शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत- शेतकऱ्यांनो पावसाचा अनुमान समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:02 IST

बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत छोट्या शेतकऱ्यांना टिकून राहयचे असेल तर त्यांनी खालील पंचसूत्रीचा प्रयोग करण्याची गरज आहे. - डॉ.गजानन डांगे

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कपर्यावरणाचा बदलात छोट्या शेतकºयांना टिकून राहायचे असेल तर त्यांनी पावसाचा अनुमान समजून घेणे आवश्यक असून बहूपीक पद्धत, शेतातच पाण्याचे नियोजन, बीज प्रक्रिया, जैविक खतांचा वापर आणि गटशेतीचा प्रयोग करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन कृषीतज्ज्ञ डॉ.गजानन डांगे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केले. सध्या अक्षय कृषी परिवारातर्फे देशभरातील छोट्या शेतकºयांना प्रयोगशील व त्यांना प्रशिक्षीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभुमीवर या परिवारातील संस्थापक सदस्य म्हणून ते बोलत होते.पावसाचा अनुमान समजून घेण्यासाठी शेतकºयांनी काय केले पाहिजे?हा अनुमान समजून घेण्यासाठी प्रत्येक गावात त्या त्या गावातील मोबाईल माहिती चांगल्या प्रकारे जाणणारे किमान १० शेतकºयांनी एकत्र येवून त्यांनी कृषी विज्ञान केंद्राचा मोबाईल अ‍ॅडव्हायझरी सर्व्हीसेसशी जोडले गेले पाहिजे. त्यांच्याशी योग्य समन्वय साधल्यास आपल्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज त्यांना मिळू शकतो.पाण्याचा नियोजनासाठी कुठले प्रयोग हवे?सध्या पाऊस बेभरवशाचा झाला आहे. दोन पावसातील अंतर किती राहील हे कुणी सांगू शकत नाही. यासाठी शेतकºयांनी आपल्या शेतालाच पाणलोटाचे स्वरूप देवून पावसाळ्यात पडणारा थेंब ना थेंब आपल्या शेतातच जिरवता येईल याचे तंत्र शिकले पाहिजे. त्यासाठी रोहयोची मदत घेवून माती वाहून जावू नये यासाठी बांध बंदीस्त नीट केले पाहिजे. कधी कधी पावसाची तीव्रता जास्त असते. त्यामुळे शेतातील माती वाहून जाते. आपण शरिरातील रक्त वाहू नये यासाठी जशी काळजी घेतो तशी माती वाहू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्याकरीता लगतच्या ८ ते १० शेतकºयांनी गट करून माती वाहू नये व पाणी आपल्या शेतातच जिरवण्यासाठी प्रयोग करावे.जैवीक अथवा सेंद्रीय खते शेतकºयांनी शक्यतोवर आपल्या घरीच बनविण्यासाठी प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. ही खते जर स्वत:च बनविली तर खतांबाबत बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. खते घरीच तयार होणार असल्याने त्यातून खर्चाची बचतही होईल व जास्त उत्पादन घेण्याचे प्रयोगही करता येतील. याशिवाय बीज प्रक्रियाही प्रत्येक शेतकºयाने पेरणी पूर्वी केलीच पाहिजे. ही प्रक्रिया कृषी विज्ञान केंद्राकडून समजून घेतली पाहिजे. कारण सध्याच्या परिस्थितीत ही बाब महत्त्वाची झाली आहे.