुरळीत होत आहेत. लोकांचे मायग्रेशन आता वाढणार आहे. त्यामुळे येत्या काळात लक्षणे नसलेले अनेक रुग्ण आपल्या आसपास राहणार आहे. अशा रुग्णांपासून दूर राहणे, सर्व आवश्यक त्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे प्रत्येकाला आवश्यक आहे. कुणीही या महामारीला सहज घेवू नका. जिल्हा प्रशासनाच्या चांगल्या कामामुळेच राज्यात सर्वात कमी रुग्ण आपल्या जिल्ह्यात आहेत. हीच स्थिती टिकवून ठेवण्यासाठी आता प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. तरच कोरोनाला आपण नियंत्रणात ठेवू शकणार आहोत.